Thursday, February 19, 2026
Home Blog

भिशी व्यापारी वर्गासाठी संजीवनी कि मारक ; व्यापारी चर्चेतील काही मुद्दे.

0

भिशीचे समर्थन नक्कीच नाही मात्र वाईट प्रवृती ठेचण्याची गरज…

भिगवण वार्ताहर. दि. 30
भिगवण बाजारपेठेत चालू असणाऱ्या भिशी (सार्वजनिक फंड ) बाबत काही समाज माध्यमातून होत असलेल्या बदनामी बाबत व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून भिशी हा सर्वसामान्य व्यापारी वर्गाचा श्वास असून भिशी बंद पडल्यास व्यापारी पुन्हा सावकारी पाश आणि पतसंस्था च्या जाळ्यात अडकला जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर काही लुटारू चालकांमुळे आणि धन दांडग्या बुडव्या सदस्यामुळे सर्वासामान्य व्यापारी वर्गासाठी असणारी संजीवनी बंद होने अन्याय कारक ठरणार आहे.


भिगवण शहरातील दोन निष्पाप नागरिकांनी कर्जाचा बोजा आणि भिशी सदस्यांनी पैसे बुडाविल्याने आपल्या जीवाची आहुती दिली. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाची आणि समाजाची कधीही न भरून येणारी हानी झाली. या आहुती पाठीमागे भिशी आणि सावकारी करणारी काही प्रवृत्ती असल्याचा कुटुंब आणि नातेवाईकांचा आरोप आहे आणि तो खराही आहे. मात्र भिगवण बाजारपेठेत चालणाऱ्या सर्वच भिशी या सावकारी पद्धतीच्या आहेत आणि यातून प्रत्येक व्यापारी कचाट्यात अडकला असल्याची बतावणी काही अंशी चुकीची ठरत आहे. कारण भिशी हि मुळातच काही विश्वासातील व्यापारी एकत्र येत आपल्या जवळील शिलकीतून भिशी चालवीत असतात. निव्वळ नफा कमाविणे अथवा व्यवसाय वाढी अतिशय मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होने हा उद्देश यातून साधला जात नाही. तर सम विचारी व्यवसायिकाला मदत आणि त्यातून अल्पशे अर्थाजन असा भिशीचा मूळ उद्देश असतो.लाख भर रुपयाच्या कर्जासाठी सर्वसामान्य व्यापाऱ्याला बँकाचे उंबरे झिझवावे लागतात तर इतकंच नाही तर आपली संपत्ती तारण ठेवावी लागते. तारण ठेवुनही लाख रुपयातील 80 हजार रुपयेच ताब्यात मिळतात आणि लाखाचे व्याज चालू होते. काही बँका पतसंस्था याला अपवाद हि ठरत असतील मात्र सर्वसामान्य व्यापारी यांची जा चकरातून सुटका होण्यासाठी सर्वांनी एकत्र येत केलेला करार असतो. याला संपत्ती तारण लागत नाही. कोणाचा जामीनदार लागत नाही अथवा वेगळी टक्केवारी लागत नाही. एकमेकांना विश्वासात घेऊन चालविलेला अर्थ बाजार म्हणजेच हि भिशी.


