Friday, July 4, 2025
Home Blog

भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना एकाचा अपघाती मृत्यू ; तोडलेल्या बॅरिगेट मुळे निष्पाप नागरिकाला गमवावा लागला जीव.

0

महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जी पणाचा बळी ; महामार्गांवरील तोडलेल्या बॅरिगेट बाबत कोणतीही कोणतीही कारवाई नाही. तसेच दुरुस्ती साठी यंत्रणा पाठविली नाही.

भिगवण वार्ताहर.दि.२३

भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्ग ओलांडीत असताना ट्रकची धडक बसून एका पादचार्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली .महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि व्यावसायिकांच्या आपमतलबी वृतीचा हा बळी असून संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात दिलीप निवृत्ती गायकवाड वय .४५ रा.कळस असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.गायकवाड हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कुरकुंभ या ठिकाणी जात असताना पुणे बाजूला असणाऱ्या सागर हॉटेल समोर सर्विस रस्त्यावर आपली गाडी पार्क करून सोलापूर बाजूला असणाऱ्या स्वीटहोम कडे येत होते.महामार्ग प्रशासनाने याठिकाणी लोखंडी बेरीगेट केलेले होते मात्र काही अज्ञात व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी रात्रीच्या वेळेत कटर वापरून हे बेरीगेट तोडले आहेत.याच ठिकाणाहून गायकवाड जात असताना सोलापूर बाजूला जाणार्या ट्रक ने त्यांना धडक दिली.अपघात झाल्यावर ट्रक ड्रायव्हरने जखमीला मदत न करता पळ काढला होता.मात्र पत्रकार राजेभोसले यांनी त्याचा पाठलाग करून पकडीत पोलिसांच्या स्वाधीन केले.भिगवण पोलिसांनी ट्रक ड्रायव्हर आकाश मधुकर साखरे वय.३२ रा.हिप्परगा तुळजापूर याला ताब्यात घेवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

मात्र या अपघाताला ट्रक ड्रायव्हर सोबतच बेरीगेट तोडणारे व्यावसायिक आणि महामार्ग प्रशासन असून तोडलेले बेरीगेट पूर्ववत करण्याची जबाबदारी असताना हलगर्जीपणा केला आहे.महामार्ग प्रशासनाने राजकीय दबावापोटी बाजार भरणाऱ्या ठिकाणी बेरीगेट केले नसल्यामुळे बाजार दिवसी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपला व्यवसाय व्हावा म्हणून अज्ञात व्यावसायिकांकडून केल्या जाणार्या चुकीच्या कामामुळे अनेक निष्पाप माणसांचे जीव जात असताना महामार्ग प्रशासन आणि महामार्ग पोलीस कोणतीही कायदेशीर कारवाई करताना दिसून येत नाहीत.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी बेरीगेट तोडल्यामुळे अपघात झाल्याचे मान्य करीत बेरीगेट विषयात हलगर्जीपणा करणार्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.तसेच महामार्ग प्रशासनाला तोडलेले बेरीगेट दुरुस्त करण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले.

भिगवण पोलीस आवारातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव ; इच्छुक खरेदीदारांना सहभाग नोंदविण्याचे सपोनि विनोद महांगडे यांचे आवाहन.

0

भिगवण वार्ताहर. दि.. 12

भिगवण पोलीस स्टेशन यांनी विविध कारवाईत तसेच संशयित गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन अनेक वेळा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात आले होते. याबाबत अनेक वेळा प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया तुन आवाहन करण्यात आले होते.
या आवाहना नंतर अनेक मूळ मालकांनी आपली वाहने नेली होती. मात्र या आवाहना नंतरही अनेक वाहणांची मालकी सांगणारा कोणीच समोर न आल्याने अखेर ही बेवारस वाहने समजून त्यांचा भिगवण पोलीस ठाण्याच्या आवारात लिलाव करण्यात येणार असल्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन तसेच कायदेशीर प्रकिया पूर्ण करून पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिल्या आहेत.

