Saturday, May 23, 2026
Home Blog Page 8

सकल मराठा समाजाने रोखला पुणे सोलापूर महामार्ग ; जालना येथील लाठीमाराचा भिगवण येथे निषेध

0

भिगवण वार्ताहर.दि.३

जालना येथील मराठा आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी भिगवण येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला.यावेळी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची डोकी फोडणाऱ्या पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली.

एक मराठा लाख मराठा ,आर कोण म्हणत देणार नाही आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाय अशा घोषणा देत शेकडो मराठा तरुण पुणे सोलापूर महामार्गावर ठाण मांडून बसला असल्याचे दिसून आले.जालना येथील निष्पाप मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमार करून डोकी फोडली.याच जुलमी कारवाईचा भिगवण येथे निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी भिगवण परिसरातील अमर बौद्ध संघटना ,मुस्लीम संघटना ,भोई संघटना आणि कुंची कोरवी संघटना यांनी मराठा समाजाच्या आंदोलनांना पाठींबा व्यक्त केला.यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा संघाचे पांडुरंग जगताप ,अशोक शिंदे ,सचिन बोगावत ,विक्रम शेलार ,डॉ.पद्मा  खरड यांनी लाठीमार आणि गोळीबार करणाऱ्या सरकारचा आणि सरकारचा आदेश माणून सर्वसामान्य मराठा आंदोलकांची डोकी फोडणाऱ्या पोलीसानाचा निषेध व्यक्त केला.तर सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,तहसीलदार अनिल ठोंबरे ,भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी आर सी पी ३ आणि ४ , एडीम २ वाहने , ४ अधिकारी आणि जवळपास ३० पोलीस जवान तसेच महामार्ग पोलीस पथक असा तगडा पोलीस बंदोबस्त यावेळी लावण्यात आला असल्याचे दिसून आले.

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी आंदोलना दरम्यान कोणातही गैरप्रकार घडू नये साठी खबरदारी घेतली होती.तर आंदोलन स्थळा पासून २०० मीटर दूरवरच वाहने थांबवून ठेवली होती.तर कोठेही टायर पेटवून वाहने रोखली जावू नयेत यासाठी खबरदारी घेत पोलीस पथकाची नेमणूक केली होती.आंदोलन सुरु होण्या अगोदर २ तास पूर्ण रंगीत तालीम घेण्यात आल्याने आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने पार पडल्याचे पहावयास मिळाले.

भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांना ग्रीन वर्ल्ड चा सन्मान

0

भिगवण वार्ताहर.दि.१५

भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांचा ग्रीन वल्र्ड प्राईड ऑफ इंडिया २०२३ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.या पुरस्काराने भिगवण पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक म्हणून भिगवण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप पवार यांनी कायदा सुव्यवस्था ,गुन्हेगारीचे उच्चाटन ,वाहतूक कोंडी सारख्या समस्या कायमस्वरूपी सुटाव्यात यासाठी कामकाज केले .विशेष करून भिगवण शहर हे शिक्षणासाठी हब समजले जाते.याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोड रोमिओ चा त्रास शाळकरी मुलीना सहन करावा लागत होता. याविषयी मोठ्या प्रमाणात कारवाया करून मुली आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले.तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निराकारण तातडीने करून त्यांना न्याय वाटेल अशी कार्यपद्धती अवलंबली.याच त्याच्या कार्याचा आढावा घेत मुक्तांगण इंग्लिश स्कूल आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅनड टेक्नोलोजी पुणे येथे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार वितरण प्रसंगी विविध शाळा महाविद्यालयांना ग्रीन वर्ल्ड क्लबच्या वतीने १० हजार पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी ,कॉसमोस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे ,पप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय कणेकर ,रामबंधू मसालाचे अध्यक्ष हेमंत राठी ,रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर ,ग्रीन वर्ल्ड चे अध्यक्ष गौतम कोतवा हे उपस्थित होते.पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

वाद एकाशी जिवघेना हल्ला दुसऱ्यावरच ; हॉटेल व्यावसायिक धुमाळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कोडे उलघडले

0

जीवाघेना हल्ला करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ; चार अनोळखी साथीदार फरार

भिगवण वार्ताहर .दि.१०

सत्यवार्ता न्यूज नेटवर्क बातमी.

