Saturday, August 22, 2026
Home Blog Page 27

आधी दर्शन तळीरामांचे नंतर राम दुत हनुमानाचे

0

भिगवण प्रतिनिधी …. दि.१६

भिगवणमध्ये तळीरामांचा उच्छाद ; देव दर्शन आधी तळीरामांचे दर्शन असे म्हणण्याची वेळ भिगवण कर ग्रामस्थांवर आली आहे.

भिगवण मधील प्रभाग क्रं.२ मध्ये भिगवणकरांचे ग्रामदैवत असलेले भैरवनाथ मंदिर व हनुमान मंदिर आहेत. याठिकाणी भिगवण मधील रहिवाशी सकाळी व संध्याकाळी दर्शनासाठी नित्य नियमाने येत असतात. परंतु या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून तळीरामांनी उच्छाद मांडलेला दिसून येत आहे. त्यामुळे देवदर्शन आधी तळीरामांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे भिगवण पोलिसांनी या तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

भिगवण मधील प्रभाग क्रं २ मध्ये श्री भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर व त्या लगतच शाळा व महाविद्यालय आहेत. याठिकाणी देवदर्शनासाठी अनेक भिगवण मधील ग्रामस्थ येत असतात. तसेच, शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. याठिकाणी नेहमीच तळीरामांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो.

परंतु गेल्या काही दिवसापसून सकाळपासूनच हे तळीराम गर्दी करून या ठिकाणी अश्लील प्रकारची शिवीगाळ करत आहेत. त्यामुळे याठिकाणी देवदर्शनासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे.

त्यामुळे पोलिसांनी या उच्छाद मांडलेल्या तळीरामांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

डिकसळ येथील व्यायामशाळेच्या बांधकामासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास काळे यांचा उपोषणाचा इशारा

0

डिकसळ रिपोर्टर . दि.१६
डिकसळ ता.इंदापुर येथे पुणे जिल्हा परिषद यांचेकडुन मा.बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण भैय्या माने यांच्या विशेष प्रयत्नातुन प्रभाग क्र. 1 मध्ये मुलांना व्यायाम करता यावा या उद्देशाने ५ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला होता. सदर व्यायाम शाळेसाठी ग्रामपंचायतीकडुन जागा निश्चित करून भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. परंतु आजपर्यंत बांधकाम चालु झाले नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण काळे यांनी वारंवार ग्रामपंचायला विचारणा केली आसता सदर जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले असुन ते काढले की काम चालु करू असे सांगितले जात होते.परंतु आजपर्यंत अतिक्रमण काढले नाही.

संबंधित काम सुरू करण्यास विलंब झाल्यास आलेला निधी परत जाऊ शकतो. म्हणून येथील कायमस्वरूपी रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते विकास काळे यांनी आठ दिवसांत अतिक्रमण काढुन बांधकाम सुरू न केल्यास योग्य त्या कार्यलयांशी योग्य ती परवानगी घेऊन ग्रामपंचायत कार्यलयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा लेखी पत्रानुसार ग्रामपंचायतला दिला असुन यांची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतची असेल असे सदर लेखी पत्रात विकास काळे यांनी म्हटले आहे.
याबाबत ग्रामसेवक डी.बी.परदेशी यांच्याशी संपर्क साधला आसता अतिक्रमण केलेल्या लोकांना ग्रामपंचायत यांनी नोटीसा दिल्या असुन ग्रामपंचायत सदस्य यांची ताबडतोब मिंटीग घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले

भिगवण येथे स्व. रमेश बापू जाधव प्रेरित श्रीनाथ ग्राम विकास सर्वपक्षीय आघाडीची घोषणा

0

भिगवण वार्ताहर . दि.१६

इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडनुकीचा बिगुल वाजला आहे. याच अनुषगाने (दि. १५) रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात ‘स्वर्गीय रमेश बापू जाधव’ प्रेरित ‘श्रीनाथ ग्राम विकास सर्वपक्षीय पॅनल’ ची घोषणा ज्येष्ठ नेते अशोकराव शिंदे यांनी केली.

यावेळी बोलताना अशोकराव शिंदे यांनी सांगितले की, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वर्षांपूर्वी ‘एक बदल घडवा सगळे बदल घडतील’. असे स्वप्न दाखवून भिगवण ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली. परंतु, या पाच वर्षांमध्ये भिगवणच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेही बदल झालेले भिगवणकरांना दिसून आलेले नाहीत. परंतु सत्तेची संगीत खुर्ची करण्याचा सगळ्यात मोठा बदल सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. सरपंच व उपसरपंच पदाची अवहेलना करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांमध्ये केले. जी काही विकास कामे झाली ती देखील निकृष्ट दर्जाची करण्यात आली. तर नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याचा अधिकार असताना याबाबत कोणतेही काम न केल्यामुळे भिगवन कर नागरिकांना खिशाला चाट बसवून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.तर गोरगरिबासाठी उजनीच्या काळया पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. त्यामुळें आमचा पॅनल निवडून आल्यास सर्वांसाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी योजना राबवली जाणार असल्याचे घोषणा करताना सांगितले.