सदर लिलाव प्रकिया बाबत सर्व प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडिया यावर प्रसिद्धी देण्यात आली असून लिलाव झालेली सदरची वाहने ही जागेवर स्क्रॅप (मोडतोड करून भंगार )करण्यात येणार आहेत. या लिलाव प्रकीयेमध्ये ज्या अधिकृत भंगार व्यवसायीक यांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी त्यांचा अधिकृत परवाना, आधार कार्ड, घेवुन भिगवण पोलीस स्टेशन येथे 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी ११:०० वा हजर रहावे असे आवाहन भिगवण पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी केले आहे.

भिगवण ग्रामपंचायत प्रशासनाकडून अपंग कल्याण निधीचे होणार वाटप ; अपंग (दिव्यांग )लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरपंच गुराप्पा पवार यांचे आवाहन.

0

भिगवण वार्ताहर. दि. 15
भिगवण गावातील अपंग (दिव्यांग )नागरिकांचा निधी देण्याच्या कार्यवाहीला सुरवात केली असून लाभार्थी अपंग नागरिकांनी ग्रामपंचायत विभागाकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन सरपंच गुराप्पा पवार तसेंच उपसरपंच सत्यवान भोसले यांनी केले. तर ग्रामपंचायत सर्व लाभार्थी यांना निधी दिला जाणार असल्याची माहिती ही यावेळी सरपंच पवार यांनी दिली.
पंचायत राज संस्था च्या उत्पनाच्या 5 टक्के निधी अपंग( दिव्यांग )नागरिकांना अपंग निधी दिला जातो. भिगवण ग्रामपंचायत विभागाकडून दरवर्षी आलेला निधी वितरित केला जातो. मात्र काही लाभार्थी पुरेशी माहिती आणि योग्य ती कागदपत्रे सादर न केल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहतात. भिगवण गावातील कोणताही लाभार्थी या निधी पासून वंचित राहू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत असून सर्वाना यांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे सरपंच गुराप्पा पवार आणि उपसरपंच सत्यवान भोसले यांनी सांगितले.
तसेच कागदपत्रे जमविण्यासाठी काही अडचण असल्यास यात ही प्रशासनाकडून मदत केली जाणार असल्याचे सांगून सर्व लाभार्थी यांना यांचा फायदा मिळावा ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत सर्व मीडिया आणि प्रिंट मीडियाला प्रेस नोट देऊन आवाहन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी इंदापूर बाजार समितीचे माजी उपसभापती पराग रमेशराव जाधव, इंदापूर पंचायत समितीचे उप सभापती संजय पंढरीनाथ देहाडे, उपसरपंच सत्यवान भोसले, माजी सरपंच तानाजी वायसे, दत्ता धवडे, जयदीप जाधव, बाबासाहेब शिंदे, आबा काळे, प्रतिमा देहाडे, मछिंद्र खडके कपिल भाकरे, जुलेखा शेख उपस्थित होते.

पुणे so

0

पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी ब्रिज वरून कंटेनर खाली कोसळला. चालकाचा अपघातात मृत्यू.

0

भिगवण वार्ताहर. दि. 15
पुणे सोलापूर महामार्गांवर मदनवाडी ब्रिज वरून सर्व्हिस रोड वर कंटेनर कोसळल्याने झालेल्या भीतीदायक अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या कंटेनर खाली इतर वाहने आणि नागरिक न आल्याने मोठी जीवितहानी टळली. या भयानक अपघाताने तरी भिगवण कर नागरिक जे महामार्गांवर अतिक्रमण करून व्यवसाय करतात आणि अनधिकृत पणे पार्किंग करतात त्यांचे डोळे उघडतील अशी आशा व्यक्त होत आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे सोलापूर महामार्गांवरील पुणे बाजूकडे जाणाऱ्या कंटेनर एमएच ४३ सीके ६५११ हा मदनवाडी गावच्या हद्दीत अशोका हॉटेल समोर मुख्य रस्त्यावरील ब्रिज वरून खाली कोसळला. या अपघातात चालक श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव वय ३७ वर्षे, रा. मुंबई मूळ रा उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात 6 वाजण्याच्या सुमारास घडला असून झोपेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे 40 ते 50 फूट खाली असणाऱ्या सर्व्हिस रोडवर कंटेनर आदळला. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन अथवा प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तसेच महामार्ग पोलिसांनी घटना स्थळी भेट घेत अपघात ग्रस्त वाहन काढण्याचे कार्य सुरु केले. कंटेनर समोरील वाहन तातडीने काढून कंटेनर काढण्यासाठी काम सुरु केले.कंटेनर बाजूला केल्यावर या खाली कोण दबले आहे काय याचा शोध लागेल. मात्र हा अजस्त्र कंटेनर उचलण्यासाठी लागणारी सामग्री जमविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

या अपघाताने तरी भिगवण कर नागरिकांना जाग यावी ही अपेक्षा कारण महामार्गवर अशा प्रकारे अनेक अपघात घडले असून यातून काही बोध भिगवण करानी घेतला असल्याचे आतापर्यंत तरी दिसून आले नाही. भिगवण बस स्थानकासमोर असाच एक अपघात घडला होता. तर एका माथेफिरूने बस पळवून केलेला अपघात तसेच पुणे बाजूला जाणाऱ्या इंडिका गाडीने अनेक गाड्यांचे केलेले नुकसानाचा अपघात, गेल्या 15 दिवसापूर्वी आजचा अपघात घडला त्याच समोर घडलेला अपघात अशी अपघातांची मालिका रोज घडत असूनही अजूनही रोड वर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. तर महामार्ग पोलीस आणि हायवे प्रशासन अपघात झाल्यावर पंचनामा शिवाय अनधिकृत पार्किंग आणि व्यवसाय हटविताना दिसून येत नाही. या अपघाताने तरी सर्वांचे डोळे उघडून जिवा पेक्षा व्यवसाय मोठे नाहीत याची जाणीव व्हावी ही तमाम नागरिकांची मागणी.

भिगवण मध्ये होळी आणि धुलवड सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी

0

भिगवण वार्ताहर. दि. 14

भिगवण शहरामध्ये होळी आणि धुलवड सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली असून सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भिगवणची बाजारपेठे आसपासच्या 15 गावे आणि 40 च्यावर असणाऱ्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना रोज लागणाऱ्या वस्तू आणि सेवाचे ठरलेलं ठिकाण. त्यातच भिगवण साठी सर्व गाव आणि वाड्या वास्त्यावरून दळणवळणाचे जाळे चांगल्या प्रकारे तयार झाले आहे.त्यामुळे नागरिकांना सहज खरेदी साठी येता येते.

होळी आणि धुलवड सणाच्या निम्मिताने भिगवण बाजारपेठेत गर्दी वाढत असून व्यापारी वर्गात यामुळे समाधान निर्माण झाले आहे. नुकताच उसाचा गाळप हंगाम पूर्ण झाल्यामुळे शेतकरी वर्ग आणि मजूर वर्ग आपल्या कामातून थोडासा निवांत झाला आहे. तर कारखान्यानी बिले सोडल्यामुळे खिशात पैसा आला असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच सध्या यात्रा आणि जत्राचा हंगाम सुरु होत असून नागरिकांचा खरेदी करण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

कापड दुकाने, किराणा दुकाने, इलेॅक्ट्रिक दुकाने आणि हॉटेल मध्ये ग्राहकांची चेहेल पेहेल वाढली असून लग्न सराई सुरु झाल्याने सरांफी दुकानात ही काही प्रमाणात ग्राहक दिसून येत आहेत.

