Monday, April 6, 2026
Home Blog Page 3

मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीचा 20 लक्ष रुपयाचा निधी ; भिगवण वैकुंठ भूमीत होणार निवाऱ्याची सोय

0

भिगवण वार्ताहर.दि.११

भिगवण येथील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शेडचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे शुभहस्ते सरपंच गुराप्पा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले .कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे यांनी सांगितले.

भिगवण वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी शेडची व्यवस्था होती मात्र सुशोभीकरण करताना आणि स्मशानभूमीची उंची वाढविण्याच्या हेतूने तत्कालीन सरपंच तानाजी वायसे यांच्या कार्यकाळात हे शेड काढण्यात आले होते.मात्र शेड काढल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांनी याबाबत मंत्री दतात्रय भरणे यांच्याकडे मागणी केली होती.याच मागणीची तातडीने दखल घेत मंत्री भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीतून २० लाख रुपयाचा निधी मंजूर केला.या शेडचे भूमिपूजन आज करण्यात आले.

राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच गुराप्पा पवार, राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे,उपसरपंच सत्यवान भोसले ,बाजार समिती उपसभापती पराग जाधव ,पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे ,माजी सरपंच तानाजी वायसे ,दत्ता धवडे ,माजी उपसरपंच प्रदीप वाकसे ,अजिंक्य माडगे ,अशोक शिंदे ,जावेद शेख ,तुषार क्षीरसागर ,सचिन बोगावत ,बापूराव थोरात ,संदीप वाकसे ,मोहन शेंडगे ,वैभव देवकाते ,रोहित भरणे ,अमोल देवकाते , शुभम शेलार ,आप्पासाहेब गायकवाड ,रोहित शेलार ,विक्रम देवकाते ,निखील बोगावत ,अमोल वाघ ,आकाश उंडाळे ,दत्तात्रय पाचांगने ,अनिल तांबे  ,सुरेश बिबे ,दिनानाथ मारणे,भाऊसाहेब भरणे ,संदीप शेलार उपस्थित होते.

तक्रारवाडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ; जागतिक महिला दिनी स्तुत्य उपक्रम.

0

भिगवण वार्ताहर.दि.८

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तक्रारवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करीत त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. ग्रामपंचायत तक्रारवाडी गावच्या सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेविका ,आरोग्य उपकेंद्र अधिकारी ,वायरमन ,आरोग्य सेविका ,अंगणवाडी सेविका ,स्वस्त धान्य दुकानदार ,जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख, महिला शिक्षिका, ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचारी या सर्वच पदावर महिला काम करत असल्यामुळे दररोजच महिला दिन असतो मात्र त्यांच्या कार्याचा आजच्या दिवशी सन्मान करण्यात आला .

या जन्मात देवाला जितके महत्व दिले जाते तितकेच महत्व ‘ ती ‘ला म्हणजे महिलेला दिले जाते .ती कधी आई असते तर कधी ताई असते तसेच ती जीवनदायी आणि करुणासागर असते .याच महिलेचा सन्मान व्हावा म्हणून आजच्या दिवशी महिलादिन साजरा केला जातो.इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणार्या तक्रारवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थाच्या वतीने आज हा सन्मान घेण्यात आला.यावेळी सरपंच मनीषा वाघ ,उपसरपंच आशाताई जगताप ,ग्रामपंचायत सदस्या संगीता वाघ,प्राजक्ता वाघ,ग्रामसेविका शोभा जाधव ,उपकेंद्र आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप ,वीज मंडळ कर्मचारी गीतांजली कन्ठाळे ,कृषी अधिकारी पल्लवी काळे स्वस्त धान्य दुकानदार पार्वती जगदाळे ,जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख मनीषा दुर्गे ,राष्ट्रवादी तालुका महिला उपाध्यक्षा सीमा काळंगे , आरोग्य सेविका स्वाती शिंदे ,ज्योती जगताप ,साधना वाघ तसेच मदनवाडी गावच्या माजी सरपंच आम्रपाली बंडगर यांचा यावेळी बहुमान करण्यात आला.यावेळी सरपंच मनीषा वाघ ,विलास गडकर ,महेश वाघ ,मुख्याध्यापक राजेश नाचन , सीमा काळगे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

यावेळी माजी सरपंच सतीश वाघ ,शरद वाघ ,अंजना थोरात ,गौरी काळंगे ,दिपाली वाघ ,मनीषा चौधरी ,शोभा पिसाळ ,कविता वाघ ,संगीता खडके,तेजस्विनी भोसले ,नंदा साळुंखे, तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत तक्रारवाडी ,ग्रामस्थ तक्रारवाडी,शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने तर आभार मनीषा चौधरी यांनी मांडले .

भिगवण गावच्या हिंदू खाटीक समाजासाठी स्वखर्चाने बोअर ; बाजार समिती माजी उपसभापती पराग जाधव यांचे कौतुकास्पद कार्य

0

भिगवण वार्ताहर .दि. ७

भिगवण गावातील हिंदू खाटिक समाजाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करून बोअर मारून २४ तास पाणी उपलब्ध करण्याचे काम भिगवण गावच्या पराग जाधव यांनी केले.त्यांच्या या कामाचे कौतुक खाटिक समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खडके यांनी ‘ गावचा नेता असावा तर असा ’ उल्लेख करीत समाजाच्या वतीने सत्कार केला.

गावचा पुढारी म्हटल कि आश्वासन देन आणि नागरिक आणि प्रत्येक समाजाला झुलवत ठेवण हि परिस्थिती सर्व ठिकाणी पहावयाला मिळते .मात्र भिगवण गावात याच्या उलट परिस्थिती दिसून आली . बाजार समितीचे माजी उपसभापती आणि भिगवण गावचे सदस्य पराग रमेशराव जाधव यांनी हिंदू खाटिक समाजाला आवश्यक असणारा जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक मदत केली.फक्त जागा मिळवून देण्याचा प्रयत्न केला नाहीतर या ठिकाणी स्वतःच्या पैशाने बोअर मारून पाण्याची सोय करून दिली.त्यामुळे हिंदू खाटिक समाज बांधवांनी जाधव यांचे आभार व्यक्त केले. या बोअर पूजन आणि सत्कार समारंभासाठी सत्यवान भोसले ,दत्ता धवडे ,अमितकुमार वाघ ,देवानंद शेलार ,तानाजी वायसे ,गणेश कांबळे,राजेंद्र जमदाडे ,बबलू कांबळे ,मनोज खडके ,बंडू ताडे,प्रशांत कांबळे ,हनुमंत खडके ,सौरभ जमदाडे ,आकाश कांबळे,केतन कांबळे आदित्य थोर्पे ,रेश्मा खडके ,त्रिवेणी कांबळे ,शुभांगी कांबळे ,रुपाली ताडे,तनुजा जमदाडे उपस्थित होत्या .

यावेळी बोलताना हिंदू खाटिक समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खडके यांनी पराग जाधव यांनी समाजासाठी नेहमीच योगदान दिले असल्याचे सांगितले.समाजासाठी जागा मिळवून देण्यासाठी त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.तर आज स्वतःच्या खिशातून समाजासाठी पाणी मिळवून दिल्याने समाज त्यांचा ऋणी असल्याचे सांगितले.

भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी ;ऍग्रो कारखाना परिसरातून चोरीला गेलेला ट्रॅक्टर संशयित चोरट्यासह ताब्यात.

