Saturday, August 22, 2026
Home Blog Page 10

तीन तपे अर्थात 36 वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र ; प्रगती विद्यालयाचा स्नेह मेळावा भिगवण येथे पार पडला.

0

भिगवण वार्ताहर.दि.७

एक दोन नाही तर तब्बल ३६ वर्षांनी प्रगती विद्यालयातील वर्ग मित्रांनी एकत्र येत भिगवण येथील एका हॉटेल मध्ये स्नेह मेळावा आयोजित केला.अगदी वर्ग शिक्षकापासून सर्व शिक्षकांना सोबत घेत ३६ वर्षापूर्वीचा वर्ग परत भरविताना आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्याचे काम केले.

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील प्रगती विद्यालयातील १९८७ च्या वर्ग मित्रांनी आपला स्नेह मेळावा भिगवण येथील उजनी हॉटेल प्रांगणात आयोजित केला होता.३६ वर्षापूर्वी अगदी हाफ शर्टपँनट मधील असणारे 45 विद्यार्थी आजच्या काळात कोणी नोकरी व्यवसाय शेती पारंगत असल्याचे यावेळी ओळखी दरम्यान दिसून आले. या स्नेह मेळाव्याची सुरवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. अत्यंत आपुलकी आणि आनंदाने भारावून गेलेल्या वातावरणात घेण्यात आलेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थी दिलावर तांबोळी ,शरद डोंगरे ,जयश्री सरडे,मंदा चव्हाण ,दशरथ रासकर या वर्ग मित्रांनी आपले मनोगत व्यक्त करीत ओळख करून दिली. वर्ग शिक्षक अशोक कोकरे यांनी सर्व विद्यार्थी मित्रांची आपुलकीने चौकशी करीत सुरु असलेल्या व्यवसाय नोकरीची माहिती जाणून घेतली.तर इतर शिक्षक विवेक शेटे , सतीश मगर ,हनुमंत गोसावी यांनी विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करीत नेहमी एकमेकांच्या सहवासात राहण्याचा सल्ला दिला.तर आपल्या पैकी काहीना जर मदतीचा हात हवा असेल तर तो इतरांनी मनापासून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.या स्नेह मेळाव्याचे आयोजन उज्वला देवकर ,दिलीप पिसाळ , मदन झोळ , दिलीप गायकवाड ,दशरथ रासकर, लक्ष्मण गोळे ,विजय गुणवरे ,संजय डुबल ,भाऊसाहेब यांनी, वामन राऊत यांनी केले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गरोदर ठेवल्याचा गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीने झाडाला गळफास घेत संपविले जीवन ; शेटफळगढे येथील घटना

0

भिगवण वार्ताहर.दि.३०

भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील विटभट्टीवरील काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या संशयिताने चिंचेच्या झाडाला लटकावून गळफास घेत आपले जीवन संपविल्याची घटना घडली. समाजातील बदनामी आणि पोलिसांचा अटकेचा ससेमिरा पाठीमागे लागण्याच्या विवंचनेतून आत्महत्या केली असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार वय ४० वर्ष रा.शेटफळगडे असे गळफास घेवून जीव देणाऱ्याचे नाव आहे.मयत अर्जुन वर भिगवण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गरोदर ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.भिगवण पोलिसांनी यातील दुसरा आरोपी रमेश रघुनाथ मोरे याला गुन्हा दाखल झालेल्या दिवशीच अटक केली होती.तर दुसरा संशयित मयत अर्जुन याचा शोध पोलीस घेत होते.मात्र शनिवारी रात्री ११ च्या सुमारास बारामती भिगवण रोड शेजारील किरण वडूजकर यांच्या शेतात चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेत अर्जुन याने जीव दिला.याबाबत पिंटू रामभाऊ कुंभार यांनी भिगवण पोलिसांना खबर दिली आहे.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार , बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे याबाबतचा अधिकचा तपास करीत आहेत .

तरुणावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या अट्टल गुंडाच्या भिगवण पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; 13 महिन्यापासून देत होता पोलिसांना चकवा

0

भिगवण वार्ताहर.दि.२२

तक्रारवाडी गावातील तरुणावर जीवघेणा हल्ला करीत वर्षभरापासून फरार असणाऱ्या अट्टल गुंडाच्या मुसक्या आवळण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले.मात्र अजूनही त्याचा एक साथीदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस अंकुश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र उर्फ राजू भगवान बदर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.१२ मार्च २०२२ रोजी तक्रारवाडी गावातील वैष्णव राहुल अनपट या तरुणाला जयपाल रसिक खरात ,विक्रम माडगे ,रवींद्र उर्फ राजू भगवान बदर ,विशाल घोलप या आरोपींनी पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून कट रचून  लोखंडी रॉड लाकडी बॅट याचा वापर करून जीवघेणा हल्ला केला होता.या जीवघेण्या हल्ल्यात वैष्णव गंभीर जखमी होवून अत्यंत वाईट अवस्थेत पोहोचला होता.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी तातडीने २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर २ आरोपी पोलिसांना चकमा देत फरार झाले होते. यातील बदर नावाचा आरोपी पडवी ता.दौंड येथे लपूनछपून राहत असल्याची गोपनीय माहिती भिगवण पोलिसांना मिळताच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम ,सचिन पवार रणजीत मुळीक ,महेश उगले ,अंकुश माने ,हसीम मुलाणी यांच्या टीमने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

भिगवण पोलिसांनी आरोपी विरोधात घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे आणि कायदेशीर तपासी कारवाई मुळे गेली १३ महिने यातील आरोपी जेलबंद आहेत.तर अजूनही १ आरोपी फरार असल्यामुळे त्यांचा जेल मधील प्रवास लांबणार आहे.तर या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी वैष्णव अनपट यांच्या आई वडिलाने केली आहे.    

तक्रारवाडी गावच्या सरपंच सतीश वाघ यांचा राजीनामा ; सरपंच पदासाठी 3 गटात चुरस

0

भिगवण वार्ताहर.दि.20

तक्रारवाडी गावच्या विद्यमान सरपंच सतीश विनायक वाघ यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या झालेल्या सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.सर्वसाधारण पदासाठी असणाऱ्या सरपंच खुर्चीसाठी गावातील तीनही गटांनी आपली ताकद वापरण्यास सुरवात केली असून विजयमाला कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे ओस्तुक्याचे ठरणार आहे.

इंदापूर तालुक्यातील राजकारणात नेहमी अग्रगण्य असणाऱ्या तक्रारवाडी गावातील ग्रामपंचायत निवडणूक २०२१ सालात पार पडली.गेली २० वर्षापासून माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून असणारे गाव सर्वपक्षीय गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवून ७ सदस्य निवडून आले.मात्र निवडणूक होताच निवडून आलेल्या सदस्यांमध्ये ” कोणता झेंडा घेवू हाती ? ” या विषयावरून फुट पडून ५ सदस्यांनी एकत्र येत सरपंच पद मिळविले.त्यामुळे गावात निवडून आलेल्यात २ आणि विरोधी १ असे एकूण ३ गट निर्माण झाले.सरपंच पदाची २ वर्ष पूर्ण झाल्याने सतीश विनायक वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सहकारी सदस्यासाठी जागा मोकळी करून दिली.मात्र राजीनामा मंजूर होताच तीनही गटांनी आपली ताकद आजमविण्यास सुरवात केली असून यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे.सर्वसाधारण जागेसाठी पद मिळणार असल्यामुळे ३ गटातील महिला सदस्यांनी तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांत आमदार दत्तात्रय भरणे यांचा समर्थक सरपंच होणार कि हर्षवर्धन पाटील यांचा समर्थक अशी चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे.मात्र कोणीही सरपंच झाला तरी स्वताच्या ऐवजी गावाचा विकास व्हावा अशी मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे.

याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता इतर सदस्यांना पदाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण राजीनामा दिला असल्याचे सांगितले.तर गावच्या विकासासाठी आपण यापुढेही सर्व सदस्यांना सोबत घेवून कामकाज पाहणार असल्याचे सांगितले.

तक्रारवाडी येथील पिरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यानी पळवली ; चोरीची घटना सी.सी.टी.व्ही मध्ये कैद

0

भिगवण वार्ताहर.दि.३०

तक्रारवाडी येथील पीरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.चोरीचा हा प्रकार सी.सी.टी.व्ही मध्ये टिपला गेला असून भिगवण पोलिसांनी याबाबतची खबर मिळताच तातडीने तपास सुरु केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी दिली.

तक्रारवाडी गावातील नवसाला पावणारा पीर अशी ख्याती असणाऱ्या मंदिरातील हि दानपेटी आहे.नुकताच या पिरसाहेबाचा उरूस मोठ्या थाटामाटात पार पडला असून या दानपेटीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान टाकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.२८ तारखेच्या मध्यरात्री १ वाजून २० मिनिटाच्या वेळेत दुचाकीवरून आलेल्या ३ चोरट्यांनी हि चोरी केल्याचे सी.सी.टी.व्ही मध्ये दिसून येत आहे.तर हि चोरी उरुसाच्या दरम्यान मंदिराची रेकी करून केल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या घटनेबाबत माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रुपेश कदम ,महेश उगले ,हसीम मुलाणी यांचे पथक घटनास्थळी पाठवून तपासाला सुरवात केली.यावेळी तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ ,विजय जगताप ,संजय मोरे ,शरद वाघ ,केतन वाघ ,अंकुश वाघ घटनास्थळी उपस्थित होते.

सध्या उरूस ,यात्रा ,जत्रा यांचा उत्सव मोठ्या प्रमाणावर चालू असून चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी भिगवण पोलीस रात्रीच्या वेळेत पेट्रोलिंग करत असतात.तसेच गावातील नागरिकांना जागृत राहण्याच्या सूचना वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात येत असतात.मात्र तरी देखील यात्रा समितीकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे म्हसोबावाडी येथील देवाची मूर्ती ,सकुंडे वस्तीवरील मंदिरातील दानपेटी आणि आता तक्रारवाडी येथील मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून येते.यातील सकुंडे वस्तीवरील दानपेटीचा शोध लावण्यात भिगवण पोलिसांनी यश मिळविले आहे.

तक्रारवाडी येथील नवसाला पावणाऱ्या पिरसाहेबांचा उरूस सोमवारी पासून ; ग्रामपंचायत प्रशासनची जय्यत तयारी

0

भिगवण वार्ताहर .दि.११  

तक्रारवाडी येथील हिंदू मुस्लीम एकात्मतेच प्रतिक असणाऱ्या राजबाग सवार पीरसाहेब उरसाला सोमवार पासून सुरवात होत असून मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस उरूस चालणार आहे अशी माहिती तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांनी दिली.नवसाला पावणारा पीर अशी याची ख्याती असल्याने पुणे मुंबई पासून राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उरसात उपस्थित राहतात.

हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या या पीर साहेब उरुसाला परिसरातील भाविक मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहतात.सोमवारी संध्याकाळी संदलने सुरु होणाऱ्या उरूसाचा मंगळवारी संध्याकाळी देवाचा छबिना मिरवणूक गावातून काढण्यात येते हि मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर मंदिरासमोर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते .तसेच यात्रेतील भाविकांच्या मनोरंजनासाठी वसंत नांदवळकर या लोककलेचे आयोजन करण्यात आले आहे .बुधवारी सकाळी भक्तजनांच्या करमणुकीसाठी हजेरीचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. या नंतर कुस्त्यांचे जंगी मैदान अर्थात आखाडा पार पाडण्यात येतो.परिसरातील यात्रा मध्ये तक्रारवाडीचा उरूस पहिल्या तारखेला येत असल्याने राज्यभरातील पैलवान मंडळी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात.

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्याकडून या तीन दिवसात चोख बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.तर तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाबत्ती स्वच्छता आणि रंगरंगोटी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेवक दीपक बोरावके तसेच कर्मचारी रामा काळगे यांनी दिली.

भिगवण गावच्या विद्यमान महिला सदस्या तसलीम शेख यांची आत्महत्या नसून खूनच ; जन्मदात्रीचा गळा आवळणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात.

0

अभ्यास करताना मोबाईल पाहिल्या मुळे आईने गालावर चापट मारली म्हणून गळा आवळल्याची कबुली

जन्मदात्रीचा जीव घेऊन आत्महत्येचा बनाव पडला उघड .आई आणी मुलाच्या नात्याला कलंक……

भिगवण वार्ताहर.दि.१७

भिगवण गावच्या ग्रामपंचायत सदस्या तसलीम शेख यांचा मृत्यू आत्महत्या नसून खून असल्याचा प्रकार उघडकीस आला.तर हा खून करणारा आरोपी  त्यांचाच मुलगा जीशान जमीर शेख वय १८ याला पोलिसांनी अटक केली आहे.

भिगवण गावच्या सदस्या तस्लीम जमीर शेख यांचा बुधवारी मृत्यू झाला होता.मृत्यू हा आत्महत्या केल्यामुळे झाल्याचे नातेवाईकांनी दवाखान्यात आणि लोणी काळभोर पोलिसांना माहिती देताना सांगण्यात आले होते.शवविच्छेदन करीत असताना डॉक्टरांना याबाबत संशय निर्माण झाल्यामुळे ३ डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले.त्यात महिलेचे गळा दाबून व डोक्याला जखम झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी डॉक्टरच्या अहवालानुसार चौकशी केली असता कोणीही नेमकी माहिती देताना आढळून आले नाही.त्यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करीत तपास करण्यास सुरवात केली होती.घटना घडल्यावेळी मयत तस्लीम यांचे पती जमीर आणि मुलगा जीशान हे दोघे घटनास्थळी होते.त्यामुळे पोलिसांनी त्यांची स्वतंत्र चौकशी केल्यावर जीशान याने गुन्ह्याची कबुली दिली.

जीशान याने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार वडील  जमीर नमाज पठणासाठी तसेच धाकटी बहिण  बाहेर गेली असताना तो अभ्यास करीत बसला होता.यावेळी अभ्यास करीत असताना जीशान मोबाईल पाहत असल्याच्या कारणावरून त्याची आई तस्लीम जीशानवर रागावली आणि त्याच्या गालावर चापत मारली.आईने मारल्याचा राग आल्याने जीशान याने तिला जोरात भिंतीवर ढकलून दिले.तर रागाच्या तावात तिचा गळा दाबला.यात तस्लीम यांचा मृत्यू झाला.आई निपचित पडल्याचे पाहून त्याने घाबरून आईचे मनगट मनगट कापले.परंतु मृत्यू झाल्याने त्यातून रक्त आले नाही.वडील येवून काही विचारातील म्हणून जीशान ने पंख्याला वायर अडकवून ठेवत आईने फाशी घेत आत्महत्या केली आणि मी तिला खाली उतरून ठेवल्याचे सांगत दवाखान्यात नेल्याने सदर प्रकार उघडकीस आला.याबाबत घरातील कोणीही तक्रार देण्यास तयार नसल्यामुळे पोलिसांच्या वतीने फिर्याद देण्यास आली.सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक काळे करत आहेत.

बांधिलकी नारी सन्मानाची विशेष अंकाचे वितरण ; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतील योजना

0

भिगवण वार्ताहर.दि.९

लोकशाही समाजात सरकारच्या पोलीस यंत्रणेइतकी दुसरी कोणतीही संस्था नागरिकाच्या जवळ नसते .त्यामुळे पोलीस यंत्रणेतील अधिकारी यांनी महिला आणि मुलीच्या मनात विश्वासार्ह परिस्थिती निर्माण केली तर यातून अमुलाग्र बदल घडू शकतात याच उद्देशाने कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी चंद्रशेखर पवार “ बांधिलकी नारी सन्मानाची ” हा विशेषांक प्रसिद्ध करून त्याचे भिगवण येथे पत्रकार आणि सामाजिक सेवकाच्या उपस्थितीत वितरण केले.

शालेय मुली आणि महिलांच्यावर दिवसेदिवस छेडछाडीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.काही प्रकरणात सोशन करणारा नात्यातील अथवा अत्यंत जवळच्या ओळखीचा असतो.त्यामुळे त्याची वाच्यता केली जात नाही.यातून पिडीतेची मानसिकता खचून जाते.याच बाबींचा विचार करून भिगवण पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भिगवण शहरात या बांधिलकी नारी सन्मानाची योजनेला सुरवात केली.ज्याप्रमाणे आपण दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांना आपला आजार सांगितल्याशिवाय डॉक्टर आपणाला ओषध देत नाही.त्याच प्रमाणे मुली आणि महिला यांनी आपणाला होत असलेल्या त्रासाबाबत पोलिसांना सांगितले नाही तर आरोपी विरोधात कारवाई करणे शक्य होत नाही.त्यामुळे सपोनि यादव यांनी महिला आणि मुलीचे कार्यक्रम आयोजित करत त्यांना बोलते केले. आणी याच योजनेला नारी सन्मानाची संकल्पना जोडून विशेष अंकाची निर्मिती करण्यात आली.यातून पोलिसांनी आपला पोलीसी खाक्या दाखवीत अनेक रोड रोमिओ आणि चॉकलेट हिरो विरोधात कारवाई करण्यात येवून मुलीना स्वच्छंदी जीवन जगण्यास वातावरण तयार केले. भिगवण पोलीस ठाण्याच्या कामात आपला वेगळा ठसा उमटविणारे यादव सध्या कर्जत येथे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावीत आहेत. तर भिगवण या ठिकाणी राबविलेली योजना कर्जत ठिकाणी राबवून या विशेष अंकाची प्रसिद्धी केली. शुक्रवारी सकाळी पुस्तक वितरण वेळी पत्रकार भारत मल्लाव ,प्रशांत चवरे ,दादासाहेब थोरात ,संपत बंडगर ,वैभव देवकाते ,आप्पासाहेब बंडगर तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

रथ सप्तमी निम्मित ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून प्रवासी दिन ; एस टी बस मधील प्रवाश्यांना तिळगुळ देत केला साजरा

0

भिगवण वार्ताहर .दि.२८

जगाचा अधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमीचे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,भिगवण पोलीस ठाणे ,परिवहन विभाग बारामती तसेच इंदापूर राज्यपरिवहन आगाराच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे तिळगुळ आणि गुलाबपुष्प देवून स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला.

नागरिकांनी प्रवास करताना खासगी वाहतुकीच्या ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय अंगीकारावा तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी. यासाठी ग्राहक पंचायत पुणे यांच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार ,मोटार वाहन निरीक्षक धैर्यशील लोंढे ,हर्षदा खारतोडे , ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य सचिव तुषार झेंडेपाटील, जिल्हा ग्राहक संरक्षण सदस्य दिलावर तांबोळी , प्रवासी महासंघाचे नंदकुमार तावरे ,राजेंद्र निंबाळकर, लालासो साळुंखें तसेच रा.प.वाहतूक नियंत्रक नंदकुमार राउत हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास करणाऱ्या सोलापूर भोर एस.टी बसला थांबवून या गाडीचे चालक आणि वाहक यांचा फेटा बांधून सत्कार करीत बस मधील प्रवाशी यांना पाणी बाटली तसेच तिळगूळ तसेच गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.

पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी एसटीबस मधील प्रवासी यांचे स्वागत करीत बसने प्रवास केल्याने देशाचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच देशातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतल्यास अपघात प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तुषार क्षीरसागर ,डॉ.प्रशांत चवरे ,आप्पासाहेब गायकवाड ,योगेश चव्हाण ,नवनाथ सावंत ,विजयकुमार गायकवाड ,नारायण मोरे उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रथमच भिगवण शहरात ; मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात करणार मार्गदर्शन

0

भिगवण वार्ताहर दि. 19
भिगवण येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी(ता.20) सायंकाळी पाच वाजता येथील दुर्गामाता मंदिर येथे करण्यात आले असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. तुषार क्षीरसागर व सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष सागर जगदाळे यांनी दिली आहे.
वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस प्रथमच भिगवण येथे येणार असल्याचे संस्थांपक अध्यक्ष सुरेश पिसाळ यांनी सांगितले . सबनीस यांच्या व्याख्यानाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यप्रेमी व रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने भिगवण व परिसरातील 20 शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व विभाग पातळीवर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी(ता.२०) सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे असणार आहेत. कार्यक्रमासाठी भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सरपंच दिपीका क्षीरसागर,दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज शेख, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमांमध्ये ‌‌20 शाळांमधील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन मराठी पत्रकार संघाच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.