Saturday, May 23, 2026
Home Blog Page 19

इंदापूर तहसीलदार पदी श्रीकांत पाटील यांच्या निवडीचे तालुक्यात जंगी स्वागत

0

अवैध वाळू ,माती उपसा तसेच गौण खनिजांची चोरी थांबणार ? सर्वसामान्य नागरिकाची अपेक्षा

भिगवण वार्ताहर .दि.७
तहसिलदार श्रीकांत पाटील यांची तीन वर्षानंतर पुन्हा इंदापुरचे तहसिलदार म्हणुन बदली झाली आहे. ‘अवैध व्यावसायांवर प्रहार तर सर्वसामान्य माणसाचा आधार’ अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तहसिलदार श्रीकांत पाटील यांचे इंदापुरमध्ये सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे. भिगवण तसेच इंदापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी तरुण वर्गांने पेढे वाटुन आनंद व्यक्त केला.
श्रीकांत पाटील यांची तीन वर्षापुर्वी इंदापुरहुन सोलापुर येथे बदली झाली होती. इंदापुर तालुक्यातील तहसिलदार पदाची कारकिर्द अतिशय वादळी ठरली होती. तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यामध्ये व तरुणाईला विधायक दिशकडे वळविण्यामध्ये त्यांनी महत्वपुर्ण भुमिका निभावली होती. त्यांच्या बदलीनंतर इंदापुर तालुक्यामध्ये बदली रद्द व्हावी यासाठी आंदोलनेही झाली होती.तर ग्राहक संघटनेचे तुषार झेंडे पाटील यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. तीन वर्षानंतर त्यांची पुन्हा इंदापुरचे तहसिलदार म्हणुन बदली झाल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य वर्गातुन आनंद व्यक्त होत आहे तर अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील भिगवण, मदनवाडी, म्हसोबाचीवाडी, डिकसळ,डाळज आदी गावांमध्ये तरुणाईने तहसिलदार श्रीकांत पाटील यांचे बदलीचे स्वागत केले आहे. यावेळी अॅड. तुषार झेंडे पाटील, अवधुन जगताप, संदीप पाटील,सतीश सुबनावळ, दादा जगताप, रोटरी अध्यक्ष संपत बंडगर, बाळासाहेब सकुंडे आदींसह तरुणांनी ठिकठिकाणी पेढे वाटुन आनंद व्यक्त केला.
याबाबत बोलताना अॅड. तुषार झेंडे पाटील म्हणाले, तहसिलदार श्रीकांत पाटील यांची इंदापुर तालुक्यातील कारकिर्द ही सर्वसामान्य व्यक्तींना न्याय देणारी होती. त्यांनी तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. त्यांनी सर्वसामान्य व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या इंदापुरातील बदलीचे तरुण वर्गातुन मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.

सत्यवार्ताच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील प्रशासनातील सर्व महत्वाच्या पदावर प्रभारी अधिकारी असल्यामुळे तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच आरोग्य सेवेला अडथळा येत असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती .याच बातमीचा परिणाम होत तालुक्यातील तहसीलदार पदी पाटील यांची पुनरनियुक्ती झाली असल्याचे दिसून येत आहे .
तहसीलदार पाटील यांच्या नियुक्ती मुळे तालुक्यातील अवैध वाळू आणि माती उपसा करणाऱ्या आणि राजकीय आशीर्वाद असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुसक्या नक्कीच आवळल्या जातील असा विश्वास सर्व सामन्यात निर्माण झाला असल्याचे दिसून येते ,।

भिगवण येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी

0

राज्यमंत्री ना .दत्तात्रय भरणे यांना निवेदनाद्वारे केली मागणी .

कार्यालय सुरू झाल्यास नागरिकांचा पैसा आणि वेळ वाचणार ……पांडुरंग जगताप (वकील)

भिगवण वार्ताहर .दि.३०
इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण शहरात दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर करण्याची आग्रही मागणी आता जोर धरू लागली असुन याबाबत नागरिकांनी गोविंद डी.कराड ( नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय महाराष्ट्र राज्य) यांना तसेच राज्यमंत्री ना.दत्ता मामा भरणे यांना निवेदन देत मागणी केली आहे .
भिगवण हे पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील प्रमुख गाव आहे. परिसरातील ४० वाड्या वस्त्या आणि तीन तालुक्यातील अनेक गावातील दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे मानले जाते . इंदापुर पासुन ३५ किलोमीटर अंतरावर पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग वर हे शहर वसलेलं आहे . या परिसरातील लोकांना दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी च्या कामासाठी इंदापूर येथे जावे लागते .

अनेक राष्ट्रीयीकृत बँका ,सहकारी पतसंस्था आणि शालेय शिक्षणासाठी शाळा आणि कॉलेजचे या ठिकाणी जाळे पसरले आहे .तर बिल्ट कंपनी सारखा आशिया खंडातील सर्वात मोठा कागद प्रकल्पआणि राज्यातील मोठा मासळी बाजार भिगवण येथे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल येथे होते .यामुळे परिसराला आर्थिक सुबता आहे पर्यायानी मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. यासाठी नागरिकांना अत्यंत मौल्यवान वेळ व पैसा खर्च करून इंदापुर येथील कार्यालयात जावे लागते.भिगवण येथे कार्यालय मंजुर झाल्यास त्याचा फायदा भिगवण आणि परिसरातील नागरिकांना होणार आहे. तर यातून शासनाचा महसुल वाढण्यास मदत होणार आहे . याचाच विचार करून दुय्यम निबंधक कार्यालय मंजुरी देण्याची मागणी केली जात असल्याचे अॅड. पांडुरंग जगताप व सामाजिक कार्यकर्ते राहुल धांडे यांनी सांगितले .
जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, इंदापुर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,पराग जाधव,शंकरराव गायकवाड ,राष्ट्रवादी पक्षाचे कोषाध्यक्ष सचिन बोगावत,प्रशांत शेलार,जयदीप जाधव,तुषार क्षिरसागर,कपिल भाकरे,सत्यवान भोसले यांनी ही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

ओ शेठ …ने तरुणाईला घातली भुरळ ; सोशल मीडियावर धुमाकूळ.

0

सामाजिक संदेश देणाऱ्या टेटस चे स्वागत मात्र कुणाच्या भावना दुखविणाऱ्या विरोधात कारवाई केली जाणार ….स.पोलीस निरीक्षक जीवन हिंदुराव माने ..

भिगवण वार्ताहर.दि.१६

ओ शेठ ..तुम्ही नादच केलाय थेट … या सोशल मिडिया वरील टेटस ने ग्रामीण भागातील तरुणांना भुरळ घातली असून दोन दिवसात जवळपास ८० टक्के तरुणांच्या सोशल मिडिया टेटस वर हेच स्लोगन ऐकण्यास मिळत आहे.

आजकालची ग्रामीण भागातील तरुणाई कशाची दिवाणी होईल हे सांगता येत नाही.एखादा चित्रपट आला कि त्यातील हिरोची नक्कल करणे असो अथवा तीन चार टोळके जमवून चौकात अथवा मुख्य रस्त्याच्या मध्येच तलवारीने केक कापून बर्थडे बॉय ला अंडी आणि केक ने भरवून देणे असो.आजकाल रोज हटके आणि मित्रांनी हमखास पाहावे यासाठी सोशल मिडीयावर टेटस ठेवणे या प्रकाराची चलती झालेली पहावयास मिळते.आता पर्यंत सैराट पासून मै हु डॉन ,आमच्याशी वाकड नदीला लाकड ,वावर आहे म्हणून पावर आहे असे अनेक प्रकारचे टेटस पहावयास मिळत होते.तर काहीना इशारा देण्यासाठी आणि धमकी देण्यासाठीही याचा वापर केला जात होता.मात्र काही दिवसापासून पोलिसांनी आपला तिसरा डोळा उघडून दिलदार पणाचे दर्शन देत अशा टेटस वाल्याला प्रसादाचे वाटप केले होते.

गेल्या दोन दिवसापासून ओ शेठ ….ने अवघ्या तरुणाईत धुमाकूळ घातला असून जवळपास ८० टक्के तरुणांनी हेच टेटस ठेवल्याचे दिसून येत आहे.यासाठी अनेक प्रकारे शुटींग करून आपला टेटस सर्वात चांगला कसा होईल यासाठी प्रयत्न केले जात आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी बोलताना समाजातील अनेक तरुण समाजाला संदेश देणारे आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा प्रयत्न करणारे टेटस ठेवत असतात.मात्र काही तरुण भरकटत जावून चुकीच्या प्रकारें टेटस ठेवून समाजात वाद निर्माण होणारे ,दुसर्याच्या भावना दुखावणारे संदेश टाकत असतात अशा विरोधात तक्रार झाल्यास सदर इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले..

टोळी देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या मुकादमाच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा ; अनेक शेतकऱ्याची केली होती फसवणूक

0

भिगवण परिसरातील अनेक शेतकऱ्यांची जवळपास ५० ,लाख रुपयांची फसवणूक

अनेकांना टोपी घालणाऱ्या मुकादम याने आपली पत्नी पाठवून करार करण्याच्या प्रयत्नात करताच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

भिगवण वार्ताहर.१३

ऊस तोडणी साठी कामगार देतो म्हणून अनेकांना टोप्या घालणाऱ्या टोळी मालकाच्या (मुकादम ) विरोधात भिगवण पोलिसांत दोन उस वाहतुकदार ट्रॅक्टर मालकांकडून गुन्हा नोंद करण्यात आला. एकाच मुकादमाने भिगवण परिसरात अनेकांना गंडा घातल्याने आणखीन काही गुन्हे नोंद होणार असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणी सिताराम सोमा मोरे, दिलिप भाऊसाहेब सोनवणे, कमल सिताराम मोरे सर्व रा. धाडणे, ता. साक्री, जि. धुळे यांच्यावर भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत भास्कर बाबुराव काळे, रा. डिकसळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत हकिकत अशी की काळे यांचे कडून तीन लाख छपन्न हजार व विश्वास रंगनाथ देवकाते रा. मदनवाडी यांच्याकडून दोन लाख पंचविस हजार असे एकूण पाच लाख एक्याएंशी हजार एवढी रक्कम रोख स्वरुपात घेऊन उस तोडणी मजूर पुरविण्याची हमी दिली होती. मात्र उस तोडणी मजूर न पुरवता विश्वासघात केला.

या प्रकरणाचा तपास भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक दडस पाटील हे पुढील तपास करीत आहेत .
….फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी संपर्क साधावा : जीवन माने
याबाबत बोलताना भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी आवाहन केले की, अशा प्रकारे भिगवण आणि परिसरातील अनेक शेतकर्‍यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून संबंधितांनी तात्काळ संपर्क साधावा त्यांना न्याय देण्याचा पोलिस प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करेल.

….उसतोड मुकादमांच्याद्वारे फसवणुक हा उस उत्पादन क्षेत्रातील वाहतुकदारांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. उस पट्ट्यातील शेतकरी वाहतुकदारांची अनेकदा फसवणूक होत असते अशा चर्चा नेहमीच पुढे येत असतात. उस वाहतुकदार पुढे येत नाहीत त्यामुळे कारखाण्याकडून घेतलेली उच्चल स्वरुप रक्कम उस वाहतुकदारांना भरपाई करावी लागते. विशेषत: उस तोडणी हंगाम सुरु होण्याच्या काळात तोडणी कामगारांच्याकडून फसवणूकीचे प्रकार चर्चेला येत असतात.

छत्रपती उदयनराजे यांच्या बाबत अपशब्द वापरणाऱ्या उद्योगपती जिंदाल विरोधात गुन्हा नोंद करण्याची सकल मराठा समाजाची मागणी

0

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज इंदापूर यांच्या वतीने भिगवण पोलीस ठाण्यात देण्यात आले निवेदन .जाब विचारणाऱ्या तरुणा विरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा

भिगवण वार्ताहर. दि.२६

लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील जिंदाल इंडस्ट्रीजचा मालक अशोक जिंदाल याने छ्त्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द वापरले प्रकरणी त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करीत भिगवण येथील मराठा क्रांती आणि सकल मराठा वतीने भिगवण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.तसेच या प्रकरणी जिंदाल याला जाब विचारणार्‍या शिवप्रमींवर दाखल केलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

उद्योगपती अशोक जिंदाल याने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बाबत अपशब्द वापरलेची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झालेली होती. याबाबत काही तरुणांनी संबंधित अशोक जिंदाल यास जाब विचारला होता. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी उद्योपतीच्या सांगण्यावरून सत्यता न तपासता एकाच घटनेचे दोन गुन्हे दाखल केले. एका गुन्ह्याप्रकरणी मा. न्यायालयाने जामीन दिलेला असतानाही पोलिसांच्याद्वारे बेकायदेशिरपणे डांबून ठेवण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रकरणी सदर उद्योगपतीवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असताना तरुणांच्यावर गुन्हा दाखल होणे योग्य नाही हे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल अशा इशारा यावेळी बोलताना अ‍ॅंड. पांडुरंग जगताप यांनी दिला.भिगवण पोलिसांच्या वतीने जीवन माने यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष राजकुमार मस्कर, छत्रपती वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅंड पांडुरंग जगताप, माजी सरपंच पराग जाधव, दीनानाथ मारणे ,तुषार चव्हाण, अमितकुमार वाघ, अ‍ॅंड. कन्हय्या पहाणे, विशाल धुमाळ, हर्षवर्धन ढवळे तसेच मदनवाडी तक्रारवाडी भिगवण रेल्वे स्टेशन डिकसळ येथील मराठा बांधव उपस्थित होते.

पुणे सोलापूर महामार्गावर एकाच दिवसात ३ अपघात ; २ जणांचा मृत्यू तर ११ गंभीर जखमी

0

महामार्गावर थांबणाऱ्या वाहनांमुळे जात आहेत जीव.हायवे प्रशासन टोल वसूल करण्यात दंग .महामार्ग पोलिसांचे अवैध रित्या पार्किंग केलेल्या वाहनाकडे दुर्लक्ष…

भिगवण वार्ताहर.दि.२४

कोरोनाचा आलेख खाली आल्याने निर्बंध शिथिल होताच पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचा आलेख उंचावत असून भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवसात अपघात घडले.यात दोन जणांना प्राणाला मुकावे लागले तर ११ जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे सोलापूर महामार्गावर हे तीन हि अपघात घडले असून यातील पहिल्या अपघातात दोन दुचाकी सामोरा समोर अपघात होवून यात प्रवीण बापू खोत वय.२९ रा.पळसदेव यांचा मृत्यू झाला.तर दुसरा अपघात डाळज गावच्या हद्दीत घडला असून यात पिकअप गाडीने बलकर गाडीला पाठीमागून ठोस दिल्याने झालेल्या अपघातात पिकअप चालक बालाजी जलचंद्र माने माने वय.४५ रा.आंबेजवळगे ,विजय बिभीषण शिंदे जखमी झाले.तर पोंधवडी गावाच्या हद्दीत घडलेल्या तिसऱ्या अपघातात कार ट्रक ला पाठीमागून धडकल्याने घडलेल्या अपघातात दत्ता पांडुरंग घोडके वय ३० रा.मेदनकरवाडी चाकण यांचा जागीच मृत्यू झाला तर आनंद घोडके वय २६ निशा घोडके वय.२४ छाया घोडके वय.५० अश्विन घोडके वय .२२ सुदर्शन घोडके वय .२४ ऋणधावणी कामत वय ५० ,आकांशा इटके वय .३० रा.सर्वजण चाकण जखमी झाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या अपघातात पाठीमागून ठोस देणाऱ्या चालका विरोधात रहदारीचे नियम मोडून अविचाराने वाहन चालवीत अपघात घडविला म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

चौकट…….पुणे सोलापूर महामार्गावर अवैधरीत्या पार्किंग मुळे अपघातांची संख्या वाढत असताना हायवे प्रशासन मात्र टोल वसूल करण्यात दंग असून यात निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याचे दिसून येत आहे.तर वाहन धारकांच्या सुरक्षेसाठी असणारे पेट्रोलिंग युनिट आणि महामार्ग पोलीस अवैधरीत्या पार्किग केलेल्या वाहनावर कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे अशा प्रकारे अपघात घडल्यास सबंधित यंत्रणेला जबाबदार धरून कारवाई झाल्यास निष्पाप नागरिकांचे जीव नक्कीच वाचू शकतील .

‘ एक युवक एक पोस्ट कार्ड ‘ मोहीम राबवित मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी ; भिगवण येथील मुस्लिम युवकांचे अनोखे आंदोलन

0

आघाडी सरकारच्या काळात मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते.आताच्या महविकास आघाडीत यातील दोन मित्र पक्ष एकत्र असूनही मुस्लिम आरक्षण बाबत उदासीनता …. रियाज शेख एक युवक एक कार्ड मोहिमेचे सदस्य

भिगवण वार्ताहर.दि.२२

महाराष्टात मराठा , धनगर ,ओबीसी समाजाचा आरक्षणाचा लढा सुरु असतानाच आता मुस्लीम समाजानेही आरक्षणाच्या लढ्यात उडी घेतली आहे.मुस्लीम समाजाच्या आरक्षणाकडे शासनाने लक्ष देण्यासाठी एक युवक एक पोस्ट कार्ड मोहीम सुरु केली आहे.

राज्यातील सरकार सर्वधर्म समभावाची हाक देत आघाडी करणारे सरकार मुस्लीम युवकांच्या बेरोजगारी कडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याची भावना समाजाची होत आहे.हि भावना सरकारला समजावी आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार दरबारी कार्यवाही व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांना एक युवक एक पोस्ट कार्ड मोहीम राबवली जात असल्याचे रियाझ शेख यांनी सांगितले.भिगवण पोस्ट कार्यालयापासून या मोहिमेला सुरवात करण्यात आली.या प्रसंगी रियाज शेख ,आसिफ बागवान ,अस्लम मुलाणी ,फिरोज बागवान ,आमीर शेख ,तौफिक बागवान ,सोहेल शेख ,समीर शेख ,मोहसीन सातारे यांनी निवेदन दिले.

आघाडीच्या सरकारने मुस्लिम समाजासाठी आरक्षण दिले होते आणि त्याच आघाडीतील दोन मित्र पक्ष आताच्या महाविकास आघाडीत असूनही आरक्षण बाबतीत गांभीर्याने विचार होत नसल्यामुळे मुस्लीम समाजावर मोठा अन्याय केला जात असल्याची भावना यावेळी मुस्लीम तरुणांनी बोलून दाखवली.

शव दाहिनीच्या मंजुरी श्रेय वादावरून तू तू मैं मैं ; भिगवण ग्रामपंचायत आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यात राजकारण वॉर

0

राज्यात सर्वच ठिकाणी शव दाहिनीला मंजुरी देण्यात आल्या असल्याने ग्रामपंचायत विभागाने पत्र देत मागणी केली……सरपंच तानाजी वायसे

राज्य मंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही मंजुरी मिळाली आहे.या साठी आम्ही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली होती …… राष्ट्रवादी इंदापूर तालुका कोषाध्यक्ष सचिन बोगावत

भिगवण वार्ताहर.दि.२२

भिगवण स्टेशन येथे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या शवदाहिनीच्या श्रेय वादावरून राजकारण तापले असल्याचे दिसून येत आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ग्रामपंचायत मागणीतून माध्यमातून केली असताना काही कार्यकर्ते आपली पाठ थोपटून घेत आपणच पाठपुरावा केल्याने मंजूर झाल्याची प्रसिद्धी मिळवत असल्याचे सरपंच तानाजी वायसे यांनी सांगितले.

राज्यात ज्या ठिकाणी कोरोना सेंटर आहेत आणि उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू होतो.अशावेळी त्यांचा अंत्यविधी करताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.तसेच अंत्यविधी साठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचा उपयोग केला जात होता.याचाच विचार करून या सेन्टरच्या ठिकाणी गॅस वर चालणाऱ्या शव दाहिनी मंजूर करण्यात आल्या आहेत.

या साठी भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मागणी करण्यात आली होती.मात्र याचे श्रेय घेण्यावरून ग्रामपंचायत प्रशासन आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात राजकारण सुरु झाल्याचे पहावयास मिळत आहे.

याबाबत बोलताना सरपंच तानाजी वायसे यांनी कोरोना सेन्टरच्या ठिकाणी शव दाहिनी राज्यसरकार च्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्या आहेत त्याबाबत ग्रामपंचायत विभागाने पत्रव्यवहार करीत जागेची उपलब्धता करून दिलेली आहे.मात्र काही कार्यकर्ते भिगवण गावात होणाऱ्या विकास कामात राजकारण आणून श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

याबाबत इंदापूर तालुका राष्ट्रवादी कोषाध्यक्ष सचिन बोगावत यांनी राज्याचे मंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही शव दाहिनी मंजूर करण्यात आली आहे.आणि त्याबाबत आम्ही मंत्री महोदय यांना मागणी केल्यामुळे त्याला मंजुरी मिळाली आहे.२४ /०५/२०२१ रोजी मंत्री भरणे यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आली होती .ग्रामपंचायत विभागाचे पत्राची तारीख पाहिल्यास राजकारण कोण करत आहे हे उघड होईल.

भादलवाडी तलावातील माती उपशाला मनसेचा विरोध ; शासनाने परवानगी दिल्यास आमरण उपोषणाचा मनसे तालुका अध्यक्षाचा इशारा

0

डाळज वार्ताहर .दी. १८

पत्रकार इरफान तांबोळी …. डाळज

भादलवाडी येथील ब्रिटिश कालीन तलावात माती उपसा परवानगी शासनाने देऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी आघाडी चे इंदापूर तालुकाअध्यक्ष हनुमंत जाधव यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे.

भादलवाडी येथील हा तलाव विदेशी पक्षी फ्लेमिंगो तसेच विविध प्रकारचे देशी पक्षी या तलावात दिसून येतात.तर उजनी धरणात येणारे पक्षी आपल्या विणीसाठी या तलावात घरटी केलेली दिसून येतात. तसेच या तलावावर मासेमारी करून अनेक कुंटुंब आपले उदरनिर्वाह करत आहेत.परंतु गेल्या काही काळात नजीकच्या परिसरातील गावगुंडाने अवैधरित्या रात्री अपरात्री माती व वाळूउपसा केला जातो, गाळपेर क्षेत्रातील माती उचलून जास्त दराने राज्यातील अनेक ठिकाणच्या वीटभट्टी साठी विकली जाते. तसेच भरलेल्या रॉयल्टी पेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात माती उचलली जाते त्यामुळे महसूल विभागाचा महसूल मोठया प्रमाणात बुडाला जातो,

मागील काळात या माती उपसा वरून दोन गटामध्ये मारामारी होवून येथील माती रक्त रंजीत झालेली आहे. या प्रकरणी गंभीर गुन्हे भिगवण पोलीस दप्तरी दाखल झाले आहेत.या तलाव परिसरातील भादलवाडी , डाळज या भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील गावातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी परवानगी देण्यात येवू नये.तसेच भविष्यात यातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या तलावातील माती उपशाला परवानगी देऊ नये असे निवेदन इंदापूर जिल्हाधिकारी कार्यालय ,विभागीय कार्यालय बारामती तहसीलदार कार्यालय इंदापूर तसेच जलसिंचन विभाग पळसदेव यांना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेच्या वतीने दिले आहे.

याबाबत सबंधित कार्यालयाने माती उपसापरवानगी दिली तर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तालुका अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी निवेदनात दिला आहे...

इन्फ्लुएंजा लस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करण्याची राष्ट्रवादी कोषाध्यक्ष सचिन बोगावत यांची मागणी

0

खासगी दवाखान्यात या लसी साठी आकारले जातात १५०० ते २००० रुपये ; सर्व सामान्य नागरिक आणि शेतमजूर अडचणीत असताना शासनाने दिलासा द्यावा……..सचिन बोगावत

भिगवण वार्ताहर.दि. १७

लहान मुलांना कोरोना पासून संरक्षण मिळावे यासाठी इन्फ्लुझा लस प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मिळावी अशी मागणी सचिन बोगावत यांनी केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आल्याचे रुग्णांच्या आकड्या वरून दिसून येत असतानाच याविषयातील तज्ञांनी आणि सरकारने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. या तिसऱ्या लाटेचा विशेष करून लहान मुलांना धोका असल्याचे भाकीत करण्यात येत आहे. यासाठी लहान मुलांना इन्फ्लूझां लस देण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे. ही लस प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळत नसल्याने यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे. त्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असताना आणि कोरोनाच्या महामारी मुळे हाताची कामे गेली असताना ही खासगी दवाखान्यात १५०० ते १८०० रुपयांना मिळणारी लस घेण्यासाठी रक्कम जमा करणे सर्व सामान्य नागरिक आणि गरीब शेतमजूर यांना शक्य नाही. त्यामुळे ही लस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून मोफत देण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आणि भारतीय जैन संघटना पुणे अध्यक्ष सचिन बोगावत यांनी केली आहे.याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सचिन बोगावत यांनी कोरोनाच्या काळात कोविड योध्या चे काम करीत अनेक सामाजिक संस्था ,रोटरी क्लब आणि भारतीय जैन संघटना मदतीतून रुग्णांच्या बेड पासून त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविल्या आहेत.तसेच प्लाझ्मा , रक्तदान ,रुग्णांच्या बेडसाठी संपर्क आणि बिलाबाबत अडचणीत मदत करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले गेल्याचे पहावयास मिळाले.

तर खासदार सुप्रिया सुळे ,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी थेट संपर्कातील सामाजिक कार्यकर्ते असले मुळे बोगावत यांची मागणी मान्य होती का ? हे पाहणे गरजेचे आहे.