0

भिगवण वार्ताहर.दि.३

भिगवण पोलिसांनी दमदार कामगिरी करत उस वाहतूक करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याचा बारामती अग्रो कारखाना शेटफळ परिसरातून चोरी झालेला ट्रॅकटर हस्तगत करीत चोराच्याही मुसक्या आवळल्या .१०० ठिकाणाचे सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय गोपनीय बातमीदाराच्या मदतीने केलेल्या कामगिरी मुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील चोरटा सोमनाथ भारत शिंदे वय .२३ रा.शिंदेवस्ती बावडा ता.इंदापूर याला अटक करण्यात आले आहे.याबाबत दिलेल्या माहितीनुसार शेतकरी उस वाहतूकदार अक्षय अनिल राउत रा.केतुर ता.करमाळा यांनी बारामती शेटफळ अग्रो कारखाना येथून आपला ट्रॅकटर नंबर एम.एच.४५ ए क्यू ३२०७ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली.उस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याची झालेली चोरी भिगवण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद महांगडे यांनी गांभीर्याने घेत सदर चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील ,पोलीस अंमलदार महेश उगले ,संतोष मखरे ,सचिन पवार आणि प्रमोद गलांडे यांची टीम नियुक्त करून तपासकामी पाठविले. या टीम ने बारामती अग्रो कारखाना तसेच बावडा व इतर मार्गातील जवळपास १०० च्यावर सीसीटीव्ही चे आकलन करून तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदार याच्या माध्यमातून बावडा येथील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या .मात्र या चोरट्याने ट्रॅकटर ला असणारी जी.पी.एस सेवा भवानीनगर परिसरात काढून टाकल्याचे लक्षात आले.त्यामुळे पोलीस पथकाने संशयित चोरट्याला बोलते करून त्याने नळदुर्ग ता.धाराशिव येथे लपविलेला मुद्देमाल ताब्यात घेत कारवाई पूर्ण केली.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे ,पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील ,पोलीस अंमलदार महेश उगले,संतोष मखरे ,सचिन पवार ,प्रमोद गलांडे यांनी केली.

तक्रारवाडी बौध्द विहारासाठी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय चा 20 लाखाचा निधी ; सरपंच मनीषा वाघ यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

0

भिगवण वार्ताहर.दि.३

तक्रारवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहाराचे बांधकाम आणि सुशोभीकरण विकास कामाचे भूमिपूजन गावच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन आढाव यांनी दिली.

इंदापूर तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तक्रारवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे.याच अनुशंघाने बौद्ध समाजासाठी बौद्ध विहार बांधकाम आणि सुशोभीकरण अंतर्गत पेव्हर ब्लॉक साठी सामाजिक न्याय विभागातून २० लक्ष रुपयाचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे.याच विकास कामाचे भूमिपूजन आज विद्यमान सरपंच मनीषा वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई आढाव ,माजी सरपंच सतीश वाघ ,राष्ट्रवादी पक्षाच्या इंदापूर तालुका महिला उपाध्यक्षा सीमा काळंगे ,उपसरपंच प्रतिनिधी विजय जगताप ,माजी सरपंच अनिल काळंगे ,गणेश वायदंडे ,आण्णा आढाव माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,भाऊसाहेब वाघ ,पांडुरंग वाघ,डॉ.बाळासाहेब भोसले ,वैभव आढाव, अक्षय जोगदंड,नवनाथ पाटोळे ,तनुजा आढाव ,संगीता आढाव ,सुरज जाधव ,उमेश आढाव ,हेमंत भोसले ,योगेश गायकवाड उपस्थित होते.

यावेळी बोलताना सचिन आढाव यांनी मंत्री दतात्रय भरणे यांचे माधयामातून मिळालेल्या निधीतून सर्व तळागाळातील नागरिकांना विकास कामाचा फायदा होत असल्याचे सांगण्यात आले.तर विकास कामे होताना ती दर्जेदार व्हावी यासाठी आपण स्वतः प्रसंगी उभे राहून लक्ष देवून काम करून घेणार असल्याचे सांगितले .

जिल्हा परिषद तक्रारवाडी शाळेच्या वर्गखोलीचे अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन ; जिल्हा नियोजन समिती माध्यमातून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला विकास निधी

0

भिगवण वार्ताहर.दि.२५

तक्रारवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे भूमिपूजन भगवानराव भरणे प्रतिष्टानच्या कार्याध्यक्षा अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ,मदनवाडी गावच्या सरपंच अश्विनी बंडगर ,भिगवण गावच्या आदर्श सरपंच हेमाताई माडगे ,इंदापूर बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते ,प्रशांत शेलार ,प्रदीप वाकसे ,अजिंक्य माडगे ,प्रमोद नरुटे राजाभाऊ देवकाते ,बापूराव थोरात तसेच तक्रारवाडी ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता वाघ,उपसरपंच प्रतिनिधी विजय जगताप ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच मोहनराव वाघ तसेच इतर सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