दुचाकीला कट मारल्याच्या वादातून झालेल्या किरकिरीची माफी मागण्याचा बहाना करून बदला घेण्यासाठी आलेल्या टोळक्याने धारदार शश्त्राने दुसऱ्याच तरुणावर वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दौंड पोलीस ठाणे हद्दीतील स्वामी चिंचोली येथे घडली .या सदंर्भात रावणगाव पोलीस ठाण्यात ५ आरोपीविरोधात प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार शिवम कांबळे रा.दौंड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे इतर ४ साथीदारांनी पळ काढला आहे.याबाबत राहुल राजेंद्र ढवळे रा.मदनवाडी यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत सांगितलेल्या घटना क्रमानुसार फिर्यादी राहुल याचा भाऊ अक्षय जनावरांचा चारा घेवून येत असताना आरोपी शिवम कांबळे याने दुचाकीला कट मारून उलट अक्षय यालाच शिवीगाळ करीत गाडीच्या चाव्या काडून घेतल्या होत्या.त्यावेळी राहुल याने फोन करून समंजस पणा दाखवत वाद मिटविला होता.चार दिवस उलटून गेल्यावर राहुल याला शिवमने फोन करून माफी मागावयाची असल्याचे सांगून भेट घेण्याचे सांगितले,मात्र राहुल हा विशाल धुमाळ या हॉटेल व्यावसायिकासोबत दौंड हद्दीतील स्वामीचिंचोली येथे असल्यामुळे शिवम त्याला त्याच ठिकाणी आलो म्हणून भेटण्यास गेला .सोबत दोन दुचाकीवर ४ साथीदार होते.पाचही आरोपींनी राहुल असणाऱ्या ठिकाणी जात मी शिवम कांबळे आहे तूच राहुल आहेस का असे म्हणत विशाल आणि राहुल यांना मारहाण करण्यास सुरवात केली.तर दोन साथीदार यांनी राहुल याला पकडून धरत दुसऱ्या दोघांनी विशाल याला पकडून ठेवत शिवम याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने विशाल याच्यावर वार केले.त्यावेळी दोघांनी आरडाओरडा सुरु केला असता यातील दोन आरोपींनी जखमी विशाल याच्या गळ्यातील सोन्याची चैन घेवून दुचाकीवरून धूम ठोकली.आरडाओरडा झाल्यामुळे जमलेल्या जमावाने शिवम याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

या संपूर्ण घटनेचा हॉटेल व्यावसायिक विशाल धुमाळ यांचा सबंध नसताना राहुल समजून आरोपी शिवम याने विशाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.यात गंभीर जखमी धुमाळ यांना बारामती येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

.जखमी विशाल धुमाळ हे सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे आणि शिवसेना वैदकीय मदत केंद्राचे काम करीत असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार आहे.धुमाळ यांच्यावर वार केल्याची बातमी वार्यासारखी पसरल्यामुळे अनेक तरुणांनी हॉस्पिटल कडे धाव घेतली.त्यामुळे काही काळ बारामती भिगवण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पहावयास मिळाले.  

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार आणी त्यांच्या पोलीस पथकाचे हद्दीचा भाग विचारात न घेता जखमी धुमाळ यांना उपचार मिळणे कामी तसेच आरोपीला धारदार शस्त्रासह ताब्यात घेत कायदा आणी सुव्यवस्था चोख ठेवण्याचे काम केल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

भिगवण येथील प्रसिद्ध हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला ; कोयत्याने केले सपासप वर

0

जीवाघेण्या हल्यात हॉटेल व्यवसायिक गंभीर जखमी ; उपचारासाठी बारामती येथे दाखल

भिगवण वार्ताहर.दि. 9

भिगवण येथील हॉटेल व्यवसायिकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सायंकाळी घडली.हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार भिगवण येथील प्रसिध्द मासे खानावळीचे मालकांवर हे प्राणघातक वार झालेले आहेत.पुणे सोलापूर महामार्गा वरील दौड हद्दीतील हॉटेल ज्योती व्हेज समोर हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे.दौड हद्दीतील गुन्हा असला तरी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी तातडीने हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडील कोयता जप्त केला आहे.तसे च याची माहिती दौड पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.सदर् हल्लेखोर एकटाच होता की त्याचे साथीदार याबाबताची माहिती मिळाली नाही .मात्र हा जिवघेना हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.जखमी हॉटेल व्यवसायिक यांना भिगवण येथील यशोधरा आय सी यु या खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच पुढील उपचारसाठी बारामती हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना संपर्क केला असता हल्लेखोराला त्याच्या ताब्यात असणाऱ्या धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले असून याची माहिती दौड पोलीस ठाण्याला दिली आहे. तसेच जखमी व्यक्तीची

प्रकृती स्थिर असून भिगवण शहरात शांतता कायम असल्यामुळे कोणत्याही अफवाना बळी पडू नये असे आवाहन केले आहे

म्हसोबावाडी विहीर दुर्घटना प्रकरणी विहीर मालक आणी ठेकेदार या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ;

0

भिगवण वार्ताहर.दि.५

सत्यवार्ता न्यूज नेटवर्क भिगवण

म्हसोबावाडी येथील विहीर दुर्घटना घडून झालेल्या मजुरांच्या मृत्यू बाबत विहीर मालक गिरीश विजय क्षीरसागर तसेच कंत्राटदार विश्वास गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. या प्रकरणी विहीर मालक गिरीश क्षीरसागर याला अटक करण्यात आले आहे.

म्हसोबावाडी येथील विहिरीच्या रिंग बांधण्याचे काम सुरु असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली जावेद अकबर मुलानी ,सोमनाथ लक्ष्मण गायकवाड ,परशुराम बन्सीलाल चव्हाण ,लक्ष्मण मारुती सावंत हे  ४ मजूर गाडले गेले होते.मंगळवारी घडलेल्या या घटनेची माहिती त्याच रात्री उशिरा मिळाली होती.भिगवण पोलीस ठाण्यात याची खबर मिळताच त्यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणाना माहिती देत मजुरांच्या शोध कार्याला सुरवात केली होती. अक्राळविक्राळ विहीर आणि गाडल्या गेलेल्या मजुरांना जिवंत काढण्यासाठी प्रशासन सर्व ते प्रयत्न करीत होते.पुणे येथून यासाठी एन डी आर एफ पथकाला पाचारण करण्यात आले होते.मात्र अनेक प्रयत्न करूनही कामगारांना जिवंत काढणे प्रशासनाला शक्य झाले नाही आणि जवळपास ७० तास चाललेल्या बचाव आणि शोध पथकाच्या हाती ४ हि मजुरांचे मृतदेह मिळून आले.यावेळी नातेवाइकांनी मृतदेह ठेवलेल्या अम्बुलंस समोर लोटांगण घेत न्याय देण्याची मागणी केली.तर विहीर मालक आणि कंत्राटदार याना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली.पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढून या प्रकारणी दोषींवर कठोर शासन करण्याची ग्वाही दिली.याच संदर्भात भिगवण पोलिसांनी विहीर मालक गिरीश क्षीरसागर आणि रिंगचे कंत्राट घेणाऱ्या विश्वास गायकवाड विरोधात याठिकाणी काम करताना मजुरांच्या जीवाला धोका होवू शकतो याची कल्पना असताना आणि कोणत्याही प्रकारची सुरक्षेच्या बाबींचा उपयोग न केल्यामुळे मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.तर क्षीरसागर याला तातडीने अटक करण्याची प्रकिया पूर्ण केली आहे.

म्हसोबावाडीतील विहिरीत गाडल्या गेलेल्या 4 मजुरांचे मृतदेह शोधण्यात एन डी आर एफ पथकाला यश ; 70 तासाच्या अविरत प्रयत्नातून मृतदेह मिळाले

0

भिगवण वार्ताहर.दि.४

सत्यवार्ता न्यूज नेटवर्क भिगवण

म्हसोबावाडी ता.इंदापूर येथील विहिरीची रिंग तयार करत असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली गाडले गेलेल्या ४ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात एन डी आर एफ पथकाला ७० तासांनंतर यश मिळाले. ७० तास उलटून गेल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत मजूर मिळण्याची आशा मावळली होती आणि प्रत्यक्षात तेच वास्तव समोर आले. मृतदेह बाहेर काढताच मृतांच्या नातेवाइकांनी न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नसल्याचे प्रशासनाला सांगितले.

म्हसोबावाडी येथे खडी क्रेशर साठी दगड काढून त्याठिकाणी झालेल्या अक्राळविक्राळ खड्याला विहिरीचे रूप देवून रिंग टाकण्याचे काम सुरु होते.तर हे काम करताना कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे रिंग बांधताना अपघात होऊन ४ मजूर मातीच्या खाली गाडले गेले होते.त्यांना जिवंत काढण्यासाठी एन.डी आर एफ पथक गेल्या दोन दिवसापासून अविरत पणे काम करीत होते.मात्र अनेक प्रयत्न करूनही मजूर ज्या ठिकाणी गाडले गेले होते त्या ठिकाणी पोहोचता येत नव्हते अखेर पूर्व बाजूला सुरु केलेले खोदकाम थांबवून दुसऱ्या बाजूला रप्म तयार करून मशीन खाली उतरवण्यात आल्या.आणि तब्बत ७० तास उलटून गेल्यावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका कामगाराचा मृतदेह मिळून आला.त्यानंतर शोधकार्य सुरु ठेवून ३ मजुरांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.मृतदेह बाहेर काढताच नातेवाईक यांनी हंबरडा फोडून रडण्यास सुरवात केली.त्यामुळे तेथील वातावरण अगदी रडण्या ओरडण्याच्या आवाजाने भारून गेलेले दिसून आले.

मृतदेह अम्बुलंस मध्ये ठेवताच मृतकाचे नातेवाइकांनी वाहन अडवून जोपर्यंत यातील दोषींना अटक करून न्याय मिळत नाही तो पर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याचे सांगितले.तर विहीर मालकावर तसेच रिंगच्या कंत्राटदार याच्यावर गुन्हा नोंद करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तर हा अपघात होता कि घातपात याची चौकशी करण्याची मागणी समोर येत आहे.

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीची रिंग कोसळून चार कामगार गाडले गेल्याची भीती ; एन डी आर एफ पथकाकडून शोध मोहीम सुरु

0

भिगवण सत्यवार्ता न्यूज नेटवर्क.

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी या ठिकाणी शेतातील विहिरीचे संरक्षण कठड्याचे काम सुरु असताना त्यातील काही भाग कोसळून त्या खाली काम करणारे 4 मजूर गाडले गेल्याची घटना घडली. गाडले गेलेले चारही मजूर बेलवाडी गावाचे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.या ठिकाणी एन डी आर एफ पथक आले असून ढासळलेला भाग पोकलंड मशीनाच्या सहायाने काढून मजुरांचा शोध घेतला जात आहे.

गाडले गेलेल्या चारही कामगारां च्या नावाची खात्री केली जात आहे.अतिशय गंभीर प्रकरण असल्यामुळे या ठिकाणी एन डी आर एफ च्या पथकाला बोलाविण्यात आले असून पथकाने तातडीने मलबा हटाविण्याचे काम सुरु केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार म्हसोबाची वाडी येथील विजय क्षीरसागर यांच्या शेतात नव्याने बांधण्यात येत असलेल्या विहिरीची रिंग चे काम सुरु असताना सदर प्रकार घडला आहे. रिंगचे काम करणारे कामगार रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने घरच्या नातेवाईकांनि शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला.

घटनास्थळी माजी मंत्री आणी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मध्यरात्री भेट देत प्रशासनाला शोध कार्यासाठी सूचना करित मदत केली.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती बारामती विभाग पुणे ग्रामीण, श्रीकांत पाटील तहसीलदार इंदापूर हे हजर आहेत.
घटनास्थळी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.घटनास्थळी लाईट ची व्यवस्था करण्यात आली आहे. पोकलेन मशीन लावून विहिरीचे डासाळलेला मुरूम काढण्याचे काम चालू आहे. मुरूम काढून कामगार बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

भिगवण मुख्य बाजार पेठेतील सराफी दुकान फोडण्याचा चोरांचा प्रयत्न ; सायरन वाजल्यामुळे काढला पळ

0

भिगवण वार्ताहर .दि. ७

भिगवण येथील मुख्य बाजार पेठेतील सराफी दुकान चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास  फोडण्याचा प्रयत्न केला.मात्र दुकानात असणारा  सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला .या संपूर्ण प्रकाराचे सी.सी टी व्ही मध्ये चित्रण झाले असून भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत चोरट्यांचा शोध सुरु केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिगवण बाजार पेठेतील श्रीकृष्ण ज्वेलर्स या सराफी दुकानात हा प्रकार घडला.मध्यरात्री २ च्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या ४ ते ५ अज्ञात चोरांनी कटावणी च्या सहायाने दुकानाचे शटर उघडले .मात्र शटर उघडताच दुकानाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली सायरन चालू झाल्यामुळे चोरट्यांनी येथून पळ काढला.तर काही वेळानी याच ठिकाणी येवून परत चोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र दुकानाच्या आत असणारी जाळी तोडण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांना याची चाहूल लागल्यामुळे येथून पळ काढण्यात समाधान मानले.सायरनचा आवाज जवळपास २० मिनिट येवूनही कोणीही या ठिकाणी न आल्यामुळे परत येण्याचे धाडस चोरट्यांनी केले असल्याचे दुसऱ्या इमारतीवर असणाऱ्या सी.सी.टी.व्ही चित्रणातून दिसून आले.काही वेळानी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना याची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी भेट देण्यासाठी आले होते.

चौकट…..आजकाल सोन्याचे भाव गगनाला भिगले असून चोरट्यांनी सराफी दुकाने फोडण्याचे टार्गेट ठेवल्याचे दिसून येत आहे.तर चारचाकी वाहन दुकानाच्या दरवाजात लावून चोरी करण्यामागे तिजोरी फोडण्यासाठी वापरण्यात येणारी गॅसकटर यंत्रणा वापरण्याचा हेतू असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पोलीस तसेच व्यावसायिकांनी या बाबत गंभीरता पूर्वक उपाययोजना करण्याची करण्याची आवश्यकता असल्याचे सराफ संघटना सदस्य सुनील उदावंत यांनी सांगितले.

पुणे सोलापूर महामार्गावरील ज्योती हॉटेल समोर थांबलेल्या आयशर गाडीला स्कार्पिओ धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 9 जन जखमी

0

भिगवण वार्ताहर.दि.१५

पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण गावच्या हद्दीत  बंद पडलेल्या आयशर टेम्पोला स्क्रार्पिओ धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ९ जन गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.पुणे सोलापूर महामार्गावर अनधिकृतपणे थांबलेल्या वाहनामुळे अनेक अपघात होवून निष्पाप जीव जात असताना याकडे महामार्ग प्रशासन गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात जालिंदर बाळासाहेब वीरकर वय .३६ रा चिखली ता.हवेली यांचा मृत्यू झाला आहे.तर वैशाली राजू फडके ,मच्चीद्र बाळासाहेब वीरकर ,लक्ष्मीबाई बाळासाहेब वीरकर ,प्रीतम जालिंदर वीरकर ,मंगल राहुल मेदनकर ,विशाल विलास मोरे ,संगीता विलास मोरे तसेच राजू गोविंद फडके हे ९ जन किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले आहेत.वीरकर मोरे कुटुंबीय आपल्या ताब्यातील स्कारपिओ नंबर एम.एच.१४ जी.ए ५५१४ गाडीतून पुणे बाजूकडून सोलापूरकडे जात असताना भिगवण गावच्या हद्दीत ज्योती हॉटेल येथून समोरील गाडीला ओव्हरटेक करीत असताना मुख्य मार्गाच्या शेजारी कडेला थांबलेल्या आयशर गाडी नंबर एम.एच.४३ यु ६८१७ गाडीला पाठीमागून धडकून अपघात झाला आहे.याबाबत फिर्यादी राजू फडके यांनी खबर दिली असून भिगवण पोलिसांनी आयशर ड्रायव्हर विरोधात त्याच्या ताब्यातील वाहन धोकेदायक पणे रस्त्याच्या कडेला उभे करून रीप्लेकटर अथवा धोक्याची कोणतीही सूचना न लावल्याबद्दल तसेच अपघातास कारणीभूत ठरून एकाचा जीव आणि ९ इसमाला जखमी करण्यास कारण ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अपघाताचा तपास पोलीस हवालदार लोढी करीत आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावर धोकेदायक पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनामुळे अपघात घडत असून यात निष्पाप माणसांचे जीव जात आहेत.आजचा अपघात घडण्या अगोदर काही मिनिटे नवजीवन पेपर एजन्सीचे संचालक संतोष सोनवणे यांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशर ड्रायव्हरला या ठिकाणी अपघात घडू शकतो याची माहिती देवून गाडी १०० फुट पुढे असणाऱ्या मोकळ्या जागेत लावण्याची विनंती केली होती.तर अनेक मोर्निंग वॉक साठी जाणार्या नागरिकांनी गाडी काढण्यासाठी सूचना केल्या होत्या.मात्र झोपेत असणाऱ्या ड्रायव्हर ने याकडे दुर्लक्ष केले आणि १० मिनिटाच्या आत हा अपघात घडला.

तक्रारवाडी गावाचे सरपंच पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त असताना उपसरपंच यांना सहीचा अधिकार का नाही ? कोण उप सरपंच यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवत आहे.

0

सरपंच पद रिक्त असेल तर उप सरपंच यांना सहीचा आणी कार्यभार सांभाळण्याचा अधिकार .

महिला उपसरपंच असल्यामुळे अधिकार डावलला जात आहे का ?

कोणाच्या राजकीय दबावा पोटी दिला जात नाही सहीचा अधिकार ? नागरिकांत चर्चा

भिगवण वार्ताहर.दि.२१

तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश विनायक वाघ यांनी पदाचा राजीनामा देवून दीड महिना उलटूनही विद्यमान उपसरपंच यांना सहीचा अधिकार दिला नसल्यामुळे कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.तर सत्ताधारी पार्टीचे विद्यमान उपसरपंच असतानाही कदाचित विश्वास नसल्यामुळे सहीचा अधिकार दिला गेला नाही काय ? अशी कुजबुज गावातील नागरिक करीत आहेत.

तक्रारवाडी गावच्या विद्यमान सरपंच वाघ यांनी दिलेल्या शब्दाचे पालन करीत आपल्या सहकारी सदस्याला पदभार मिळावा म्हणून ठरलेल्या वेळात राजीनामा सादर केला. शासनाच्या ठरलेल्या पद्धतीने तो गटविकास अधिकारी यांनी छाननी करून ग्रामपंचायत सदस्याकडे पडताळणीसाठी योग्य वेळेत पाठविला.पडताळणी होवून माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे जावून तो मंजूर होवून प्रोग्राम लागणार आहे.या सर्व बाबी पार पाडण्यासाठी जवळपास दीड महिना कालावधी लोटला आहे.या काळात ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी यांचा पगार दिवाबत्ती तसेच आवश्यक पत्रव्यवहार पाहण्यासाठी उपसरपंच यांना सहीचा अधिकार मिळणे क्रमप्राप्त होते.मात्र सहीचा अधिकार मिळाला नसल्यामुळे सर्व कामाचा खेळ खंडोबा होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांकडून केला जात आहे.तर उपसरपंच आपल्याच विचाराचा असताना सहीचा अधिकार विश्वास नसल्यामुळे दिला जात नाही काय असा संशय एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर वृत्तवाहिनी प्रतिनिधीकडे व्यक्त केला.

तक्रारवाडी गावासाठी ‘ हर घर नल हर घर जल ’ योजने अंतर्गत जवळपास १ कोटी ५० लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.हि योजना विद्यमान सरपंच सतीश वाघ यांच्या कार्यकाळात सुरु होणे अपेक्षित होते.मात्र सरपंच वाघ यांचा राजीनामा झाल्यावर या कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली. त्यामुळे उपसरपंच यांना सरपंच यांच्या अनुपस्थितीत कामकाज करण्याचा आणि सहीचा अधिकार असणे गरजेचे होते.मात्र राजकीयदृष्ट्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता ग्राह्य धरून अधिकार देण्यात आला नाही काय असा सवाल उपस्थित होत आहे.

याबाबत ग्रामसेवक दीपक बोरावके यांच्याशी संपर्क साधला ग्रामपंचायत कारभार व्यवस्थितपणे चालू असून उपसरपंच सहीचा अधिकार विषयी सदस्यांची मिटिंग बोलावली आहे.या बैठकीत सहीचा अधिकार उपसरपंच यांना देण्यात येण्याविषयी ठराव घेण्यात येणार असल्याचे सांगितले.