मात्र याला काही संधीसाधू भिशी चालक यांनी मोठ्या नफ्याचे आणि कोटीच्या कोटी आकड्याचे स्वरूप देत घातकी भिशी सुरु केल्या. तर काही धनं दांडग्या बुडव्या व्यवसायिकानी आपली संपत्ती वाढविन्याचे साधन समजून भिशी चालकांना जीव देण्यास प्रवृत्त केले. आणि काहींनी भिशी हाच व्यवसाय समजून महिना, पंधरवडा, आठवडी इतकंच काय रोजच्या भिशी सुरु करून कमाई करण्यास सुरवात केली. यामुळे सर्व व्यापारी पेठेला संजीवनी ठरणारी भिशी बदनामीची शिकार होऊ लागली. अप प्रवृती कोणात्याही क्षेत्रात आल्यास त्या नुकसान कारक ठरतात त्याच प्रमाणे भिशीत घुसलेल्या या अजगारांचा आकार दिवसेंदिवस वाढत गेला आणि भिगवणची बाजारपेठ बदनामीची शिकार ठरली.
या बदनामी मागे ठरत मैलाचे दगड खालील प्रमाणे..
1) ज्यांची ऐपत नाही त्यांनी घेतलेल्या कोटीच्या कोटीची उड्डाने.
2) कोणताही वजा बेरीज न करता भिशी उचलून आपल्या संपत्तीत वाढ करून चालकाला दोरी घेण्याची वेळ आणणारी धनं दांडगी कुटुंब.
3) विश्वास संपादन करून आपली स्थिती मजबूत असल्याचा गवगवा करणारी मंडळी.
4) कोटीच्या उड्डानातं चालकांनी आपलेच परिवारातील नंबर घेत फसवणूक करणारे लबाड चालक.
वाचकांना सूचित करण्यात येते कि या माहितीतून भिशीचे कोणत्याही प्रकारचे समर्थन अथवा त्या कायदेशीर मार्गाने चालत असतात असं सांगण्याचा कोणातही उद्देश नसून सर्वसामान्य व्यापारी वर्गातील चर्चा दरम्यान समोर आलेले वास्तव मांडण्यात आले आहे. काही सूचना अथवा माहिती आल्यास त्यांचे स्वागत आहे.

भिगवण बारामती रोडवर उस वाहतूकीचा 6 वा बळी ; उपाय योजना करूनही जाताहेत जीव.

0

भिगवण पोलीस आणि महामार्ग पोलीस करत आहेत अपघात कमी होण्यासाठी रोज प्रयत्न आणि जनजागृती; परिवहन विभाग आणि कारखाना प्रशासन हि ऍक्शन मोड वर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुरु.

भिगवण वार्ताहर. दि. 13

भिगवण बारामती मार्गांवर निरगुडे पाटीजवळ उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटर ट्रॉलीचा आणि दुचाकी स्वाराचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उस वाहतूकीच हा 6 वा बळी असून अजून किती बळी गेल्यावर अपघात थांबणार हे न उलघडणार कोडे आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार संतोष नारायण हिरवे वय 51 रा. तांदूळवाडी बारामती यांचा या अपघातात मृत्यू झाला. हिरवे हे कल्याणी कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.भिगवण बाजूने बारामती बाजूला जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि दुचाकी यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या खांद्याच्या उजवी बाजूमध्ये उस अथवा लोखंडी रॉड घुसल्याने गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले. यात त्यांची बरगडी तुटल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे . यावेळी भिगवण येथील आपुलकीची सेवा ऍम्ब्युलन्सचे संचालक केतन वाघ यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी तक्रारवाडी येथील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र उपचाराअगोदरच त्यांनी आपले प्राण गमावले होते. अपघात घडल्यावर ट्रॅक्टर ड्रायव्हर हा अपघात स्थळापासून पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उस वाहतूकीचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून कारखाना प्रशासन तसेच परिवहन विभाग अनेक उपाय योजना राबवीत असताना आणि भिगवण पोलीस तसेच महामार्ग पोलीस रोज कारवाया तसेच जनजागृती करत असताना अपघाताचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.
अपघाताची खबर घेण्याचे काम भिगवण पोलीस रात्री उशिरा पर्यंत करत होते.शववीच्छेदन करण्यासाठी मृतदेह भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करणार आहेत.

क्षीरसागर विद्यालयात आंतरराष्ट्रीय मानवअधिकार जनजागृती ; ऍड. तुषार झेंडेपाटील यांचे मिळाले मार्गदर्शन

0

भिगवण वार्ताहर.दि.११

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे ओचीत्य साधून भिगवण येथील क्षीरसागर विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कायदे तसेच ग्राहक जागृती बाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी एडव्होकेट तुषार झेंडेपाटील अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार याविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाला माहिती व्हावी राष्ट्रीय आयोग त्यातील विविध कायदे सर्वसामान्यांना माहिती व्हावेत या उद्देशाने हा कार्यक्रम क्षीरसागर विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी मानवाचे हक्क आणि अधिकार तसेच मुलभूत कर्तव्य याबाबत झेंडेपाटील यांनी विवेचन करीत विद्यार्थांना उदाहरणासह महत्व पटवून दिले.यावेळी रायरेश्वर ते कुंभारगाव ३७ दिवस पायी प्रवास करणाऱ्या घनशाम केळकर यांच्या जनजागृती यात्रेचे स्वागत करण्यात आले.यावेळी दिलावर तांबोळी उपाध्यक्ष अ.भा.ग्रा.प .पुणे ,गणेश गुप्ते सचिव इंदापूर ,अर्चना गोरे पर्यावरण विभाग प्रमुख इंदापूर ,नाझिया सय्यद सदस्य पुणे जिल्हा यांच्या उपस्थितीत हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सर्व विद्यार्थी वर्गाने चौकस बुद्धीने कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.यावेळी झेंडेपाटील यांनी बोलताना विद्यार्थी हीच देशाची खरी ताकद असून त्यांना मानवाधिकार आयोग त्याचे कार्य आणि त्याची सार्वजनिक जीवनात असणारी आवश्यकता हि विद्यार्थ्यावर बिंबवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात ; अपघातात वाहनांनी पेट घेतल्याने चालकाचा होरपळून मृत्यू

0

ऊस हंगामातील चौथा बळी. परिवहन विभाग आणि कारखाना प्रशासन यांनी चालकांना प्रशिक्षण देण्याची मागणी.

भिगवण वार्ताहर.दि.७

भिगवण बारामती रोडवरील पिंपळे गावच्या हद्दीत उस वाहतूक करणारा ट्रक आणि ट्रॅकटर यांच्यात अपघात होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे ट्रॅकटर ड्रायव्हरचा जागीच जळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली .ऊस हंगाम सुरु झाल्यापासून परिसरातील हा चौथा बळी असून अपघातानंतर मृत ड्रायव्हरचा जळून अगदी कोळसा झाल्याचे पहावयाला मिळाले .त्यामुळे आतातरी कारखाना प्रशासन आणि परिवहन विभागाने मोकाट उस वाहतुकीवर अंकुश लावून निष्पाप नागरिकांच्या जीवाचा विचार करावा अशी मागणी समोर येत आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात अमोल राजू कुराडे रा.नातेपुते असे मृत ड्रायव्हरचे नाव आहे.हा अपघात रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला असून उसाने भरलेला ट्रक भिगवण बाजूने बारामती बाजूकडे जात असताना भिगवण बाजूला मोकळा असणारा ट्रॅकटर आणि ट्रोली यांच्यात जोराची धडक झाली.यात ट्रॅकटरची डीझेल टाकी फुटल्याने आग लागली असावी .यामुळे दोन्ही वाहनाने जोरदार पेट घेतला यात ट्रॅकटर ड्रायव्हर अडकल्यामुळे त्याला बाहेर पडणे शक्य झाले नाही.दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे कोणालाही मदत करणे शक्य झाले नाही त्यामुळे जवळपास दोन तास वाहतूक थांबली होती.भिगवण पोलिसांनी तातडीने घटना स्थळी भेट घेवून मदत कार्याला सुरवात केली.आग विझविण्यासाठी बिल्ट पेपर कारखान्याची एक आणि शेटफळ अग्रो कारखान्याच्या दोन अग्निशमन वाहने पाचारण करण्यात आली.अग्निशमन यंत्रणा पोलीस जवान आणि नागरिकांच्या मदतीने हि आग आटोक्यात आणली गेली.यावेळी वाहतूक पूर्णपणे थांबली होती.पोलिसांनी मदत करीत वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले.आगीमुळे ट्रॅकटर ड्रायव्हरचा जळून कोळसा झाल्याचे तर दोन्ही वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे दिसून आले.

या अपघातामुळे उस वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून अजून किती नागरिकांचा जीव गेल्यावर कारखाना प्रशासन आणि परिवहन विभाग जागा होणार असा सवाल नागरिक करीत आहेत .तर अपघातात जीव गेल्यास याची जबाबदारी सबंधित कारखाना प्रशासनावर निश्चित झाल्यावर निष्पाप नागरिकांचे जीव वाचतील अशी मागणी नागरिक करीत आहेत.

…..उस वाहतूक करणारी ट्रॅकटर यंत्रणा धोकेदायक आणि अगदी बेफिकीर वागत असून या मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेवून रस्त्यावर यावे लागत असल्याचे तसेच कारखाना प्रशासन आणि परिवहन विभागाने तातडीने लक्ष देवून ट्रॅकटर चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी नागरिक प्रामुख्याने करीत आहेत.दारू पिवून वाहने चालविणे ,परवाना नसणे ,कर्णकर्कश आवाजात गाणी लावणे ,प्रमाणापेक्षा जास्तीचा लोड वाहने ,मदनवाडी घाटात भरलेली वाहने यांची लागलेली शर्यत सर्वसामान्य नागरिकांना दिसते मात्र कारखाना प्रशांसन आणि परिवहन विभागाला दिसत नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

भिगवण ग्रामीण रुग्णालयाला उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची सरप्राईज व्हिजिट ; परिमंडळस्तरीय पथकाने घेतली कामकाज माहिती.

0

भिगवण वार्ताहर .दि.२९

भिगवण ग्रामीण रुग्णालयाला परिमंडळस्तरीय पथकाने अचानक सरप्राईज भेट दिली. आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ.भगवान पवार यांच्या सोबत वैदकीय अधिकारी पुणे डॉ.अभिराज सूर्यवंशी,डॉ.आनंद साबणे स्त्रीरोग तद्न्य भोर ,गणेश औटी कार्यालयीन अधीक्षक ,गणेश जगताप परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक ,धनाजी कोलगे मूल्य व सनियंत्रक अधिकारी ,सागर शेळके फॅसिलीटी मॅनेजर पुणे या पथकाने अचानक भेट दिली .

भिगवण ट्रोमा केअर सेंटर ‘कोमात’ आणि ग्रामीण रुग्णालयही आजारी असा मथळा असणाऱ्या बातम्या काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या या अनुषंगाने उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी रुग्णालयाला दिली असावी .यावेळी डॉ .पवार आणि सोबत आलेल्या पथकाने रुग्णालयाच्या प्रत्येक विभागाची पाहणी करीत कामकाजाची माहिती घेतली.तसेच या रुग्णालयात असणाऱ्या अस्वच्छतेबाबत पथकाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करीत कर्मचारी यांना सूचना केल्या.या भेटी दरम्यान भिगवण ग्रामीण रुग्णालयात १ स्त्रीरोग तद्न्य ,२ वैदकीय अधिकारी ,सहाय्यक अधीक्षक ,कनिष्ठ लिपिक इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते .

यावेळी पथकाला काही त्रुटी आढळून आल्या यात कंत्राटी पद्धतीने ९ कर्मचारी कार्यरत असताना रुग्णालयातील विविध कक्ष आणि उपकरणावर अत्यंत अस्वच्छता आढळून आली.रुग्णालयात अपेक्षेप्रमाणे प्रसूती होत नसल्याचे आढळून आले.मार्गदर्शक सूचनानुसार ओपीडीची वेळ ,वैदकीय अधिकारी यांचे नावे व उपलब्धता तसेच विविध कार्यक्रमाचे जनजागृती साहित्य दर्शनी भागात लावल्याचे दिसून आले नाही.कंत्राटी पद्धतीच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ व सहायक कार्यरत असताना अपेक्षित चाचण्या होत नसल्याचे तसेच पुरुषकक्ष व महिला कक्षामध्ये मार्गदर्शक सूचनानुसार खाटांचे बेडशीट बदलण्यात येत नसल्याचे आढळून आले.

याची गंभीर दखल उपसंचालक डॉ.पवार यांनी पुढील काळात रुग्णसेवेत मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले .तसेच रुग्ण त्यांचे नातेवाईक ,नागरिक आणि पत्रकार यांच्याशी समन्वय ठेवून रुग्णालयातील सेवा सुविधांची जास्तीत जास्त जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या .

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाखाली चिरडून एकाचा मृत्यू ; अपघात नसून घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.

0

भिगवण वार्ताहर.दि.२३

भिगवण बारामती मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत उस वाहतूक करणाऱ्या वाहनाखाली चिरडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे १.३० च्या सुमारास घडली.उस तोडणीच्या हंगामातील हा दुसरा अपघातातील बळी असून अजून किती बळी गेल्यावर कारखाना प्रशासन आणि परिवहन विभाग जागा होणार ? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.तर हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृत व्यक्तींच्या नातेवाईक करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हरी आण्णा धोत्रे वय.२७ रा.मदनवाडीची भकासवाडी असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.पिंपळे गावाच्या हद्दीत वीट कारखान्याच्या पूर्व दिशेला हा अपघात घडला असून अपघातात धोत्रे याचा जागीच मृत्यू झाला.तर त्याच्या ताब्यात असणाऱ्या दुचाकीचा अगदी चुराडा झाला आहे.तर वाहन चालक अपघात झाल्यानंतर वाहन जाग्यावरच सोडून पळून गेला असल्याची माहिती मिळत आहे. बेदरकारपणे चालणाऱ्या उस वाहतुकीमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात असून कारखाना प्रशासन आणि परिवहन विभाग मात्र काहीच उपाययोजना करीत नसल्याचे जाणवून येत आहे.भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी वेळोवेळी कारखाना प्रशासनाला सूचना देवूनही अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केली गेली नाही.तर ओव्हरलोड वाहने ,विना लायसन्स ड्रायव्हर ,विना पासिंग वाहने ,विना रीप्लेकटर वाहने ,दारू पिवून चालवली जाणारी वाहने यांच्यावर परिवहन विभागाला कारवाई करण्यासाठी वेळ उपलब्ध नाही काय असा प्रश्न निर्माण होत आहे .तर अपघातात घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे निर्माण होणारी स्थिती कारखानदार आणि वाहतूकदार यांना समजत नसल्यामुळे माणसे अशीच किड्यामुंग्या सारखी चिरडली जात राहणार अशी परीस्थिती दिसून येत आहे.

आज अपघातात मृत्यू झालेल्या हरी धोत्रे यांच्या नातेवाईकांना हा अपघात नसून ज्या दोन व्यक्ती हरी यांना सोबत घेवून गेल्या त्यांनीच काही घातपात केल्याचा संशय आहे .याबाबत अनेक नातेवाईक ग्रामीण रुग्णालय येथे जमा होवून त्यांनी या प्रकरणी सखोल तपास व्हावा अशी मागणी केली आहे .

फेसबुक वरील ओळखीच्या माध्यमातून विश्वास संपादन करून बलात्कार करीत पीडितेचे सोने लुबाडणारया नराधमाच्या मुसक्या भिगवण पोलिसांनी आवळल्या.

0

भिगवण वार्ताहर .दि.७

भिगवण पोलिसांनी धाडसी कारवाई करीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख करीत विश्वास संपादित झालेल्या अबलेच्या सोन्यावर डल्ला मारून शरीराचे लचके तोडणार्या  क्रूर आरोपीच्या मुसक्या आवळीत मुद्देमाल जप्त केला.भिगवण पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक करून स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाच्या इतरही गुन्ह्याच्या तपास कारवाईसाठी अधिकार वाढवावेत अशी मागणी केली जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी गणेश शिवाजी कारंडे याने भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील एका सौंदर्य सुधार केंद्रातील एका पिडीतेची फेसबुक च्या माध्यमातून ओळख करीत विश्वास संपादन केला.यावेळी याने आपले नाव संग्राम पाटील असल्याचे आणि पोलीस विभागाशी आपले सबंध असल्याचे काही फोटो ओळखीच्या ठिकाणी ठेवले.तर पिडीतेला सौंदर्य सुधार केंद्राच्या साठी लागणारे कर्ज मिळवून देतो म्हणून भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजवर बोलावून काही कागदपत्रावर सह्या घेतल्या.तसेच कर्जप्रकरणासाठी शरीरावरील खुणा टाकाव्या लागतील म्हणून अंगावरील कपडे काढून या नराधमाने अबलेच्या शरीराचे लचके तोडले.यावेळी महिला अचानक झालेल्या परिस्थितीतून सावरत असताना आरोपीने महिलेच्या सोन्यावर डल्ला मारून पलायन केले.या विषयी तक्रार प्राप्त होताच भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी  गुन्हे शाखेतील अमलदार महेश उगले ,संतोष मखरे प्रमोद पालसांडे ,वैष्णवी राउत या पथकाची नियुक्ती करीत तपासाला सुरवात केली.सदर आरोपी फेसबुक या सोशल मिडीयावर ‘ संग्राम पाटील ’ तसेच ‘ पृथ्वीराज पाटील ’ नावाने कार्यरत असल्याचे पथकाच्या समोर आले.तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबऱ्याच्या  माध्यमातून सखोल तपास केला असता आरोपी अकलूज पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे समजले.तसेच हा सराईत गुन्हेगार असून वेशभूषा बदलून तो तोतया पोलीस म्हणून वावर करीत असल्याची पक्की माहिती भिगवण पोलिसांना मिळाली .पोलिसांनी तातडीने पाउल उचलीत सदर  आरोपीला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला.माननीय न्यायालया समोर हजर करत असताना न्यायालया त्याला पोलीस कोठडी सुनावली.या आरोपीवर महिला बाबत इतर पोलीस ठाण्यात गुन्हे असून आणखीन काही पीडितांच्या बाबत काही तक्रारी असल्यास पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन सपोनि विनोद महांगडे यांनी केले आहे .

भिगवण पोलिसांची सिघम कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल ,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ,विभागीय अधिकारी डॉ .सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद महांगडे ,अमलदार सचिन पवार ,महेश उगले ,संतोष मखरे ,प्रमोद गलांडे ,गणेश पालसांडे ,वैष्णवी राउत यांच्या पथकाने केली.  

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर च्या अपघातात मदनवाडी येथील शेतकऱ्याचा मृत्यू ; भिगवण बारामती रोडवरील घटना

0

भिगवण वार्ताहर. दि. 4
भिगवण बारामती राज्यमार्गांवर मदनवाडी गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक लागून मदनवाडी गावातील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.


याबाबत मिळालेल्या माहिती नुसार किशोर बाळासाहेब साळुंखे वय 30 रा. मदनवाडी या शेतकरयाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या साळूंखे यांना मदनवाडी गावाच्या कमानी समोर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीची धडक बसली. दोन ट्रॉली असल्यामुळे त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची ऍम्ब्युलन्स सेवा चे संचालक केतन वाघ यांनी तातडीने मदत करीत मृत साळुंखे यांचा मृतदेह भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदन करण्यासाठी पाठविला. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रकिया पूर्ण करण्याचे काम पोलीस ठाण्याकडून केले जात आहे.
मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर रुपी राक्षसी यमराजाने निष्पाप शेतकऱ्याचा जीव घेतला असून याबाबत मदनवाडीकर हळहळ व्यक्त करीत असल्याचे दिसून आले.तर कर्णकर्कश आवाजात बेधुंद वेगात अतिलोड ऊस वाहतूकी वर कारखाना प्रशासन पोलीस प्रशासन आणि परिवहन विभागाने लक्ष न दिल्यास अपघातात अजूनही निष्पाप जीव धोक्यात येतील अशी भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत..

अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीने गुदमरला भिगवण बाजारपेठेचा श्वास ; भिगवण ग्रामपंचायत आणि पोलिसांनी कारवाई करण्याची होतेय मागणी

0

भिगवण वार्ताहर. दि. 4

भिगवण बाजारपेठ तीन जिल्ह्यातील आणि चार तालुक्यातील जवळपास 30 गावे आणि 20 वाडीवस्ती वरील ग्राहकांसाठी रोज लागणाऱ्या वस्तू खरेदी साठी योग्य ठिकाण मानले जाते. मात्र या ठिकाणी वाढत असलेले अतिक्रमण आणि काही आपलाच व्यवसाय व्हावा स्वार्थी वृतीच्या व्यापारी वर्गामुळे बाजारपेठेतील रस्ते कोंडले जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.

उजनी धरणाच्या निर्मिती नंतर भिगवण बाजारपेठ नाव लौकिक वाढीस लागला. या ग्रामीण भागाची शहरी भागाकडे वाटचाल सुरु झाली. ग्राहकांना रोज आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा अगदी योग्य किंमतीत मिळू लागल्याने आसपास च्या खेडेगावातील ग्राहक या बाजारपेठेकडे आकर्षित झाला. दळण वळणाच्या सुविधेत दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे दिलासा वाढू लागला. बाजार समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाने भाजीपाला आणि धान्य बाजार तसेच शेळी मेंढी यांचा व्यवसाय वाढीस लागावा यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र बाजारपेठ वाढ होत असतानाच अतिक्रमनाचा महामेरू वाढीस लागल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य ग्राहक तसेच व्यापारी वर्गाला होऊ लागला आहे. भिगवण ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांचा योग्य मेळ बसत नसल्यामुळे अतिक्रमण करणारांची मस्ती वाढत असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. भिगवण पोलिसांनी बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अगदी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून पी 1 पी 2 सारखी वाहतूक व्यवस्था मंजूर करून आणली होती. मात्र काही नतदृष्ट राजकीय पुढारी आणि राजकीय पाठबळ असणारया काही व्यापाऱ्यांनी विरोध करीत ही योजना बासनात गुंडाळून ठेवण्यासाठी विरोध केला. याचा फटका त्या व्यापारी वर्गाला बसला असून वाहतूक कोंडी नसणाऱ्या ठिकाणी ग्राहक खरेदीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय गणित आणि पोलिसांच्या शांत संयमी भूमीके मुळे अतिक्रमण करणारांचे धाडस वाढत असून हे बाजारपेठेच्या सर्वांगीण आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक वर्ग आणि व्यापारी वर्गातून हे अतिक्रमण काढण्याची आणि वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी केली जात आहे.

भिगवण राशीन राज्यमार्गांवर अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू ; अपघात करून वाहन पसार

0

भिगवण वार्ताहर. दि. 13

भिगवण राशीन राज्यमार्गांवर डिकसळ गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 9 ते 10 च्या सुमारास घडली.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अपघातात विजय सीताराम बांडे वय 42 राहणार खेड ता. कर्जत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ठोकर देणारे वाहन अपघात करून पसार झाले. या अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची जागा ऍम्ब्युलन्स सर्व्हिस चे संचालक केतन वाघ यांनी तातडीने घटना स्थळी भेट घेत अपघातातील रुग्णाला वैदकीय उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला मात्र अगोदरच बांडे यांचा मृत्यू झाला होता.याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला मृत बांडे यांच्या मेहुणे संजय रामचंद्र मोरे रा. खेड यांनी खबर दिली असून भिगवण पोलीस अपघातातील वाहणाचा तपास घेत आहेत.
सदर अपघात आणि अपघातातील अज्ञात वाहणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे इन्चार्ज विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अन्सार शेख आणि विजय लोढी करीत आहेत..

बारामती भिगवण राशीन राज्य मार्गाचे नूतनीकरण नव्यानेच झाले असून यावर वाहनांचा वेग कमालीचा वाढला असल्याचे दिसून येत आहे. तर मागील काही दिवसापासून या राज्य मार्गाची अपघाती राज्यमार्ग अशी ओळख बनत असून यात नागरिकांना आपला जीव गमवावा तसेच कायमचे अपंगत्व स्वीकारावे लागत आहे. तर बारामती पासुन भिगवण पर्यंत अपघातांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मदनवाडी तक्रारवाडी येथील टप्प्यात अनावश्यक डिव्हायडर ओपनिंग नागरिकांच्या जीवावर बेतत असून याकडे प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे.