भिशीचे समर्थन नक्कीच नाही मात्र वाईट प्रवृती ठेचण्याची गरज…
भिगवण वार्ताहर. दि. 30
भिगवण बाजारपेठेत चालू असणाऱ्या भिशी (सार्वजनिक फंड ) बाबत काही समाज माध्यमातून होत असलेल्या बदनामी बाबत व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून भिशी हा सर्वसामान्य व्यापारी वर्गाचा श्वास असून भिशी बंद पडल्यास व्यापारी पुन्हा सावकारी पाश आणि पतसंस्था च्या जाळ्यात अडकला जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर काही लुटारू चालकांमुळे आणि धन दांडग्या बुडव्या सदस्यामुळे सर्वासामान्य व्यापारी वर्गासाठी असणारी संजीवनी बंद होने अन्याय कारक ठरणार आहे.
भिगवण शहरातील दोन निष्पाप नागरिकांनी कर्जाचा बोजा आणि भिशी सदस्यांनी पैसे बुडाविल्याने आपल्या जीवाची आहुती दिली. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाची आणि समाजाची कधीही न भरून येणारी हानी झाली. या आहुती पाठीमागे भिशी आणि सावकारी करणारी काही प्रवृत्ती असल्याचा कुटुंब आणि नातेवाईकांचा आरोप आहे आणि तो खराही आहे. मात्र भिगवण बाजारपेठेत चालणाऱ्या सर्वच भिशी या सावकारी पद्धतीच्या आहेत आणि यातून प्रत्येक व्यापारी कचाट्यात अडकला असल्याची बतावणी काही अंशी चुकीची ठरत आहे. कारण भिशी हि मुळातच काही विश्वासातील व्यापारी एकत्र येत आपल्या जवळील शिलकीतून भिशी चालवीत असतात. निव्वळ नफा कमाविणे अथवा व्यवसाय वाढी अतिशय मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होने हा उद्देश यातून साधला जात नाही. तर सम विचारी व्यवसायिकाला मदत आणि त्यातून अल्पशे अर्थाजन असा भिशीचा मूळ उद्देश असतो.लाख भर रुपयाच्या कर्जासाठी सर्वसामान्य व्यापाऱ्याला बँकाचे उंबरे झिझवावे लागतात तर इतकंच नाही तर आपली संपत्ती तारण ठेवावी लागते. तारण ठेवुनही लाख रुपयातील 80 हजार रुपयेच ताब्यात मिळतात आणि लाखाचे व्याज चालू होते. काही बँका पतसंस्था याला अपवाद हि ठरत असतील मात्र सर्वसामान्य व्यापारी यांची जा चकरातून सुटका होण्यासाठी सर्वांनी एकत्र येत केलेला करार असतो. याला संपत्ती तारण लागत नाही. कोणाचा जामीनदार लागत नाही अथवा वेगळी टक्केवारी लागत नाही. एकमेकांना विश्वासात घेऊन चालविलेला अर्थ बाजार म्हणजेच हि भिशी.
मात्र याला काही संधीसाधू भिशी चालक यांनी मोठ्या नफ्याचे आणि कोटीच्या कोटी आकड्याचे स्वरूप देत घातकी भिशी सुरु केल्या. तर काही धनं दांडग्या बुडव्या व्यवसायिकानी आपली संपत्ती वाढविन्याचे साधन समजून भिशी चालकांना जीव देण्यास प्रवृत्त केले. आणि काहींनी भिशी हाच व्यवसाय समजून महिना, पंधरवडा, आठवडी इतकंच काय रोजच्या भिशी सुरु करून कमाई करण्यास सुरवात केली. यामुळे सर्व व्यापारी पेठेला संजीवनी ठरणारी भिशी बदनामीची शिकार होऊ लागली. अप प्रवृती कोणात्याही क्षेत्रात आल्यास त्या नुकसान कारक ठरतात त्याच प्रमाणे भिशीत घुसलेल्या या अजगारांचा आकार दिवसेंदिवस वाढत गेला आणि भिगवणची बाजारपेठ बदनामीची शिकार ठरली.
या बदनामी मागे ठरत मैलाचे दगड खालील प्रमाणे..
1) ज्यांची ऐपत नाही त्यांनी घेतलेल्या कोटीच्या कोटीची उड्डाने.
2) कोणताही वजा बेरीज न करता भिशी उचलून आपल्या संपत्तीत वाढ करून चालकाला दोरी घेण्याची वेळ आणणारी धनं दांडगी कुटुंब.
3) विश्वास संपादन करून आपली स्थिती मजबूत असल्याचा गवगवा करणारी मंडळी.
4) कोटीच्या उड्डानातं चालकांनी आपलेच परिवारातील नंबर घेत फसवणूक करणारे लबाड चालक.
वाचकांना सूचित करण्यात येते कि या माहितीतून भिशीचे कोणत्याही प्रकारचे समर्थन अथवा त्या कायदेशीर मार्गाने चालत असतात असं सांगण्याचा कोणातही उद्देश नसून सर्वसामान्य व्यापारी वर्गातील चर्चा दरम्यान समोर आलेले वास्तव मांडण्यात आले आहे. काही सूचना अथवा माहिती आल्यास त्यांचे स्वागत आहे.























