Friday, July 4, 2025
Home Blog Page 2

तक्रारवाडी बौध्द विहारासाठी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय चा 20 लाखाचा निधी ; सरपंच मनीषा वाघ यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

0

भिगवण वार्ताहर.दि.३

तक्रारवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहाराचे बांधकाम आणि सुशोभीकरण विकास कामाचे भूमिपूजन गावच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन आढाव यांनी दिली.

इंदापूर तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तक्रारवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे.याच अनुशंघाने बौद्ध समाजासाठी बौद्ध विहार बांधकाम आणि सुशोभीकरण अंतर्गत पेव्हर ब्लॉक साठी सामाजिक न्याय विभागातून २० लक्ष रुपयाचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे.याच विकास कामाचे भूमिपूजन आज विद्यमान सरपंच मनीषा वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई आढाव ,माजी सरपंच सतीश वाघ ,राष्ट्रवादी पक्षाच्या इंदापूर तालुका महिला उपाध्यक्षा सीमा काळंगे ,उपसरपंच प्रतिनिधी विजय जगताप ,माजी सरपंच अनिल काळंगे ,गणेश वायदंडे ,आण्णा आढाव माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,भाऊसाहेब वाघ ,पांडुरंग वाघ,डॉ.बाळासाहेब भोसले ,वैभव आढाव, अक्षय जोगदंड,नवनाथ पाटोळे ,तनुजा आढाव ,संगीता आढाव ,सुरज जाधव ,उमेश आढाव ,हेमंत भोसले ,योगेश गायकवाड उपस्थित होते.

यावेळी बोलताना सचिन आढाव यांनी मंत्री दतात्रय भरणे यांचे माधयामातून मिळालेल्या निधीतून सर्व तळागाळातील नागरिकांना विकास कामाचा फायदा होत असल्याचे सांगण्यात आले.तर विकास कामे होताना ती दर्जेदार व्हावी यासाठी आपण स्वतः प्रसंगी उभे राहून लक्ष देवून काम करून घेणार असल्याचे सांगितले .

जिल्हा परिषद तक्रारवाडी शाळेच्या वर्गखोलीचे अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन ; जिल्हा नियोजन समिती माध्यमातून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला विकास निधी

0

भिगवण वार्ताहर.दि.२५

तक्रारवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे भूमिपूजन भगवानराव भरणे प्रतिष्टानच्या कार्याध्यक्षा अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ,मदनवाडी गावच्या सरपंच अश्विनी बंडगर ,भिगवण गावच्या आदर्श सरपंच हेमाताई माडगे ,इंदापूर बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते ,प्रशांत शेलार ,प्रदीप वाकसे ,अजिंक्य माडगे ,प्रमोद नरुटे राजाभाऊ देवकाते ,बापूराव थोरात तसेच तक्रारवाडी ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता वाघ,उपसरपंच प्रतिनिधी विजय जगताप ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच मोहनराव वाघ तसेच इतर सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

तक्रारवाडी शाळा हि इंदापूर तालुक्यातील केंद्र शाळा असून या शाळेत जवळपास ४५० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.हे विद्यार्थी माती दगडात बांधलेल्या आणि पत्र्याच छत असणाऱ्या वर्गखोल्यात आपले शिक्षण घेत आहेत.या जुन्या काळात बांधण्यात आलेल्या शाळा खोल्या आज धोकेदायक स्थितीत असून नवीन खोल्या मिळाव्यात.यासाठी तक्रारवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मागणी केली होती.

याच मागणीचा विचार करून राज्याचे कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १ आणि पुढील टप्प्यात १४ खोल्या मंजूर केल्या आहेत.याच विकास कामाचे भूमिपूजन अनुष्का भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अनुष्का भरणे यांनी इंदापूर तालुक्याचे आमदार आणि तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तक्रारवाडी गावाला ३ कोटी ६० लाख रुपयाचा विकास निधी देण्यात आला असल्याचे सांगितले.तर गेल्या १५ वर्षात इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवीत कोट्यावधी रुपयाचा निधी तालूक्यासाठी आणला असल्यामुळे इंदापूर करांनी त्यांना तीनवेळा निवडून आणण्याची पोच पावती दिली असल्याचे सांगितले.तसेच तक्रारवाडी गावचा पुढील विकास हि त्यांच्याच माध्यमातून केला जाणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ ,राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सीमा काळंगे ,माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,विलास गडकर ,मुख्याध्यापक राजेश नाचन ,शिक्षण समिती अध्यक्ष महेश वाघ यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी भिगवण मदनवाडी तसेच भिगवण स्टेशन येथील राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली.

तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेला कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून निधी मिळाला असताना देखील राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसून आले.तर ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच आणि इतर दोन तीन सदस्य सोडता काही सदस्याची अनुपस्थिती दिसून आली.मात्र ग्रामस्थ आणि महिला तसेच पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

यावेळी कार्यक्रमाचे नियोजन माजी सरपंच अनिल काळंगे ,माजी उप सरपंच प्रशांत वाघ,सचिन आढाव ,दीनानाथ मारणे,सचिन वाघ ,विजय जगताप, बलभीम आढाव,महेश वाघ,डॉ.बाळासाहेब भोसले,नवनाथ पाटोळे ,आणासाहेब आढाव,तसेच शाळेतील शिक्षक वर्गाने केले.

भिगवण ग्रामीण रुग्णालय येथील शिबिरात 233 रुग्णांची कर्करोग तपासणी ; 8 संशयित रुग्णांना पुढील तपासणी साठी रेफर

0

भिगवण वार्ताहर.दि.१७

भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर येथे कर्करोग तपासणी व्हॅन मार्फत घेण्यात आलेल्या शिबिरात २३३ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी दिली .यावेळी शिबिरात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सचिन विभूते ,डॉ.अनिकेत लोखंडे ,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अमोल खानावरे ,डॉ.सूर्या दिवेकर ,दंतरोग तज्ञ डॉ.घोगरे ,डॉ.मृदुला जगताप ,डॉ.कीर्ती व्यवहारे ,समुदाय आरोग्य अधिकारी रेणुका कुलकर्णी ,वैदकीय अधिकारी संतोष पाटील यांच्या माध्यमातून शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली.यावेळी २ संशयित रुग्ण महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाजवळ तसेच ४ स्तनातील गाठ आणि २ मुखातील कर्करोग संशयित रुग्णाची पुढील तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले.यावेळी गट विकास अधिकारी इंदापूर सचिन खुडे यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरवात करण्यात आली.

राज्यात सुरु असलेल्या कर्करोग तपासणी आणि असंसर्गजन्य रोग कार्यक्रम तसेच माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या संकल्पनेतून आणि उपसंचालक राधाकिसन पवार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ एमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग तपासणी व्हॅन भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे आली होती.त्यावेळी हे तपासणी आणि जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर कर्करोग शिबिरामध्ये तोंडातील कॅन्सर ,स्तन कॅन्सर ,गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर याची विविध तद्न्य डॉक्टर यांच्या माध्यामातून तपासणी करण्यात आली.यावेळी जवळपास २३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली यात ८ संशयित रुग्णांना पुढील तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले. ‘ संशयित रुग्ण आढळून आल्याने हे शिबीर फलदायी ठरले असून अजूनही असेच शिबीर राबविल्यास याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होईल ’ अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे यांनी केली.

ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर येथे पार पडलेल्या शिबिराला भिगवण आणि परिसरातून अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावली.हे शिबीर चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.अनिकेत लोखंडे यांना शेटफळ गडे प्राथमिक आरोग्य अधिकारी ,समुदाय आरोग्य सहायक ,आरोग्य कर्मचारी ,आशा सेविका ,आरोग्य सेवक ,गट प्रवर्तक यांनी मदत केली.

भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा पवार यांची निवड ; कुंची कोरवी समाजातील महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मिळाला मान.

0

भिगवण वार्ताहर .दि.१४

भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा गंगाराम पवार यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी दीपक कोकरे यांनी दिली.गुप्त पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी गुराप्पा गंगाराम पवार यांना १२ मते मिळाली तर श्रीमती निर्मला हरिचंद्र पांढरे यांना ५ मते मिळाली.या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक कोकरे तसेच तलाठी राहुल देवकर आणि ग्रामपंचायत अधिकारी भगीरथ परदेशी यांनी कामकाज पाहिले.

इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायती मध्ये कुंची कोरवी समाजाचा महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मान गुरप्पा पवार यांनी मिळविला. तर भिगवण गावच्या राजकारणातील आजचा महत्वाचा दिवस म्हणून ओळखला जाणार आहे.अगदी सर्वसामान्य नागरिकाला गावच्या सरपंच पदाचा मान मिळाल्यामुळे राजकीयदृष्ट्या हि नवी नांदी मानली जात आहे .भिगवण गावची निवडणूक पार पडताच सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका पदाधिकारी पराग रमेशराव जाधव आणि तत्कालीन पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांनी व्यक्त केली होती .त्याप्रमाणे ३ सदस्यांना सरपंच पदाचा तर ३ तीन सदस्यांना उपसरपंच पद देण्याचा शब्द देण्यात आला होता.यात धनगर समाजातील सदस्याला पहिला सरपंच पदाचा मान तर तेली समाजाच्या सदस्याला दुसऱ्या वेळी आणि कुंची कोरवी समाजाच्या सदस्याला आजच्या दिवशी सरपंच पदाचा बहुमान देण्यात आला तर रामोशी , मुस्लीम आणि बौद्ध समाजाच्या सदस्याला उपसरपंच पदाचा बहुमान देवून सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न सत्तेतील कार्यकारिणीने केला .  सर्व जाती जमातीच्या सदस्यांना सत्तेतील पदाचा  लाभ देण्याचा दिशा दर्शक पायंडा भिगवण करांनी पाडला असून तो जिल्ह्यात वाखाणण्याजोगा आहे.

आजची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित असताना सरपंच पदासाठी दुसरा अर्ज दाखल करण्यात आला.त्यामुळे निवडणूक घेण्यात आली.यात सत्तेतील १६ मते विरोधातील एकच मत  असतानाही ५ सदस्यांनी आपली मते विरोधात टाकल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे.तर फुटलेली मते पदाचा मेवा चाखून झालेल्या सदस्यांची की पदे मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्या सदस्यांची याबाबत दबकी चर्चा सुरु झालीय. मात्र मतदान गुप्त असल्यामुळे नावे समजणें शक्य होणार नाही.या निवडीनंतर जयदीप जाधव ,अशोक शिंदे तसेच संजय देहाडे यांनी सुभेच्छा दिल्या तर निवनियुक्त सरपंच गुराप्पा (आपाजी )पवार यांनी आभार व्यक्त केले.   

दोन निष्पाप लेकरांचा आईनेच गळा घोटून घेतला जीव ; भिगवण शेजारील स्वामीचिंचोली येथील घटना

0

भिगवण वार्ताहर. दि. 8

आपल्याच उदरी जन्म घेतलेल्या दोन निष्पाप मुलांचा गळा दाबून जीव घेतल्यावर नवऱ्यावर धारदार शस्त्राने वार गंभीर जखमी केल्याची घटना दौड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात घडली. गंभीर जखमी नवऱ्यावर बारामती येथे उपचार. संशयित आरोपी महिलेला दौड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावामधून शनिवारी सकाळीच धक्कादायक बातमी समोर आली आहे.जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्यांचा आज पहाटे गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.सदर महिला एवढ्यावरच न थांबता आपल्या पतीवर देखील तिने कोयत्याने वार केलेत.तिच्या या क्रूर वागण्यातून तीला पूर्ण कुटुंबच संपवायचं होत काय असा सवाल उपस्थित होतो.यात पती ही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती बारामती येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे.

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून दौंड पोलिसांनी संशयित आरोपी कोमल दुर्योधन मिंढे य(वय 30) या महिलेला अटक केली आहे.

शंभू दुर्योधन मिंढे (वय ०१) आणि पियू दुर्योधन मिंढे वय (०३)अशी मयत मुलांची नावे असून या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय ३५) वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केल आहे. कौटुंबिक कलहातुन या जन्मदात्या क्रूर आईने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्तीवर पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून ही घटना समजताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.संशयित आरोपी महिला दौड पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

ग्राहक पंचायत विभागाकडून रथसप्तमी निम्मित प्रवासी दिन साजरा ; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचे ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष तुषार झेंडेपाटील यांचे आवाहन.

0

भिगवण वार्ताहर .दि.४

जगाचा आधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमी चे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,आरटीओ कार्यालय बारामती आणि भिगवण पोलीस ठाणे तसेच इंदापूर एसटी डेपो यांच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला.

समाजातील नागरिकांनी खासगी वाहतुकीच्या ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय अंगीकारावा तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी ग्राहक पंचायत पुणे यांच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी बारामती आरटीओ विशाल नाझीरकर ,भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विनोद पाटील  ,ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य सचिव अॅड तुषार झेंडेपाटील ,पुणे जिल्हा संघटक दिलावर तांबोळी ,इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर ,संघटक आबासाहेब निंबाळकर ,गणेश गुप्ते ,इंदापूर तालुका अध्यक्षा अर्चना सपकाळ ,नंदकुमार तावरे ,मनोज उदावंत ,भिगवण व्यापारी प्रतिनिधी श्रीकांत गायकवाड ,वाहतूक नियंत्रक सोमनाथ कुताळ  हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी व्यापारी प्रतिनिधी औदुम्बर हुलगे तात्यासाहेब बंडगर ,ग्राहक पंचायतीच्या सचिव नाजीया सय्यद पूनम गुप्ते दादासो भोंगळे यांनी प्रवाश्यांना गुलाब पुष्प देवून स्वागत केले.

मुख्य कार्यक्रम वेळी पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास करणाऱ्या एस.टी बसेस थांबवून या गाडीचे चालक आणि कंडक्टर यांचा फेटा बांधून सत्कार करीत बस मधील प्रवास्यांना पाणी बाटली तसेच तिळगूळ तसेच गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.यावेळी झेंडेपाटील तसेच आरटीओ नाजीरकर  यांनी बस मधील प्रवासी यांचे स्वागत करीत बस ने प्रवास केल्याने देशाचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच देशातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतल्यास अपघात प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना अॅड .तुषार झेंडे पाटील यांनी ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सांगितले.तर बारामती येथे रेल्वे प्रवाशी आणि चालकाचा सत्कार केल्याचे सांगितले.सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब केल्याने अपघाताचे प्रमाण ,हवेतील प्रदूषण आणि नागरिकाचा आणि शासनाचा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगितले.

रंगीबेरंगी जरबेरा म्हणून नागझरी गवताची भिगवण बाजारपेठेत विक्री ;पोलिसांना माहिती मिळताच टोळीने केला पोबारा

0

समुद्र किनारी उगावणारे नागझरी गवताची बेटे जरबेरा म्हणून घेऊन फ़सू नये महाराष्ट्र ऍग्रो एजन्सी चे संचालक किरण नगरे यांची माहिती..

भिगवण वार्ताहर.दि.२

शिकलेली आणि हुशार मानस फसतात मात्र फसवणूक करणारा पट्टीतला पाहिजे ’ अस नेहमीच बोलल जात आणि त्याचा प्रत्यय रविवारीच्या बाजार दिवशी भिगवणकरांनी घेतला . समुद्र किनार्यावर उगवणारे गवत रंगीबेरंगी जरबेरा फुलांची बेट म्हणून घेत खिशाला चाट बसविला .याची माहिती जाणकार पत्रकाराने पोलीस ठाण्याला देताच चाहूल लागल्याने गवत विक्री करणार्यांनी आपला बोजा बिस्तारा आवळून धूम ठोकली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि भिगवण बाजार पेठेतील गजबजलेल्या आंबेडकर चौकात रंगीबेरंगी जरबेरा फुलांची झाडे विक्रीसाठी चार पाच तरुण आणि काही महिला बसल्या होत्या.१०० रुपयात सुंदर फुलाचे झाड मिळत असल्यामुळे अनेक नागरिकांनी आणि महिलांनी गर्दी करीत हि रोपटी विकत घेण्यास सुरवात केली .काही वेळातच त्यांच्याकडील रोपटी संपून त्यांनी साठा असलेल्या गाडीतून आणखीन रोपटी आणली यावेळी पत्रकार यांची गाडी या ठिकाणी पार्क करून माहिती घेतली असता त्यांनी आपण कळस अकोले येथील असल्याची बतावणी केल्यामुळे थोडासा संशय निर्माण झाला.याच वेळी बाजार पेठेतील गुरुदत्त इलेक्ट्रिकलचे व्यापारी यांनी आपण ती रोपे खरेदी केली असून त्यासाठी कुंड्या विकत घेतल्याचे सांगितले आणि हि जरबेरा असून याला सुंदर फुले येतात अशी माहिती दिली .यावेळी या रोपट्याचा आणि फुलाचा फोटो काढून तो शेतीतद्न्य आणि फुलझाडे आणि फळझाडे याची माहिती असणार्या किरण नगरे यांना पाठविताच त्यांनी हि जरबेरा नसून समुद्र किनारी उगविणारे नागझरी गवत असल्याचे सांगितले.विक्री करणारी टोळी लोकांची सरळसरळ फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांना देण्यात आली .मात्र हि गोष्ट विक्री करणाऱ्या टोळीच्या लक्षात येताच त्यांनी माल घेवून पळ काढला आणि अचानक संपूर्ण टोळीच काही क्षणात अदृश्य झाली.मात्र तो पर्यंत अनेक नागरिक यात गंडविले गेल्याचे उघड झाले.यामुळे ‘ दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये ’ या म्हणीची आठवण झाली.

याबाबत महाराष्ट्र अग्रो एजन्सीचे संचालक किरण नगरे यांनी हि रोपटी समुद्र किनारी उगविणारे नागझरी गवताची रोपे असून त्याची पाने कापून हि रंगीबेरंगी जरबेरा असविल्याचे भासवून फसवणूक केली जात असल्याचे सांगितले त्यामुळे नागरिकांनी या फसवणुकी पासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले.तसेच यांच्याविरोधात पोलीस कारवाई झाल्यावर फसवणूक टाळली जाईल असे मत व्यक्त केले.

तक्रारवाडी गावच्या ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीची ग्रामस्थांची मागणी ; शासकीय योजनाची माहिती न देणे आणि कार्यालयीन वेळेत हजर नसणे याबाबत बदलीची मागणी.

0

भिगवण वार्ताहर.दि.२७

तक्रारवाडी गावच्या ग्रामसेविका यांची बदली करून याठिकाणी नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ , गटविकास अधिकारी इंदापूर तहशिलदार इंदापूर तसेच जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे यांच्याकडे लेखी निवेदन देणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली.

याबाबत बोलताना नागरिकांनी तक्रारवाडी ग्रामपंचायत सेविका अर्थात ग्रामविकास अधिकारी या त्यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहत नसून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगितले.तसेच ग्रामसेविका सर्वसामान्य नागरिकांना माहिती तसेच शासकीय योजनाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले जात आहे.तसेच त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यालयीन कामकाजाची वेळ आणि त्यांची उपस्थिती याबाबत नोटीस बोर्ड लावण्याची आवश्यकता असताना याची माहिती लावण्यात आली नाही.त्यामुळे नागरिकांना कामकाज करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे,.तसेच बऱ्याच वेळा वरिष्ठ कार्यालयाच्या मिटींगचे कारण सांगितले जात असून याबाबत कोणतीही पूर्वसूचना कार्यालयाच्या माध्यमातून दिली जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी तातडीने त्यांची बदली करून नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

तक्रारवाडी गावातील अतिक्रमनाचा मुद्दा पेटला ; अतिक्रमण हटविण्याच्या मागणी साठी पीपल रिपब्लिकन पार्टीचा रास्ता रोकोचा इशारा

0

भिगवण वार्ताहर. दि. 19

तक्रारवाडी गावातील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असून रस्त्याच्या कडेला असणारे अतिक्रमण 7 दिवसाच्या आत हटविण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम खात्याने अतिक्रमण करणारया नागरिकांना दिली आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता चवरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत नोटीस वितरित केल्या आहेत. तर पीपल रिपब्लिकन पार्टीचे सचिन आढाव तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. बाळासाहेब भोसले यांनी 22 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील अतिक्रमण हटाविण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

तक्रारवाडी गाव हे अतिक्रमनाच्या विळख्याने ग्रासले असून वनविभाग असेल सार्वजनिक बांधकाम असेल अथवा ग्रामपंचायत विभाग असेल सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. याला गावातील राजकीय पुढारी आणि गुंड प्रवृत्ती च्या नागरिकांचा छुपा पाठिंबा असून दिवसा अतिक्रमण हटविण्याच्या गप्पा मारणारे पुढारी रात्री च्या वेळेत टपरी कुठं टाकावी याबाबत मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत.
सध्या मासे मार्केट येथे सुरु झालेल्या अतिक्रमनामुळे विषय वाढलेला दिसून येत आहे. मात्र याठिकाणी अतिक्रमण करणारी बहुतेक लोक हातावर पोट भरणारी आहेत. मात्र आता पर्यंत झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते पुढे आले नाही आणि ग्रामपंचायत विभाग ही पुढे आला नाही. अतिक्रमण करणार्यांना नोटीस दिल म्हणजे आपली जबाबदारी संपली म्हणणारे तत्कालीन सरपंच असो अथवा प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक असो. यामुळेच गेल्या 5 वर्षांपासून अतिक्रमण वाढत असून याला गुप्त राजकीय पाठबळ मिळत आहे. तर पाठीमागे असणारा प्लाट आमच्या मालकीचा आहे. मग रस्त्याच्या शेजारी असणारी जागा आमचीच असा अधिकार वाणीने सांगितले जात आहे.जागा सरकारची आणि दुकाने अतिक्रमण करणाची अशी परिस्थिती पाहाव्यास मिळत आहे. तर अनेक जण अतिक्रमण करून या जा्गांचे भाडे वसुल करत आहेत. यातून काहींना महिना 50000 पासुन लाखाच्या आत भाडे मिळत आहे. यांचा फायदा ना ग्रामपंचायत प्रशासनाला ना व्यावसाय करून पोट भरणार्यांना मिळत आहे.तर काही गोरगरीब प्लाट मालकाच्या जागेत रात्रीत बळजबरीने अतिक्रमण करून दादागिरी होत असल्याचे प्रकार ही घडत आहेत. अतिक्रमण करून केलेल्या व्यवसायात कधीच भरभराटी होत नाही याची माहिती असताना आणि गावात यांच्या नादाला कोणी लागावं अशी ओळख असणाऱ्या अतिक्रमण करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
अतिक्रमण करणाऱ्यांनी आता रस्ता सुद्धा ग्रासला जात असून गावातील बाहेर निघण्याच्या प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमनाचा वेढा पडत असल्याचे दिसून येत आहे.

अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी गावातील रस्ते मोकळ्या जागा आणि शासकीय जागा सोडल्या नाहीत त्यामुळे मागासवर्गीय नागरिकांना वापरण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी
पीपल रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते सचिन आढाव तसेच डॉ. बाळासाहेब भोसले यांनी 22 तारखेला रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. आता तरी प्रशासन जागे होईल आणि गावातील सर्व अतिक्रमण काढून रस्त्याना मोकळा श्वास घेऊ देतील काय हे येणारा काळ ठरविणार आहे.

स्कुलबस खाली चिरडून लहानग्याचा मृत्यू ;इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील घटना

0

भिगवण वार्ताहर.दि.१४

शाळकरी मुलांना शाळेतून घरी सोडत असताना दीड वर्षाच्या चिमुरड्याला स्कूलबस खाली चिरडल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथे घडली.भोगी सणाच्या दिवशीच चिमुरड्याला आपले प्राण गमवावे लागल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार या अपघातात स्वराज महेश काशीद वय १ वर्ष १० महिने याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.याबाबत स्कूलबस चालक रोहित हनुमंत पवार रा.पोंधवडी याच्याविरोधात सर्व रस्त्याची माहिती असताना गाडी भरधाव वेगात चालवून अपघात झाल्यास एखाद्याचा जीव जावू शकतो याची जाणीव असताना हलगर्जीपणा करून अपघात केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या अपघाताबद्दल मिळालेल्या माहिती नुसार या लहानग्याची बहिण याच स्कूलबस ने प्रवास करीत घरी आली असता चिमुरडा गाडीच्या दुसऱ्या बाजूने आल्याची माहिती मिळत आहे.यावेळी चालकाचे लक्ष नसल्यामुळे चिमुरडा गाडी खाली येत चेंगरला गेला .याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गणेश बबन काशीद यांनी तक्रार दिली आहे.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे अंमलदार लोढी यांनी अपघात दाखल करून पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.