श्रीनाथ ग्रामविकास पॅनल हे सर्व पक्षीय असून, यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन, भिगवणच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. विकास कामासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामपंचायतीचा कारभार करणार आहोत. तसेच गावांमध्ये सामाजिक सलोखा राखून गावचे गाव पण जपण्यासाठी प्रयत्न करू व लोकाभिमुख, स्थिर कारभार करण्यावर भर देऊ. सामाजिक कामांमध्ये रस असणाऱ्या शांत व संयमी उमेदवारांना संधी देऊन स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्यावर भर देणार असल्याचे देखील यावेळी बोलताना सांगितले.

निवडून आलेले सदस्य ग्रामंचायत विकास कामात ठेकेदार म्हणून समोर येणार नाहीत
सरपंच उपसरपंच यांच्या पदाची संगीत खुर्ची करून पदाचा अवमान केला जाणार नाही
सर्वधर्मीय सदस्यांना विचारात घेवून शांत संयमी उमेदवार निवडले जातील.

या पत्रकार परिषदेसाठी पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,संजय रायसोनी ,पराग जाधव , तुषार क्षीरसागर ,खंडू राव गाडे ,कपिल भाकरे तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अजित क्षीरसागर यांनी केले. तर आभार गुलामभाई शेख यांनी मानले.

अतिक्रमनावर कारवाईस ग्रामपंचायतीची दिरंगाई, तक्रारवाडी ग्रामंचायत कार्यालया समोर राजेंद्र गोडसे यांचे उपोषण

0

भिगवन वार्ताहर. दि . ७

तक्रारवाडी (ता. इंदापूर) या गावात अतिक्रमणाचा कहर वाढला असून अतिक्रमण करणाऱ्यांनी आता खाजगी मिळकतदारांचे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण केले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे.

उजनी धरणाच्या निर्मिती वेळी पुनर्वसित झालेल्या तक्रारवाडी गावाला चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा पडला असून दिवसेंदिवस या अतिक्रमणामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आता गावातील मिळकत धारकाला आपल्या घराच्या जागेवर जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने राजेंद्र गोडसे या नागरिकाला चक्क आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. गावातील पुढारी आपल्या राजकारनाची पोळी भाजली जावी यासाठी अतिक्रमणा खतपाणी घालत असल्याचा गोडसे यांचा आरोप आहे.तर ग्रामंचायत प्रशासक आणि ग्रामसेवक अतिक्रमण करणाऱ्या ना पाठबळ देत असल्याचे म्हणणे आहे.

तक्रारवाडी उपोषणाच्या प्रकरणी घटना स्थळी भेट देताना प्रशासक दिलीप जगताप आणि ग्रामसेवक बोरावके पोलीस पाटील अमर धुमाळ

तक्रारवाडी ग्रामपंचायतीसमोर गोडसे यांनी उपोषण सुरू केले असून जोपर्यंत आपल्या जागे समोरील अतिक्रमण काढले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे यांचे म्हणणे आहे. गोडसे यांच्या म्हणण्यानुसार तक्रारवाडी गावातील शासकीय जागेत शरद संपतराव वाघ , शशिकांत संपतराव वाघ या दोघांनी पक्के बांधकाम केले असून शासकीय जागेचा अनधिकृतपणे ताबा घेतला आहे. तर युवराज उत्तम काळगे, विकास संजय वाघ यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून जनावरांचा गोठा व त्याचे शेणखत टाकून ताबा घेतलेला आहे त्यामुळे गोडसे यांना त्यांच्या जागेवर जाण्यासाठी प्रतिबंध होत असून सदर इसम दहशत निर्माण करीत आहेत तसेच दमदाटी आणि शिवीगाळ करण्याचा प्रकार केला जात आहे .

आरोग्य सेविका सिंड्रेला चोपडे , वर्षा कदम ,उषा दिवेकर उपोषण कर्त्याची आरोग्य तपासणी करताना .

याबाबत गोडसे यांनी उपविभागीय कार्यालय तहसीलदार कार्यालय तसेच गट विकास अधिकारी भिगवण पोलिस स्टेशन यांना याबाबत निवेदन दिले असून ग्रामपंचायत तक्रारवाडी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे.

तक्रारवाडी गावात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून पुढारी आपल्या स्वार्थासाठी नागरिकात फूट पाडण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे .दिवसा अतिक्रमण करणार्‍यांना साथ देताना रात्री ज्यांना अतिक्रमणाच्या त्रास होत आहे अशांना उपोषणाचे मार्ग सुचविले जात आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी होण्याची गरज निर्माण झाली असून अशा पुढाऱ्यांना आपली जागा दाखवण्याची वेळआलेली आहे.

जिल्हा पालक सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची तुषार झेंडेपाटील यांची मागणी

0

भिगवण वार्ताहर.दि.४

जिल्हा पालक सचिव (मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रमुख )शासन निर्णयाचे परिपत्रकाचे उलंघन करून लोकशाहीची चेष्टा करीत असल्याने त्यांचेवर विधान सभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी केली.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,मुख्य सचिव संजय कुमार ,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच विरोधी पक्षनेता यांना निवेदन पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्यामध्ये जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांच्या शासन स्तरावर (मंत्रालय)प्रलंबित बाबींची तातडीने सोडवणूक व्हावी तसेच शासनाने धोरणात्मक निर्णय प्रशासकीय सुधारणा आणि विविध लोकोपयोगी व कल्याणकारी योजनांची व लोकशाही दिनाची प्रभावी पणे अंमलबजावणी करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक सचिव यांची सन २००० पासून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत असे असताना पालक सचिवांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात वर्षातून चार दौरे करणे आवश्यक असताना एकही दौरा केलेला नाही.

आपत्कालीन परिस्थितीत पालक सचिवांनी दौरा करणे अत्यावश्यक असताना राज्यातील एकाही पालक सचिवाने दौरा केलेला नाही.जिल्हा पालक सचिवानी त्यांच्या अधिपत्याखालील विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचे व त्याव्यतिरीक्त अन्य एका विभागाच्या कार्यालयाचे निरीक्षण करणे आवश्यक असताना एकही निरीक्षण केले नाही.

पालक सचिवानी एक ग्रामसेवक ,तलाठी ,भूमिलेख कार्यालयाचे निरीक्षण करणे आवश्यक असताना राज्यातील एकाही पालक सचिवाने निरीक्षण करून अहवाल दिलेला नाही..जिल्ह्यातील आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेवून प्रतिबंध उपाय योजना सुचविणे आवश्यक असताना याबाबतही कोणतेही कामकाज करण्यात आले नाही तसेच एकूण दिलेल्या जबाबदारी चे पालन केले नाही.तसेच लोकशाही दिनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठीच पालक सचिवांची संकल्पना अस्तित्वात येवून नेमणुका करण्यात आलेल्या असताना नियुक्त अधिकारी याचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे एकप्रकारे लोकशाहीची चेष्टाच हे अधिकारी करत असल्याचे झेंडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.याबाबत झेंडेपाटील यांनी मुख्यमंत्री ,विधानसभा सभा अध्यक्ष ,विरोधी पक्षनेता यांना यांना या निवेदनाची प्रत ईमेल करून हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर जीवघेणा हल्ला

0

भिगवण वार्ता.13

इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर काही अज्ञात इसमाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवे वरील असणारे आबासाहेब देवकाते यांचे घराशेजारील हॉटेलवर हा प्रकार घडला रात्री उशिरा जेवणासाठी आलेल्या या सहा अज्ञात इसमानी काही कारणावरून हॉटेलचे मालक संतोष देवकाते यांच्याशी वाद करीत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते

यावेळी हॉटेलमधील असणाऱ्या कामगारांनी याची माहिती आबासाहेब देवकाते यांना दिली यावेळी आबासाहेब देवकाते यांनी नक्की झालेला प्रकार काय आहे याची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी गेले असता अज्ञात इसमांनी त्यांच्यावर लाकडी दांडके घेऊन हल्ला केला यातील एक हल्ला आबासाहेब देवकते यांच्यावर मी झाले ते गंभीर जखमी झाले.

चॉकलेट कलरच्या चे एम जी हेक्टर वाहनातून आलेले सदर अज्ञात इसम सोलापूरच्या बाजूने येऊन पुन्हा त्याच दिशेने निघून गेले. जखमी अवस्थेत देवकाते यांना भिगवण येथील भिगवन आयसीयू सेंटर प्राथमिक उपचार करून पुणे येथील रुबी हॉल येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

वर्मी घाव बसल्यामुळे जखमी झालेले देवकाते यांचेवर पुणे येथील रूबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत माहिती मिळताच भिगवण पोलिस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी जाऊन हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली.

भिगवण बारामती राज्यमार्गावरील वाहतुकीस होणारा अडथळा दूर करून अनधिकृत पार्किंग बंद करण्याची मागणी

0

भिगवण वार्ताहर.दि.२२


भिगवण बारामती राज्यमार्गावरील वाहतुकीस होणारा अडथळा दूर करून अनधिकृत पार्किंग बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच पुणे जिल्हाआधीकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती राज्य ग्राहक संरक्षण समिती सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी दिली.

तसेच या अडथळ्यामुळे अपघात घडून जीवित हानी झाल्यास सबंधित प्रशासनावर जबाबदारी निश्चित करून या निवेदनाचा न्यायालयीन प्रक्रियेत पुरावा म्हणून सादर करणार असल्याचे निवेदनात सूचित करण्यात आले आहे.

एकाच बाजूने सुरू असणाऱ्या वाहतुकीमुळे जीव धोक्यात घालून वाहने चालविता दुचाकीस्वार

भिगवण बारामती राज्य मार्गावरील पिंपळे आणि शेटफळ गावाच्या हद्दीत जवळ पास २ ते ३ किलोमीटर उस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रांग लागल्याचे चित्र महिनाभरा पासून पहावयास मिळत आहे.याठिकाणी वाहने तासंतास आपल्या नंबरची वाट पाहत थांबलेली असतात त्यामुळे राज्य मार्गाची एक बाजू प्रवासासाठी बंद ठेवली जाते.तर काही वाहन चालक आडमुठे स्वभावाचे आणि आपला नंबर यावा यासाठी दुसऱ्या बाजूच्या वाहनाचा विचार न करता वाहने घुसवीत असतात त्यामुळे हा पूर्ण रस्ताच बंद होतो.तसेच इतर वाहन धारकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो.तसेच यातून अनेक वेळा अपघात घडत असल्याचे दिसून आल्याने झेंडेपाटील यांनी आर.टी.ओ आणि जिल्हाआधीकारी यांना याबाबत निवेदन देले असल्याचे सांगितले.

तर कारखाना परिसरात जागाच उपलब्ध नसल्याने नाईलाजाने वाहने मुख्य रस्त्यावर उभी करावी लागत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

कारखान्याची वाहने रस्त्यावर तासनतास उभी राहत असल्याने बारामती भिगवण रस्ता बंद राहत असताना यावर भिगवण पोलीस तसेच बारामती आर टी ओ राजकीय दबावाखाली कोणतीही कारवाई करीत नसल्याची प्रवासी नागरिकांची तक्रार आहे.याबाबत जिल्हाधिकारी आणि आर टी ओ यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बारामती भिगवण राज्य मार्गावर पार्कींग करण्यात आलेली उसाची वाहने

भिगवण बारामती राज्य मार्गावरील मदनवाडी घाटात उस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रोज होणारी सर्कस व्हिडिओ माध्यमातून सोशल मिडीयावर फिरत आहे.तर या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचा गोळा आल्याशिवाय राहत नाही.

या अनाधिकृत पार्किंग मुळे अनेक अपघात घडत असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे .यामुळेच या अपघातात जीवित हानी झाल्यास याची जबाबदारी सबंधित विभागावर निश्चित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असल्याची माहिती तुषार झेंडेपाटील यांनी दिली.

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोन आरोपींना अटक

0

भिगवण वार्ताहर. दि. २१

भिगवन पोलिसांनी (दि.२०) रोजी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोन आरोपींना अटक केली. याप्रकरणी एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या पथकाला यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दादासो रामचंद्र दराडे व महादेव चंद्रकांत दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर जि. पुणे) या दोन आरोपींना अटक केली आहे.

भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, (दि.२० रोजी) भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना खबऱ्या मार्फत मिळालेल्या बातमीनुसार अकोले येथील गणपती मंदिरासमोरील रोडवर सदर आरोपी आपल्या ताबेतील मारुती सुझुकी कार नं  एम एच ४२ ए एस ०००८ हिचे मधून एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्टल), ४ जिवंत काडतुसे जवळ बाळगून फिरत असल्याची खबर मिळाली होती. यावरून भिगवण पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपी व त्यांच्या कडील एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे किं.रु. ५,५०,८०० / – चा मुद्देमाल हस्तगत केला‌. तसेच सदर गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला देखील सापळा रचून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार नाना वीर, पोलीस नाईक गोरख पवार, इन्कलाब पठाण यांनी केली.

पुणे जिल्ह्यात आज पर्यंत भिगवण पोलिसांनी केलेली अग्निशस्त्र कारवाई मोठी आहे. आतापर्यंत भिगवन पोलिसांनी सतरा च्या वर अग्निशस्त्र जप्त केलेली आहेत .

भिगवण परिसरात  वसुली करिता अग्निशस्त्र जात असल्याची आज पर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती. तसेच वाळू माफिया आपली दहशत नागरिकात पसरावी यासाठी कमरेला घोडे लावून फिरत असल्याची चर्चा होती मात्र भिगवन पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे आत्ता या वसुली करणारे आणि वाळू माफिया यांच्यात कमालीची घबराहट पसरली असल्याचे पाहायला मिळत आहेत तर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आतापर्यंत किती जणांनी अशी अग्निशस्त्र घेतले आहेत. त्यांच्या नावाची यादी बाहेर काढणे गरजेचे झाले आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवण आणि परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत पीठ गिरणी

0

भिगवन वार्ता दि. ९


महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवण आणि परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत पीठ गिरणी चे वाटप केले जाणार असल्याची माहिती इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी दिली आहे.

इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे 

रोजच्या स्वयंपाकाचे दळण हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय त्यातच सध्या होत असलेली गिरणीची दरवाढ आणि वेळेचा अपंग आहे यामुळे महिलांचा बराचवेळ दळण करण्याचा असतो . राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या विशेष प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील आणि भिगवण परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत गिरणीचे वाटप करण्यात करण्याचे काम हाती घेतले आहे असे माहिती इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय भाऊ देहाडे यांनी दिली आहे उपसभापती देहाडे यांच्या सहकार्याने अनेक महिलांना अनेक महिलांना शिलाई मशीन तसेच अनेक पंचायत समिती योजनांचा लाभ मिळालेला आहे त्यातच आता महिलांना मिळत असलेल्या गिरणी मुळे महिलांनी याचा फायदा होणार असून रोजच्या कटकटी त्यांची सुटका होणार आहे.

गरजू महिलांना याबाबत उपसभापती संजय दराडे यांच्या कार्यालयात याबाबतची माहिती दिली जाणार आहे तर संपर्कासाठी सचिन खडके कपिल भाकरे आकाश देहाडे जावेदभाई शेख ,प्रताप भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे गरजू महिलांनी आपले आधार कार्ड जवळ बाळगणेस सांगण्यात आले आहे.

शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय.८२) यांचे अल्पशा आजाराने निधन

0

भिगवण वार्ताहर .7
भादलवाडी येथील शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय.८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. इंदापूर तालुक्यातील बहुतेक गावात आणि परिसरात त्यांना साहेब या उपाधीने ओळखले जात होते .

गुलाबराव कन्हेरकर यांनी खडकवासला कालव्याचे पाणी, ऊसाला एफ.आर.पी., शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट आदींसाठी मोठा संघर्ष केला होता. गुलाबराव कन्हेरकर यांच्या निधनानेशेतकरी संघटनेचा अभ्यासू व लढवय्या नेता हरपला अशी भावना शेतकऱ्यांमधुन व्यक्त होत आहे.

भादलवाडी(ता.इंदापुर) येथील शेतकरी कुटुंबातील गुलाबराव कन्हेरकर यांनी सहकार खात्यांमध्ये प्रथम श्रेणी सहकार अधिकारी म्हणुन ३६ वर्षे सेवा
केली होती. १९९७ साली सहकार खात्यातुन सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सहकार खात्यातील अनुभवाचा उपयोग करुन इंदापुर तालुक्यामध्ये अनेक सहकारी
दुधसंस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटया, सहकारी पाणी वापर संस्था, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था निर्माण करण्यात महत्वपुर्ण भुमिका
निभावली. २०१० मध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांचे विनंतीवरुन शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस म्हणुन त्यांनी धुरा सांभाळली.

पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात शेतकरी संघटना वाढीसाठी त्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. ऊसासाठी एफ.आर.पी., शेतीमालास आधारभुत किंमत, शेतकऱ्यांना कार्बन
क्रेडिट यासाठी त्यांनी संघर्ष केला. इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला धरणातील पाण्यासाठी त्यांनी रस्त्यावर व कोर्टाच्या माध्यमातून लढा दिला.
सहकारातील अनुभवाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन समृध्द करणारा व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अभ्यासपुर्ण पध्दतीने लढा उभारणारा लढवय्या नेता हरपला अशी भावना शेतकऱ्यांमधुन व्यक्त होत आहे. सत्यवार्ता न्युज परिवाराच्या वतीने लढवय्या नेत्याला भावपुर्ण आदांजली