तक्रारवाडी शाळा हि इंदापूर तालुक्यातील केंद्र शाळा असून या शाळेत जवळपास ४५० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.हे विद्यार्थी माती दगडात बांधलेल्या आणि पत्र्याच छत असणाऱ्या वर्गखोल्यात आपले शिक्षण घेत आहेत.या जुन्या काळात बांधण्यात आलेल्या शाळा खोल्या आज धोकेदायक स्थितीत असून नवीन खोल्या मिळाव्यात.यासाठी तक्रारवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मागणी केली होती.

याच मागणीचा विचार करून राज्याचे कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १ आणि पुढील टप्प्यात १४ खोल्या मंजूर केल्या आहेत.याच विकास कामाचे भूमिपूजन अनुष्का भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अनुष्का भरणे यांनी इंदापूर तालुक्याचे आमदार आणि तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तक्रारवाडी गावाला ३ कोटी ६० लाख रुपयाचा विकास निधी देण्यात आला असल्याचे सांगितले.तर गेल्या १५ वर्षात इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवीत कोट्यावधी रुपयाचा निधी तालूक्यासाठी आणला असल्यामुळे इंदापूर करांनी त्यांना तीनवेळा निवडून आणण्याची पोच पावती दिली असल्याचे सांगितले.तसेच तक्रारवाडी गावचा पुढील विकास हि त्यांच्याच माध्यमातून केला जाणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ ,राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सीमा काळंगे ,माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,विलास गडकर ,मुख्याध्यापक राजेश नाचन ,शिक्षण समिती अध्यक्ष महेश वाघ यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी भिगवण मदनवाडी तसेच भिगवण स्टेशन येथील राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली.

तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेला कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून निधी मिळाला असताना देखील राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसून आले.तर ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच आणि इतर दोन तीन सदस्य सोडता काही सदस्याची अनुपस्थिती दिसून आली.मात्र ग्रामस्थ आणि महिला तसेच पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

यावेळी कार्यक्रमाचे नियोजन माजी सरपंच अनिल काळंगे ,माजी उप सरपंच प्रशांत वाघ,सचिन आढाव ,दीनानाथ मारणे,सचिन वाघ ,विजय जगताप, बलभीम आढाव,महेश वाघ,डॉ.बाळासाहेब भोसले,नवनाथ पाटोळे ,आणासाहेब आढाव,तसेच शाळेतील शिक्षक वर्गाने केले.

भिगवण ग्रामीण रुग्णालय येथील शिबिरात 233 रुग्णांची कर्करोग तपासणी ; 8 संशयित रुग्णांना पुढील तपासणी साठी रेफर

0

भिगवण वार्ताहर.दि.१७

भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर येथे कर्करोग तपासणी व्हॅन मार्फत घेण्यात आलेल्या शिबिरात २३३ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी दिली .यावेळी शिबिरात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सचिन विभूते ,डॉ.अनिकेत लोखंडे ,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अमोल खानावरे ,डॉ.सूर्या दिवेकर ,दंतरोग तज्ञ डॉ.घोगरे ,डॉ.मृदुला जगताप ,डॉ.कीर्ती व्यवहारे ,समुदाय आरोग्य अधिकारी रेणुका कुलकर्णी ,वैदकीय अधिकारी संतोष पाटील यांच्या माध्यमातून शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली.यावेळी २ संशयित रुग्ण महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाजवळ तसेच ४ स्तनातील गाठ आणि २ मुखातील कर्करोग संशयित रुग्णाची पुढील तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले.यावेळी गट विकास अधिकारी इंदापूर सचिन खुडे यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरवात करण्यात आली.

राज्यात सुरु असलेल्या कर्करोग तपासणी आणि असंसर्गजन्य रोग कार्यक्रम तसेच माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या संकल्पनेतून आणि उपसंचालक राधाकिसन पवार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ एमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग तपासणी व्हॅन भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे आली होती.त्यावेळी हे तपासणी आणि जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर कर्करोग शिबिरामध्ये तोंडातील कॅन्सर ,स्तन कॅन्सर ,गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर याची विविध तद्न्य डॉक्टर यांच्या माध्यामातून तपासणी करण्यात आली.यावेळी जवळपास २३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली यात ८ संशयित रुग्णांना पुढील तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले. ‘ संशयित रुग्ण आढळून आल्याने हे शिबीर फलदायी ठरले असून अजूनही असेच शिबीर राबविल्यास याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होईल ’ अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे यांनी केली.

ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर येथे पार पडलेल्या शिबिराला भिगवण आणि परिसरातून अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावली.हे शिबीर चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.अनिकेत लोखंडे यांना शेटफळ गडे प्राथमिक आरोग्य अधिकारी ,समुदाय आरोग्य सहायक ,आरोग्य कर्मचारी ,आशा सेविका ,आरोग्य सेवक ,गट प्रवर्तक यांनी मदत केली.

भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा पवार यांची निवड ; कुंची कोरवी समाजातील महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मिळाला मान.

0

भिगवण वार्ताहर .दि.१४

भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा गंगाराम पवार यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी दीपक कोकरे यांनी दिली.गुप्त पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी गुराप्पा गंगाराम पवार यांना १२ मते मिळाली तर श्रीमती निर्मला हरिचंद्र पांढरे यांना ५ मते मिळाली.या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक कोकरे तसेच तलाठी राहुल देवकर आणि ग्रामपंचायत अधिकारी भगीरथ परदेशी यांनी कामकाज पाहिले.

इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायती मध्ये कुंची कोरवी समाजाचा महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मान गुरप्पा पवार यांनी मिळविला. तर भिगवण गावच्या राजकारणातील आजचा महत्वाचा दिवस म्हणून ओळखला जाणार आहे.अगदी सर्वसामान्य नागरिकाला गावच्या सरपंच पदाचा मान मिळाल्यामुळे राजकीयदृष्ट्या हि नवी नांदी मानली जात आहे .भिगवण गावची निवडणूक पार पडताच सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका पदाधिकारी पराग रमेशराव जाधव आणि तत्कालीन पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांनी व्यक्त केली होती .त्याप्रमाणे ३ सदस्यांना सरपंच पदाचा तर ३ तीन सदस्यांना उपसरपंच पद देण्याचा शब्द देण्यात आला होता.यात धनगर समाजातील सदस्याला पहिला सरपंच पदाचा मान तर तेली समाजाच्या सदस्याला दुसऱ्या वेळी आणि कुंची कोरवी समाजाच्या सदस्याला आजच्या दिवशी सरपंच पदाचा बहुमान देण्यात आला तर रामोशी , मुस्लीम आणि बौद्ध समाजाच्या सदस्याला उपसरपंच पदाचा बहुमान देवून सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न सत्तेतील कार्यकारिणीने केला .  सर्व जाती जमातीच्या सदस्यांना सत्तेतील पदाचा  लाभ देण्याचा दिशा दर्शक पायंडा भिगवण करांनी पाडला असून तो जिल्ह्यात वाखाणण्याजोगा आहे.

आजची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित असताना सरपंच पदासाठी दुसरा अर्ज दाखल करण्यात आला.त्यामुळे निवडणूक घेण्यात आली.यात सत्तेतील १६ मते विरोधातील एकच मत  असतानाही ५ सदस्यांनी आपली मते विरोधात टाकल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे.तर फुटलेली मते पदाचा मेवा चाखून झालेल्या सदस्यांची की पदे मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्या सदस्यांची याबाबत दबकी चर्चा सुरु झालीय. मात्र मतदान गुप्त असल्यामुळे नावे समजणें शक्य होणार नाही.या निवडीनंतर जयदीप जाधव ,अशोक शिंदे तसेच संजय देहाडे यांनी सुभेच्छा दिल्या तर निवनियुक्त सरपंच गुराप्पा (आपाजी )पवार यांनी आभार व्यक्त केले.   

दोन निष्पाप लेकरांचा आईनेच गळा घोटून घेतला जीव ; भिगवण शेजारील स्वामीचिंचोली येथील घटना

0

भिगवण वार्ताहर. दि. 8

आपल्याच उदरी जन्म घेतलेल्या दोन निष्पाप मुलांचा गळा दाबून जीव घेतल्यावर नवऱ्यावर धारदार शस्त्राने वार गंभीर जखमी केल्याची घटना दौड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात घडली. गंभीर जखमी नवऱ्यावर बारामती येथे उपचार. संशयित आरोपी महिलेला दौड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावामधून शनिवारी सकाळीच धक्कादायक बातमी समोर आली आहे.जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्यांचा आज पहाटे गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.सदर महिला एवढ्यावरच न थांबता आपल्या पतीवर देखील तिने कोयत्याने वार केलेत.तिच्या या क्रूर वागण्यातून तीला पूर्ण कुटुंबच संपवायचं होत काय असा सवाल उपस्थित होतो.यात पती ही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती बारामती येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे.

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून दौंड पोलिसांनी संशयित आरोपी कोमल दुर्योधन मिंढे य(वय 30) या महिलेला अटक केली आहे.

शंभू दुर्योधन मिंढे (वय ०१) आणि पियू दुर्योधन मिंढे वय (०३)अशी मयत मुलांची नावे असून या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय ३५) वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केल आहे. कौटुंबिक कलहातुन या जन्मदात्या क्रूर आईने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्तीवर पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून ही घटना समजताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.संशयित आरोपी महिला दौड पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

ग्राहक पंचायत विभागाकडून रथसप्तमी निम्मित प्रवासी दिन साजरा ; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचे ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष तुषार झेंडेपाटील यांचे आवाहन.

0

भिगवण वार्ताहर .दि.४

जगाचा आधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमी चे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,आरटीओ कार्यालय बारामती आणि भिगवण पोलीस ठाणे तसेच इंदापूर एसटी डेपो यांच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला.

समाजातील नागरिकांनी खासगी वाहतुकीच्या ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय अंगीकारावा तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी ग्राहक पंचायत पुणे यांच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी बारामती आरटीओ विशाल नाझीरकर ,भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विनोद पाटील  ,ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य सचिव अॅड तुषार झेंडेपाटील ,पुणे जिल्हा संघटक दिलावर तांबोळी ,इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर ,संघटक आबासाहेब निंबाळकर ,गणेश गुप्ते ,इंदापूर तालुका अध्यक्षा अर्चना सपकाळ ,नंदकुमार तावरे ,मनोज उदावंत ,भिगवण व्यापारी प्रतिनिधी श्रीकांत गायकवाड ,वाहतूक नियंत्रक सोमनाथ कुताळ  हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी व्यापारी प्रतिनिधी औदुम्बर हुलगे तात्यासाहेब बंडगर ,ग्राहक पंचायतीच्या सचिव नाजीया सय्यद पूनम गुप्ते दादासो भोंगळे यांनी प्रवाश्यांना गुलाब पुष्प देवून स्वागत केले.

मुख्य कार्यक्रम वेळी पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास करणाऱ्या एस.टी बसेस थांबवून या गाडीचे चालक आणि कंडक्टर यांचा फेटा बांधून सत्कार करीत बस मधील प्रवास्यांना पाणी बाटली तसेच तिळगूळ तसेच गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.यावेळी झेंडेपाटील तसेच आरटीओ नाजीरकर  यांनी बस मधील प्रवासी यांचे स्वागत करीत बस ने प्रवास केल्याने देशाचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच देशातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतल्यास अपघात प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना अॅड .तुषार झेंडे पाटील यांनी ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सांगितले.तर बारामती येथे रेल्वे प्रवाशी आणि चालकाचा सत्कार केल्याचे सांगितले.सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब केल्याने अपघाताचे प्रमाण ,हवेतील प्रदूषण आणि नागरिकाचा आणि शासनाचा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगितले.