Monday, April 6, 2026
Home Blog Page 2

अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीने गुदमरला भिगवण बाजारपेठेचा श्वास ; भिगवण ग्रामपंचायत आणि पोलिसांनी कारवाई करण्याची होतेय मागणी

0

भिगवण वार्ताहर. दि. 4

भिगवण बाजारपेठ तीन जिल्ह्यातील आणि चार तालुक्यातील जवळपास 30 गावे आणि 20 वाडीवस्ती वरील ग्राहकांसाठी रोज लागणाऱ्या वस्तू खरेदी साठी योग्य ठिकाण मानले जाते. मात्र या ठिकाणी वाढत असलेले अतिक्रमण आणि काही आपलाच व्यवसाय व्हावा स्वार्थी वृतीच्या व्यापारी वर्गामुळे बाजारपेठेतील रस्ते कोंडले जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.

उजनी धरणाच्या निर्मिती नंतर भिगवण बाजारपेठ नाव लौकिक वाढीस लागला. या ग्रामीण भागाची शहरी भागाकडे वाटचाल सुरु झाली. ग्राहकांना रोज आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा अगदी योग्य किंमतीत मिळू लागल्याने आसपास च्या खेडेगावातील ग्राहक या बाजारपेठेकडे आकर्षित झाला. दळण वळणाच्या सुविधेत दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे दिलासा वाढू लागला. बाजार समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाने भाजीपाला आणि धान्य बाजार तसेच शेळी मेंढी यांचा व्यवसाय वाढीस लागावा यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र बाजारपेठ वाढ होत असतानाच अतिक्रमनाचा महामेरू वाढीस लागल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य ग्राहक तसेच व्यापारी वर्गाला होऊ लागला आहे. भिगवण ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांचा योग्य मेळ बसत नसल्यामुळे अतिक्रमण करणारांची मस्ती वाढत असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. भिगवण पोलिसांनी बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अगदी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून पी 1 पी 2 सारखी वाहतूक व्यवस्था मंजूर करून आणली होती. मात्र काही नतदृष्ट राजकीय पुढारी आणि राजकीय पाठबळ असणारया काही व्यापाऱ्यांनी विरोध करीत ही योजना बासनात गुंडाळून ठेवण्यासाठी विरोध केला. याचा फटका त्या व्यापारी वर्गाला बसला असून वाहतूक कोंडी नसणाऱ्या ठिकाणी ग्राहक खरेदीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय गणित आणि पोलिसांच्या शांत संयमी भूमीके मुळे अतिक्रमण करणारांचे धाडस वाढत असून हे बाजारपेठेच्या सर्वांगीण आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक वर्ग आणि व्यापारी वर्गातून हे अतिक्रमण काढण्याची आणि वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी केली जात आहे.

भिगवण राशीन राज्यमार्गांवर अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू ; अपघात करून वाहन पसार

0

भिगवण वार्ताहर. दि. 13

भिगवण राशीन राज्यमार्गांवर डिकसळ गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 9 ते 10 च्या सुमारास घडली.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अपघातात विजय सीताराम बांडे वय 42 राहणार खेड ता. कर्जत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ठोकर देणारे वाहन अपघात करून पसार झाले. या अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची जागा ऍम्ब्युलन्स सर्व्हिस चे संचालक केतन वाघ यांनी तातडीने घटना स्थळी भेट घेत अपघातातील रुग्णाला वैदकीय उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला मात्र अगोदरच बांडे यांचा मृत्यू झाला होता.याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला मृत बांडे यांच्या मेहुणे संजय रामचंद्र मोरे रा. खेड यांनी खबर दिली असून भिगवण पोलीस अपघातातील वाहणाचा तपास घेत आहेत.
सदर अपघात आणि अपघातातील अज्ञात वाहणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे इन्चार्ज विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अन्सार शेख आणि विजय लोढी करीत आहेत..

बारामती भिगवण राशीन राज्य मार्गाचे नूतनीकरण नव्यानेच झाले असून यावर वाहनांचा वेग कमालीचा वाढला असल्याचे दिसून येत आहे. तर मागील काही दिवसापासून या राज्य मार्गाची अपघाती राज्यमार्ग अशी ओळख बनत असून यात नागरिकांना आपला जीव गमवावा तसेच कायमचे अपंगत्व स्वीकारावे लागत आहे. तर बारामती पासुन भिगवण पर्यंत अपघातांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मदनवाडी तक्रारवाडी येथील टप्प्यात अनावश्यक डिव्हायडर ओपनिंग नागरिकांच्या जीवावर बेतत असून याकडे प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे.

भिगवण परिसरात चालू हंगामातील 505 मिलिमिटर पावसाची नोंद ; समाधानकारक पाऊस आणि उजनीच्या शंभरी मुळे सुखावला बळीराजा..

0

महा बँक ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहाय्यक देविदास फलफले यांची माहिती..

भिगवण वार्ताहर.दि.११

भिगवण परिसरात मे महिन्यात आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने समाधानी झालेल्या बळीराजाला दोन महिने कोरडे गेल्यामुळे सताविणाऱ्या काळजीला ९ ओगस्ट आणि १० ओगस्ट ला झालेल्या दमदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून उजनीच्या १०० टक्यांनी भरल्यामुळे बाजारपेठेत आनंद दिसून येत आहे.

भिगवण परिसरात अनेक वर्षात निसर्गाने आपली किमया दाखवीत  पहिल्यांदाच ४१७ .८० मिली मीटर इतक्या पावसाची बरसात केली होती.त्यामुळे बळीराजा आणि व्यापारी वर्ग हि आनंदी झाले होते .मात्र गेली जून ०० आणि जुलै ०० हे दोन महिने कोरडी गेल्यामुळे बळीराजाला चिंता सतावित असतानाच ओगस्ट मध्ये परत वरुणराजा बरसायला सुरवात झाली असून या महिन्यात जवळपास ८७.७० मिलीमीटर पाऊस बरसला असल्याची माहिती महाबँक ग्रामीण विकास केंद्राचे कृषीसहायक देविदास फलफले यांनी दिली.तर या हंगामातील आज अखेर ५०५.४० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहितीहि फलफले यांनी दिली.भिगवण परिसरात सरासरी इतका पाऊस पडत असतो तर २०२४ या साली ८०५ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली तर २०१२ साली २८८.७० इतक्या कमी पावसाची नोंद झाली असल्यामुळे या वर्षी वरुणराजा कोणता विक्रम करतो याची वाट बळीराजा पाहत आहे…  

बारामती राशीन राज्यमार्गांवर तक्रारवाडी गावच्या हद्दीत मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने ठोकरल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू ; रविवार रात्री आठ वाजता घडला अपघात

0

भिगवण वार्ताहर.दि.११

बारामती राशीन राज्यमार्गावर तक्रारवाडी गावच्या हद्दीत जयभवानी हॉटेल समोर मालवाहतूक करणाऱ्या कॅरी गाडीने दुचाकीला ठोकर दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली .या अपघात १० वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात गणेश सुखदेव जाधव वय ३१ रा.शेटफळगढे यांचा जागीच मृत्यू झाला आहे .तर ओम अशोक जाधव वय १० वर्ष राहणार तक्रारवाडी (भकासवाडी) हा मुलगा जखमी झाला आहे. राशीन बाजूकडील जयभवानी हॉटेल समोर मारुती सुझुकी कंपनीची कॅरी गाडी नंबर एम.एच,१२ व्ही .टी .९६४२ हिने हिरो कंपनीची दुचाकी नंबर एम.एच.४२ ए जे ७९५१ या गाडीस जोराची ठोकर दिल्याने सदर अपघात घडला.यात दुचाकी चालक गणेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला ओम जाधव जखमी झाला.भिगवण पोलिसांनी  मालवाहतूक करणाऱ्या कॅरी गाडीवरील ड्रायव्हर सतीश शंकर धेंडे रा.काशेवाडी भवानी पेठ पुणे याच्याविरोधात त्याच्या ताब्यातील वाहनाने वाहतुकीचे नियम न पाळता भरधाव वेगात दुचाकीस ठोकर देवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश उगले आणि हवा.करचे करीत आहेत .

बारामती राशीन रोडवरील मदनवाडी चौक ते तक्रारवाडी गावाच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम खात्याने एक किलोमीटर डिव्हायडर ला ६ ठिकाणी खुले ठेवल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.गेल्या आठवड्यात अशाच अपघातात तक्रारवाडी गावातील नागरिकाने जीव गमविला असतानाच हा अपघात घडला आहे.हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायासाठी खुल्या केलेल्या डिव्हायडर मुले अपघात होत असताना याचे सोयरसुतक सार्वजनिक बांधकाम खाते ,कंत्राटदार आणि सबंधित गावच्या सरपंच यांना नाही त्यामुळे निष्पाप नागरिक चिरडले जात आहे.याकडे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी खुले असणाऱ्या डिव्हायडर मुळे  अपघात वाढत असल्याचे सांगून पोलीस प्रशांसानाच्या वतीने आवश्यक नसणारे वळणे बंद करण्यासाठी सावर्जनिक बांधकाम खात्याला पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे सांगितले.

भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना एकाचा अपघाती मृत्यू ; तोडलेल्या बॅरिगेट मुळे निष्पाप नागरिकाला गमवावा लागला जीव.

0

महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जी पणाचा बळी ; महामार्गांवरील तोडलेल्या बॅरिगेट बाबत कोणतीही कोणतीही कारवाई नाही. तसेच दुरुस्ती साठी यंत्रणा पाठविली नाही.

भिगवण वार्ताहर.दि.२३

भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्ग ओलांडीत असताना ट्रकची धडक बसून एका पादचार्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली .महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि व्यावसायिकांच्या आपमतलबी वृतीचा हा बळी असून संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात दिलीप निवृत्ती गायकवाड वय .४५ रा.कळस असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.गायकवाड हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कुरकुंभ या ठिकाणी जात असताना पुणे बाजूला असणाऱ्या सागर हॉटेल समोर सर्विस रस्त्यावर आपली गाडी पार्क करून सोलापूर बाजूला असणाऱ्या स्वीटहोम कडे येत होते.महामार्ग प्रशासनाने याठिकाणी लोखंडी बेरीगेट केलेले होते मात्र काही अज्ञात व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी रात्रीच्या वेळेत कटर वापरून हे बेरीगेट तोडले आहेत.याच ठिकाणाहून गायकवाड जात असताना सोलापूर बाजूला जाणार्या ट्रक ने त्यांना धडक दिली.अपघात झाल्यावर ट्रक ड्रायव्हरने जखमीला मदत न करता पळ काढला होता.मात्र पत्रकार राजेभोसले यांनी त्याचा पाठलाग करून पकडीत पोलिसांच्या स्वाधीन केले.भिगवण पोलिसांनी ट्रक ड्रायव्हर आकाश मधुकर साखरे वय.३२ रा.हिप्परगा तुळजापूर याला ताब्यात घेवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

मात्र या अपघाताला ट्रक ड्रायव्हर सोबतच बेरीगेट तोडणारे व्यावसायिक आणि महामार्ग प्रशासन असून तोडलेले बेरीगेट पूर्ववत करण्याची जबाबदारी असताना हलगर्जीपणा केला आहे.महामार्ग प्रशासनाने राजकीय दबावापोटी बाजार भरणाऱ्या ठिकाणी बेरीगेट केले नसल्यामुळे बाजार दिवसी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपला व्यवसाय व्हावा म्हणून अज्ञात व्यावसायिकांकडून केल्या जाणार्या चुकीच्या कामामुळे अनेक निष्पाप माणसांचे जीव जात असताना महामार्ग प्रशासन आणि महामार्ग पोलीस कोणतीही कायदेशीर कारवाई करताना दिसून येत नाहीत.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी बेरीगेट तोडल्यामुळे अपघात झाल्याचे मान्य करीत बेरीगेट विषयात हलगर्जीपणा करणार्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.तसेच महामार्ग प्रशासनाला तोडलेले बेरीगेट दुरुस्त करण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले.

भिगवण पोलीस आवारातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव ; इच्छुक खरेदीदारांना सहभाग नोंदविण्याचे सपोनि विनोद महांगडे यांचे आवाहन.

0

भिगवण वार्ताहर. दि.. 12

भिगवण पोलीस स्टेशन यांनी विविध कारवाईत तसेच संशयित गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन अनेक वेळा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात आले होते. याबाबत अनेक वेळा प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया तुन आवाहन करण्यात आले होते.
या आवाहना नंतर अनेक मूळ मालकांनी आपली वाहने नेली होती. मात्र या आवाहना नंतरही अनेक वाहणांची मालकी सांगणारा कोणीच समोर न आल्याने अखेर ही बेवारस वाहने समजून त्यांचा भिगवण पोलीस ठाण्याच्या आवारात लिलाव करण्यात येणार असल्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन तसेच कायदेशीर प्रकिया पूर्ण करून पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिल्या आहेत.

सदर लिलाव प्रकिया बाबत सर्व प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडिया यावर प्रसिद्धी देण्यात आली असून लिलाव झालेली सदरची वाहने ही जागेवर स्क्रॅप (मोडतोड करून भंगार )करण्यात येणार आहेत. या लिलाव प्रकीयेमध्ये ज्या अधिकृत भंगार व्यवसायीक यांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी त्यांचा अधिकृत परवाना, आधार कार्ड, घेवुन भिगवण पोलीस स्टेशन येथे 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी ११:०० वा हजर रहावे असे आवाहन भिगवण पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी केले आहे.

भिगवण ग्रामपंचायत प्रशासनाकडून अपंग कल्याण निधीचे होणार वाटप ; अपंग (दिव्यांग )लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरपंच गुराप्पा पवार यांचे आवाहन.

0

भिगवण वार्ताहर. दि. 15
भिगवण गावातील अपंग (दिव्यांग )नागरिकांचा निधी देण्याच्या कार्यवाहीला सुरवात केली असून लाभार्थी अपंग नागरिकांनी ग्रामपंचायत विभागाकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन सरपंच गुराप्पा पवार तसेंच उपसरपंच सत्यवान भोसले यांनी केले. तर ग्रामपंचायत सर्व लाभार्थी यांना निधी दिला जाणार असल्याची माहिती ही यावेळी सरपंच पवार यांनी दिली.
पंचायत राज संस्था च्या उत्पनाच्या 5 टक्के निधी अपंग( दिव्यांग )नागरिकांना अपंग निधी दिला जातो. भिगवण ग्रामपंचायत विभागाकडून दरवर्षी आलेला निधी वितरित केला जातो. मात्र काही लाभार्थी पुरेशी माहिती आणि योग्य ती कागदपत्रे सादर न केल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहतात. भिगवण गावातील कोणताही लाभार्थी या निधी पासून वंचित राहू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत असून सर्वाना यांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे सरपंच गुराप्पा पवार आणि उपसरपंच सत्यवान भोसले यांनी सांगितले.
तसेच कागदपत्रे जमविण्यासाठी काही अडचण असल्यास यात ही प्रशासनाकडून मदत केली जाणार असल्याचे सांगून सर्व लाभार्थी यांना यांचा फायदा मिळावा ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत सर्व मीडिया आणि प्रिंट मीडियाला प्रेस नोट देऊन आवाहन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी इंदापूर बाजार समितीचे माजी उपसभापती पराग रमेशराव जाधव, इंदापूर पंचायत समितीचे उप सभापती संजय पंढरीनाथ देहाडे, उपसरपंच सत्यवान भोसले, माजी सरपंच तानाजी वायसे, दत्ता धवडे, जयदीप जाधव, बाबासाहेब शिंदे, आबा काळे, प्रतिमा देहाडे, मछिंद्र खडके कपिल भाकरे, जुलेखा शेख उपस्थित होते.

पुणे so

0

पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी ब्रिज वरून कंटेनर खाली कोसळला. चालकाचा अपघातात मृत्यू.

0

भिगवण वार्ताहर. दि. 15
पुणे सोलापूर महामार्गांवर मदनवाडी ब्रिज वरून सर्व्हिस रोड वर कंटेनर कोसळल्याने झालेल्या भीतीदायक अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या कंटेनर खाली इतर वाहने आणि नागरिक न आल्याने मोठी जीवितहानी टळली. या भयानक अपघाताने तरी भिगवण कर नागरिक जे महामार्गांवर अतिक्रमण करून व्यवसाय करतात आणि अनधिकृत पणे पार्किंग करतात त्यांचे डोळे उघडतील अशी आशा व्यक्त होत आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे सोलापूर महामार्गांवरील पुणे बाजूकडे जाणाऱ्या कंटेनर एमएच ४३ सीके ६५११ हा मदनवाडी गावच्या हद्दीत अशोका हॉटेल समोर मुख्य रस्त्यावरील ब्रिज वरून खाली कोसळला. या अपघातात चालक श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव वय ३७ वर्षे, रा. मुंबई मूळ रा उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात 6 वाजण्याच्या सुमारास घडला असून झोपेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे 40 ते 50 फूट खाली असणाऱ्या सर्व्हिस रोडवर कंटेनर आदळला. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन अथवा प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तसेच महामार्ग पोलिसांनी घटना स्थळी भेट घेत अपघात ग्रस्त वाहन काढण्याचे कार्य सुरु केले. कंटेनर समोरील वाहन तातडीने काढून कंटेनर काढण्यासाठी काम सुरु केले.कंटेनर बाजूला केल्यावर या खाली कोण दबले आहे काय याचा शोध लागेल. मात्र हा अजस्त्र कंटेनर उचलण्यासाठी लागणारी सामग्री जमविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

या अपघाताने तरी भिगवण कर नागरिकांना जाग यावी ही अपेक्षा कारण महामार्गवर अशा प्रकारे अनेक अपघात घडले असून यातून काही बोध भिगवण करानी घेतला असल्याचे आतापर्यंत तरी दिसून आले नाही. भिगवण बस स्थानकासमोर असाच एक अपघात घडला होता. तर एका माथेफिरूने बस पळवून केलेला अपघात तसेच पुणे बाजूला जाणाऱ्या इंडिका गाडीने अनेक गाड्यांचे केलेले नुकसानाचा अपघात, गेल्या 15 दिवसापूर्वी आजचा अपघात घडला त्याच समोर घडलेला अपघात अशी अपघातांची मालिका रोज घडत असूनही अजूनही रोड वर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. तर महामार्ग पोलीस आणि हायवे प्रशासन अपघात झाल्यावर पंचनामा शिवाय अनधिकृत पार्किंग आणि व्यवसाय हटविताना दिसून येत नाही. या अपघाताने तरी सर्वांचे डोळे उघडून जिवा पेक्षा व्यवसाय मोठे नाहीत याची जाणीव व्हावी ही तमाम नागरिकांची मागणी.

भिगवण मध्ये होळी आणि धुलवड सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी

0

भिगवण वार्ताहर. दि. 14

भिगवण शहरामध्ये होळी आणि धुलवड सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली असून सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भिगवणची बाजारपेठे आसपासच्या 15 गावे आणि 40 च्यावर असणाऱ्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना रोज लागणाऱ्या वस्तू आणि सेवाचे ठरलेलं ठिकाण. त्यातच भिगवण साठी सर्व गाव आणि वाड्या वास्त्यावरून दळणवळणाचे जाळे चांगल्या प्रकारे तयार झाले आहे.त्यामुळे नागरिकांना सहज खरेदी साठी येता येते.

होळी आणि धुलवड सणाच्या निम्मिताने भिगवण बाजारपेठेत गर्दी वाढत असून व्यापारी वर्गात यामुळे समाधान निर्माण झाले आहे. नुकताच उसाचा गाळप हंगाम पूर्ण झाल्यामुळे शेतकरी वर्ग आणि मजूर वर्ग आपल्या कामातून थोडासा निवांत झाला आहे. तर कारखान्यानी बिले सोडल्यामुळे खिशात पैसा आला असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच सध्या यात्रा आणि जत्राचा हंगाम सुरु होत असून नागरिकांचा खरेदी करण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

कापड दुकाने, किराणा दुकाने, इलेॅक्ट्रिक दुकाने आणि हॉटेल मध्ये ग्राहकांची चेहेल पेहेल वाढली असून लग्न सराई सुरु झाल्याने सरांफी दुकानात ही काही प्रमाणात ग्राहक दिसून येत आहेत.

बाजारपेठेतील गर्दीवर भिगवण पोलिसांचे लक्ष असून गजबलेल्या चौकात पोलीस जवान तसेच होमगार्ड यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवला जात आहे.तसेच पोलीस धुलवड आणि होळीच्या पार्श्वभूमीवर ड्रॅन्क अँड ड्राइव्ह करणाऱ्या नागरिकांना जनजागृती आणि कारवाई करणार आहेत…..सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे