भिगवण वार्ताहर.दि.३
तक्रारवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहाराचे बांधकाम आणि सुशोभीकरण विकास कामाचे भूमिपूजन गावच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन आढाव यांनी दिली.
इंदापूर तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तक्रारवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे.याच अनुशंघाने बौद्ध समाजासाठी बौद्ध विहार बांधकाम आणि सुशोभीकरण अंतर्गत पेव्हर ब्लॉक साठी सामाजिक न्याय विभागातून २० लक्ष रुपयाचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे.याच विकास कामाचे भूमिपूजन आज विद्यमान सरपंच मनीषा वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई आढाव ,माजी सरपंच सतीश वाघ ,राष्ट्रवादी पक्षाच्या इंदापूर तालुका महिला उपाध्यक्षा सीमा काळंगे ,उपसरपंच प्रतिनिधी विजय जगताप ,माजी सरपंच अनिल काळंगे ,गणेश वायदंडे ,आण्णा आढाव माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,भाऊसाहेब वाघ ,पांडुरंग वाघ,डॉ.बाळासाहेब भोसले ,वैभव आढाव, अक्षय जोगदंड,नवनाथ पाटोळे ,तनुजा आढाव ,संगीता आढाव ,सुरज जाधव ,उमेश आढाव ,हेमंत भोसले ,योगेश गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन आढाव यांनी मंत्री दतात्रय भरणे यांचे माधयामातून मिळालेल्या निधीतून सर्व तळागाळातील नागरिकांना विकास कामाचा फायदा होत असल्याचे सांगण्यात आले.तर विकास कामे होताना ती दर्जेदार व्हावी यासाठी आपण स्वतः प्रसंगी उभे राहून लक्ष देवून काम करून घेणार असल्याचे सांगितले .