ब्ब्ब्व्व्व्ब्ब्ब्
विकास कामाच्या भूमिपूजनावरून तक्रारवाडी गावातील सत्ताधारी आणी विरोधक आमने सामने ; श्रेयवादाचे लोणं तालुका स्तरावरून गाव पातळीवर
भिगवण वार्ताहर.दि.१३
तक्रारवाडी गावात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपा आणि विरोधक राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यात तू तू मै मै वाढली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून महिला सरपंच यांची बदनामी केल्याचा आरोप माजी उपसरपंच प्रशांत वाघ यांनी केला.तर याबाबत माजी सरपंच सतीश वाघ यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वेळ नसल्याचे सांगण्यात आले. मात्र शाशकीय निधीच्या मंजुरी वरून श्रेयवादाचे लोण जिल्हा तालुका स्तरावरून ते तक्रारवाडी सारख्या छोट्या गावातही पसरत असल्याचे यातून दिसून आले.
तक्रारवाडी गावात माजी मंत्री आणि तालुक्याचे आमदार दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून ३० लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.निधी देणारे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा हे दोघे सत्तेत सामील आहेत. त्यामुळे भाजपा गटाच्या सरपंच मनीषा वाघ यांनी भरणे यांच्या माध्यमातून आलेल्या विकास कामाची माहिती सर्व सदस्यांना देत भूपिपुजनाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून विकासकामाचे भूमिपूजन केले.यावेळी सत्ताधारी सरपंच मनीषा वाघ ,
उपसरपंच आशाताई जगताप तसेच इतर असे ९ पैकी ६ सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.मात्र भूमिपूजन कार्यक्रम स्थळी राष्ट्रवादीच्या सदस्यांना बोलाविण्यात आले नसल्याचा आरोप करीत काही कार्यकर्त्यांनी ग्रामसेवक दीपक बोरावके यांना प्रश्न विचारले तसेच यावेळी काही कार्यकर्त्यांनी भूमिपूजन कार्यक्रमाचा निषेध करीत दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि जि.प.सदस्य हनुमंत बंडगर आणी एकमेव विद्यमान सदस्य यांच्या उपस्थितीत प्रती उद्घाटन कार्यक्रम घेतला.यावेळी मदनवाडी भिगवण आणि परिसरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.मात्र विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे तक्रारवाडी गावात तणावाचे वातावरण पहावयास मिळाले.
याबाबत तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ यांनी विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी सर्व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे सांगितले.तर निधी आमदार भरणे यांच्या माध्यमातून आला असला तरी सत्तेत भाजपा आहेच म्हणून भाजपच्या सरपंच म्हणून उद्घाटन करण्याचा मला अधिकार आहेच मात्र महिला सरपंच असल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी याचे राजकीय भांडवल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला.हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी घटना नसल्याचे यावेळी त्यांनी खेदाने सांगितले.तर सोशल मिडीयावरून काही बदनामी कारक कमेंट केल्या आहेत त्यासबंधी कायदेशीर माहिती घेवून पुढे जाणार असल्याचे सांगितले.
याबाबत राष्ट्रवादीचे माजी सरपंच सतीश वाघ यांना संपर्क करून बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वेळेचे कारण देत बोलण्यास नकार दिला.
तक्रारवाडी गांवात 1 कोटी 75 लाख रुपयांच्या विकास कामाला सुरवात ; गावाला रोल मॉडेल बनविण्याचा सरपंच मनीषा वाघ यांचा निश्चय
भिगवण वार्ताहर.दि.६
तक्रारवाडी गावात सत्ताबदलामुळे विकास कामाला चालना मिळाली असून गावातील अंतर्गत रस्त्याची जवळपास १ कोटी ७५ लाख रुपयाचा कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली आहे.तर कामातील दर्जा चांगला राहावा यासाठी सरपंच मनीषा वाघ कामाच्या ठिकाणी भेट देवून कंत्राटदार यांना योग्य त्या सूचना देत आहेत.
तक्रारवाडी गावात मागील २ वर्षापासून राष्ट्रवादी विचाराच्या पदाधिकारी यांची सत्ता होती.मात्र सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे आणि इतर सदस्यांना सरपंच पदाचा मान मिळावा यासाठी तत्कालीन सरपंच सतीश वाघ यांनी राजीनामा दिला होता.तर यावेळी अनेक राजकीय डावपेच खेळून भाजपा विचाराच्या पदाधिकारी यांनी युक्त्या वापरत राष्ट्वादीची सत्ता अलगद उचलून टाकून सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या.सत्ताबदलामुळे गावातील अनेक विकास कामांना चालना मिळाली असून स्थगिती असलेलीं कामे आपली राजकीय चलाखी वापरून ती सुरु करण्यात आली आहेत.गावातील अंतर्गत रस्त्याचे नुसते भूमिपूजन नाही तर प्रत्यक्षात लाखो रुपयांच्या कामांना प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली आहे.सरपंच मनीषा वाघ ,उपसरपंच आशाताई जगताप आणि सदस्या संगीता वाघ ,प्राजक्ता वाघ ,शरद वाघ या सर्व विकास कामाच्या दर्जावर लक्ष देत असून कामे वर्षानुवर्ष टिकावू व्हावीत यासाठी प्रयत्न केला जात आहे.
कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ ,माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,विजयराव जगताप ,सचिन वाघ यांनी गावातील विकासकामासाठी अधिकचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.तसेच माळरान येथील शेतीसाठी असणाऱ्या वनविभागातील रस्त्यासाठी वरिष्ठ पातळीवर परवानगी आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.तक्रारवाडी गाव हे रोल मॉडेल गाव होण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सरपंच मनीषा वाघ यांनी सांगितले.
भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून भिगवण येथील कला महाविद्यालयात रक्तदान शिबीर ; जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांच्या उपस्थितीत आगळा वेगळा उपक्रम
भिगवण वार्ताहर .दि.३
भारत देशातील तरुण युवकांना रोजगार आणि नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे मत भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी भिगवण येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
भाजपा युवामोर्चा यांच्या वतीने भिगवण येथील कला महाविद्यालय भिगवण येथे सेवा पंधरवडा निम्मित रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी उद्घाटक असणाऱ्या अंकिता पाटील बोलात होत्या.यावेळी नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील ,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुतराव वनवे ,माजी सरपंच पराग जाधव ,इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे ,इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन अशोक शिंदे ,संचालक संजय जगताप ,भाजपा गटनेते संपत बंडगर ,तेजस देवकाते ,तक्रारवाडी गावचे सरपंच प्रतिनिधी प्रशांत वाघ ,सुनील वाघ,सचिन वाघ ,कपिल भाकरे,गुरापा पवार ,डॉ.महादेव वाळूंज,मराठी पत्रकार संघाचे डॉ.प्रशांत चवरे हे मान्यवर उपस्थित होते.या रक्तदान शिबिराला विद्यार्थी तसेच परिसरातील अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निम्मिताने देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे.याच माध्यमातून भिगवण तक्रारवाडी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.तर भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून कला महाविद्यालयात हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला.रक्तदान शिबिरासाठी पुणे येथील अक्षय ब्लड बँक यांचे माधयामातून रक्तदात्याकडून रक्त संकलित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन डॉ.बाबासाहेब काळे यांनी केले.तर या कार्यक्रमासाठी भिगवण येथील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
बारामती भिगवण राज्यमार्गांवर झालेल्या अपघातात भिगवण येथील व्यवसायिकाचा जागीच मृत्यू ; अज्ञात वाहणाने दुचाकीला ठोकरल्यामुळे झाला अपघात
भिगवण वार्ताहर.दि.२
बारामती भिगवण राज्यमार्गावर लामजेवाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भिगवण बाजारपेठेतील व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जोगेश नाथसाहेब पाचांगने वय ३२ असे अपघातात मृत झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.जोगेश सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भिगवण येथून आपल्या दुचाकीवरून बारामती कडे जात असताना हा अपघात घडला.अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे जोगेश यांचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातानंतर अपघात ग्रस्त वाहन निघून गेल्याची माहिती मिळत आहे.अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीस तसेच अनेक तरुणांनी अपघात स्थळी धाव घेतली.जोगेश यांच्या मृत्यू मुळे भिगवण बाजारपेठेवर शोककळा पसरल्याचे दिसून आले.
बारामती भिगवण सिमेंट रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे.यातील एक बाजू काही अंशी तयार झाली असून दुसऱ्या बाजूचे काम चालू आहे.मात्र तयार झालेल्या सिंगल बाजूची पूर्वेची साईड पट्टी व्यवस्थित भरण्यात आलेली नाही त्यामुळे दुचाकी तसेच इतर वाहने खाली घेण्यास वाहन चालक धजावत नाहीत त्यामुळे अनेक अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे .याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.तर वाहन धारक गुळमुळीत रस्त्यावर सुसाट वेगाने वाहन चालवीत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे .
पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकाजवळ एसटी खाली चिरडून एकाचा मृत्यू तर दोघे जन जखमी ; पुढे जाण्याच्या नादात चालकाचा सुटला ताबा
भिगवण वार्ताहर.दि.२
पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकापासून निघालेल्या दोन एसटी ड्रायव्हरच्या पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे अपघात घडून एकाला जीव गमवावा लागला.तर दोघे जखमी होवून अनेक दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली.अपघात घडल्यावर एसटी ड्रायव्हर ने भिगवण पोलिसांत हजेरी लावून ब्रेक फेल झाल्याची बतावणी केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गावरील बसस्थानकाजवळ एसटी बसखाली गंगाराम सोमा पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.भिगवण बस स्थानकापासून दोन बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.बस स्थानकासाठी असणाऱ्या सर्विस रस्त्याने येणाऱ्या दोन बस चालकामध्ये पुढे जाण्याची शर्यतीमुळे हा अपघात घडला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.यावेळी उजव्या बाजूने असणार्या गाडीने मुख्य मार्गावर प्रवेश मिळविला मात्र डाव्या बाजूने येणाऱ्या बस ड्रायव्हरचे लक्ष विचलित झाल्याने मृत पवार बस खाली चिरडले गेले.यावेळी अपघात ग्रस्त चालकाने बस ड्रेनेजच्या कठड्यावर चढविल्यामुळे बस थांबली मात्र तोपर्यंत ७ ते ८ दुचाकी गाडी खाली चेंगारल्या गेल्या.या अपघातात मृत पवार यांच्यासह दोन जन जखमी झाले.अपघातानंतर बस चालकाने भिगवण पोलीस ठाण्यात हजर होवून ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती दिली. मात्र १०० फुटावरील स्थानकांत बस व्यवस्थितपणे थांबली असल्याचे नागरिकांनी माहिती दिली.
चौकट…..भिगवण एसटी अपघातामुळे पुणे येथील संतोष माने एसटी अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या.तर भिगवण येथे एका मनोरुग्णाने याच भिगवण बस स्थानकातून बस चालू करून पुणे सोलापूर मार्गावर पळविल्याच्याही आठवणी समोर आल्या.तर भिगवण येथील मुख्यमार्गावरील अनधिकृत व्यवसाय आणि पार्किंग यामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता यामुळे वर्तविण्यात आली.
भिगवण बस स्थानकावर येणाऱ्या बस मुळे अनेक अपघात घडले आहेत.बस स्थानकावर बस आणत असताना चालक वेगाने गाड्या चालवीत असतात.जास्तीची वर्दळ आणि रहदारी असताना वेगावर नियंत्रण आणण्याची गरज आहे असे मत माजी सरपंच पराग जाधव यांनी मांडले.
भिगवण बाजार पेठेतील व्यवसायिकाची गळफास घेत आत्महत्या ; आजाराच्या कारणावरून पाऊल उचलल्याची शक्यता .
भिगवण वार्ताहर दि. 22
भिगवण बाजारपेठेतील व्यवसायिकाने राहत्या घरी वायरच्या सहायाने गळफास घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना दुपारच्या सुमारास घडली. शारीरिक व्याधी अथवा आजाराची भीती
घेऊन पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .मात्र आत्महत्येचे कारण उघड झालेले नसून याबाबत भिगवण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार शैलेश धरमचंद ओसवाल रा.राही आंगण बिल्डिंग भिगवण असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.याबाबत मयत शैलेश यांच्या पत्नी मेघना ओसवाल यांनी भिगवण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.शैलेश ओसवाल आज नियमित पणे कामकाज करित असताना बुधवारी दुपारी त्यांनी हे पाऊल उचलले याबाबत भिगवण बाजार पेठ आणी परिसरात् त्यांच्या शारीरिक आजार आणी त्यांची मानसिकता याबाबत उलट सुलट चर्चा केली जात होती .मात्र त्यांच्या आत्महत्ये बबाबत कोणतेही कारण समोर आलेले नाही. भिगवण पोलिसांनी याबाबत आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. ओसवालं यांच्या या आत्महत्येमुळे भिगवण बाजार पेठेवर शोककळा पसरल्याचे दिसून आले. भिगवण पोलिसांनी पंचनामा करित त्यांचे पार्थिव इंदापूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले .याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करित आहेत.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी भिगवण बाजारपेठेतील व्यवसायिकाने जीव दिल्याची घटना अतिशय दुःखद असून ओसवाल यांच्या नातेवाईक यांनी तक्रार केल्यास पुढील तपास योग्य पद्धतीने होणार असल्याचे सांगितले.तसेच त्यांच्या काही डायऱ्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले.
रोटरी क्लब भिगवण यांच्या माध्यमातून एस टी चालक वाहक आणी प्रवाशी यांच्या आरोग्याची तपासणी
ग्रामीण रुग्णालय भिगवणआणी वाहतूक नियंत्रक यांच्या माध्यमातून रोटरीचा स्तुत्य उपक्रम .
भिगवण वार्ताहर .दि. 11
रोटरी क्लब ऑफ भिगवण तसेच ग्रामीण रुग्णालय व वाहतूक नियंत्रक परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एस टी चे चालक व वाहक आणी प्रवाशी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आहे आले. भिगवण बस स्थानक येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात 100 च्या वरती नागरिकांची तपासणी करण्यात आली.
सकाळी 10 वाजता सुरु झालेल्या या शिबिरामध्ये शुगर तपासणी ,ब्लड प्रेशर या महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्या.तर तपासणी नंतर घेण्यात येणारी खबरदारी तसेच आरोग्याविषयी सल्ला देण्यात आला.
यावेळी भिगवन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन विभुते ,वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक देशपांडे डॉ अमोल खानावरे यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला दिला . तसेच अधिपरीचारिका रेश्मा निळे प्रियदर्शनी शिंदे जया गायकवाड लॅब टेक्निशन शिवांजली वाकळे यांनी तपासणी केल्या.
यावेळी सरपंच दीपिका क्षीरसागर , रोटरी अध्यक्ष रणजित भोंगळे ,रियाझ शेख ,तुषार क्षीरसागर , इंदापूर बस आगार चे डेपो मॅनेजर गोसावी यांनी भेट दिली.
यावेळी रोटरी अध्यक्ष् रणजीत भोंगळे यांनी दैनंदिन जीवनामध्ये एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने बस चालक व वाहक यांच्यावरील ताण वाढत आहे हे लक्षात घेता त्यांचं आरोग्य उत्तम राहावं या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे सर्व सदस्य व भिगवन बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक एन एम राऊत यांनी केले.
सकल मराठा समाजाने रोखला पुणे सोलापूर महामार्ग ; जालना येथील लाठीमाराचा भिगवण येथे निषेध
भिगवण वार्ताहर.दि.३
जालना येथील मराठा आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी भिगवण येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला.यावेळी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची डोकी फोडणाऱ्या पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली.
एक मराठा लाख मराठा ,आर कोण म्हणत देणार नाही आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाय अशा घोषणा देत शेकडो मराठा तरुण पुणे सोलापूर महामार्गावर ठाण मांडून बसला असल्याचे दिसून आले.जालना येथील निष्पाप मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमार करून डोकी फोडली.याच जुलमी कारवाईचा भिगवण येथे निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी भिगवण परिसरातील अमर बौद्ध संघटना ,मुस्लीम संघटना ,भोई संघटना आणि कुंची कोरवी संघटना यांनी मराठा समाजाच्या आंदोलनांना पाठींबा व्यक्त केला.यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा संघाचे पांडुरंग जगताप ,अशोक शिंदे ,सचिन बोगावत ,विक्रम शेलार ,डॉ.पद्मा खरड यांनी लाठीमार आणि गोळीबार करणाऱ्या सरकारचा आणि सरकारचा आदेश माणून सर्वसामान्य मराठा आंदोलकांची डोकी फोडणाऱ्या पोलीसानाचा निषेध व्यक्त केला.तर सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,तहसीलदार अनिल ठोंबरे ,भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी आर सी पी ३ आणि ४ , एडीम २ वाहने , ४ अधिकारी आणि जवळपास ३० पोलीस जवान तसेच महामार्ग पोलीस पथक असा तगडा पोलीस बंदोबस्त यावेळी लावण्यात आला असल्याचे दिसून आले.
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी आंदोलना दरम्यान कोणातही गैरप्रकार घडू नये साठी खबरदारी घेतली होती.तर आंदोलन स्थळा पासून २०० मीटर दूरवरच वाहने थांबवून ठेवली होती.तर कोठेही टायर पेटवून वाहने रोखली जावू नयेत यासाठी खबरदारी घेत पोलीस पथकाची नेमणूक केली होती.आंदोलन सुरु होण्या अगोदर २ तास पूर्ण रंगीत तालीम घेण्यात आल्याने आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने पार पडल्याचे पहावयास मिळाले.
भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांना ग्रीन वर्ल्ड चा सन्मान
भिगवण वार्ताहर.दि.१५
भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांचा ग्रीन वल्र्ड प्राईड ऑफ इंडिया २०२३ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.या पुरस्काराने भिगवण पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक म्हणून भिगवण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप पवार यांनी कायदा सुव्यवस्था ,गुन्हेगारीचे उच्चाटन ,वाहतूक कोंडी सारख्या समस्या कायमस्वरूपी सुटाव्यात यासाठी कामकाज केले .विशेष करून भिगवण शहर हे शिक्षणासाठी हब समजले जाते.याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोड रोमिओ चा त्रास शाळकरी मुलीना सहन करावा लागत होता. याविषयी मोठ्या प्रमाणात कारवाया करून मुली आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले.तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निराकारण तातडीने करून त्यांना न्याय वाटेल अशी कार्यपद्धती अवलंबली.याच त्याच्या कार्याचा आढावा घेत मुक्तांगण इंग्लिश स्कूल आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅनड टेक्नोलोजी पुणे येथे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार वितरण प्रसंगी विविध शाळा महाविद्यालयांना ग्रीन वर्ल्ड क्लबच्या वतीने १० हजार पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी ,कॉसमोस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे ,पप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय कणेकर ,रामबंधू मसालाचे अध्यक्ष हेमंत राठी ,रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर ,ग्रीन वर्ल्ड चे अध्यक्ष गौतम कोतवा हे उपस्थित होते.पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.























