समुद्र किनारी उगावणारे नागझरी गवताची बेटे जरबेरा म्हणून घेऊन फ़सू नये महाराष्ट्र ऍग्रो एजन्सी चे संचालक किरण नगरे यांची माहिती..
भिगवण वार्ताहर.दि.२
‘ शिकलेली आणि हुशार मानस फसतात मात्र फसवणूक करणारा पट्टीतला पाहिजे ’ अस नेहमीच बोलल जात आणि त्याचा प्रत्यय रविवारीच्या बाजार दिवशी भिगवणकरांनी घेतला . समुद्र किनार्यावर उगवणारे गवत रंगीबेरंगी जरबेरा फुलांची बेट म्हणून घेत खिशाला चाट बसविला .याची माहिती जाणकार पत्रकाराने पोलीस ठाण्याला देताच चाहूल लागल्याने गवत विक्री करणार्यांनी आपला बोजा बिस्तारा आवळून धूम ठोकली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि भिगवण बाजार पेठेतील गजबजलेल्या आंबेडकर चौकात रंगीबेरंगी जरबेरा फुलांची झाडे विक्रीसाठी चार पाच तरुण आणि काही महिला बसल्या होत्या.१०० रुपयात सुंदर फुलाचे झाड मिळत असल्यामुळे अनेक नागरिकांनी आणि महिलांनी गर्दी करीत हि रोपटी विकत घेण्यास सुरवात केली .काही वेळातच त्यांच्याकडील रोपटी संपून त्यांनी साठा असलेल्या गाडीतून आणखीन रोपटी आणली यावेळी पत्रकार यांची गाडी या ठिकाणी पार्क करून माहिती घेतली असता त्यांनी आपण कळस अकोले येथील असल्याची बतावणी केल्यामुळे थोडासा संशय निर्माण झाला.याच वेळी बाजार पेठेतील गुरुदत्त इलेक्ट्रिकलचे व्यापारी यांनी आपण ती रोपे खरेदी केली असून त्यासाठी कुंड्या विकत घेतल्याचे सांगितले आणि हि जरबेरा असून याला सुंदर फुले येतात अशी माहिती दिली .यावेळी या रोपट्याचा आणि फुलाचा फोटो काढून तो शेतीतद्न्य आणि फुलझाडे आणि फळझाडे याची माहिती असणार्या किरण नगरे यांना पाठविताच त्यांनी हि जरबेरा नसून समुद्र किनारी उगविणारे नागझरी गवत असल्याचे सांगितले.विक्री करणारी टोळी लोकांची सरळसरळ फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांना देण्यात आली .मात्र हि गोष्ट विक्री करणाऱ्या टोळीच्या लक्षात येताच त्यांनी माल घेवून पळ काढला आणि अचानक संपूर्ण टोळीच काही क्षणात अदृश्य झाली.मात्र तो पर्यंत अनेक नागरिक यात गंडविले गेल्याचे उघड झाले.यामुळे ‘ दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये ’ या म्हणीची आठवण झाली.
याबाबत महाराष्ट्र अग्रो एजन्सीचे संचालक किरण नगरे यांनी हि रोपटी समुद्र किनारी उगविणारे नागझरी गवताची रोपे असून त्याची पाने कापून हि रंगीबेरंगी जरबेरा असविल्याचे भासवून फसवणूक केली जात असल्याचे सांगितले त्यामुळे नागरिकांनी या फसवणुकी पासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले.तसेच यांच्याविरोधात पोलीस कारवाई झाल्यावर फसवणूक टाळली जाईल असे मत व्यक्त केले.
