बाजारपेठेतील गर्दीवर भिगवण पोलिसांचे लक्ष असून गजबलेल्या चौकात पोलीस जवान तसेच होमगार्ड यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवला जात आहे.तसेच पोलीस धुलवड आणि होळीच्या पार्श्वभूमीवर ड्रॅन्क अँड ड्राइव्ह करणाऱ्या नागरिकांना जनजागृती आणि कारवाई करणार आहेत…..सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे

मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीचा 20 लक्ष रुपयाचा निधी ; भिगवण वैकुंठ भूमीत होणार निवाऱ्याची सोय

0

भिगवण वार्ताहर.दि.११

भिगवण येथील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शेडचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे शुभहस्ते सरपंच गुराप्पा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले .कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे यांनी सांगितले.

भिगवण वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी शेडची व्यवस्था होती मात्र सुशोभीकरण करताना आणि स्मशानभूमीची उंची वाढविण्याच्या हेतूने तत्कालीन सरपंच तानाजी वायसे यांच्या कार्यकाळात हे शेड काढण्यात आले होते.मात्र शेड काढल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांनी याबाबत मंत्री दतात्रय भरणे यांच्याकडे मागणी केली होती.याच मागणीची तातडीने दखल घेत मंत्री भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीतून २० लाख रुपयाचा निधी मंजूर केला.या शेडचे भूमिपूजन आज करण्यात आले.

राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच गुराप्पा पवार, राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे,उपसरपंच सत्यवान भोसले ,बाजार समिती उपसभापती पराग जाधव ,पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे ,माजी सरपंच तानाजी वायसे ,दत्ता धवडे ,माजी उपसरपंच प्रदीप वाकसे ,अजिंक्य माडगे ,अशोक शिंदे ,जावेद शेख ,तुषार क्षीरसागर ,सचिन बोगावत ,बापूराव थोरात ,संदीप वाकसे ,मोहन शेंडगे ,वैभव देवकाते ,रोहित भरणे ,अमोल देवकाते , शुभम शेलार ,आप्पासाहेब गायकवाड ,रोहित शेलार ,विक्रम देवकाते ,निखील बोगावत ,अमोल वाघ ,आकाश उंडाळे ,दत्तात्रय पाचांगने ,अनिल तांबे  ,सुरेश बिबे ,दिनानाथ मारणे,भाऊसाहेब भरणे ,संदीप शेलार उपस्थित होते.

तक्रारवाडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ; जागतिक महिला दिनी स्तुत्य उपक्रम.

0

भिगवण वार्ताहर.दि.८

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तक्रारवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करीत त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. ग्रामपंचायत तक्रारवाडी गावच्या सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेविका ,आरोग्य उपकेंद्र अधिकारी ,वायरमन ,आरोग्य सेविका ,अंगणवाडी सेविका ,स्वस्त धान्य दुकानदार ,जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख, महिला शिक्षिका, ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचारी या सर्वच पदावर महिला काम करत असल्यामुळे दररोजच महिला दिन असतो मात्र त्यांच्या कार्याचा आजच्या दिवशी सन्मान करण्यात आला .

या जन्मात देवाला जितके महत्व दिले जाते तितकेच महत्व ‘ ती ‘ला म्हणजे महिलेला दिले जाते .ती कधी आई असते तर कधी ताई असते तसेच ती जीवनदायी आणि करुणासागर असते .याच महिलेचा सन्मान व्हावा म्हणून आजच्या दिवशी महिलादिन साजरा केला जातो.इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणार्या तक्रारवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थाच्या वतीने आज हा सन्मान घेण्यात आला.यावेळी सरपंच मनीषा वाघ ,उपसरपंच आशाताई जगताप ,ग्रामपंचायत सदस्या संगीता वाघ,प्राजक्ता वाघ,ग्रामसेविका शोभा जाधव ,उपकेंद्र आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप ,वीज मंडळ कर्मचारी गीतांजली कन्ठाळे ,कृषी अधिकारी पल्लवी काळे स्वस्त धान्य दुकानदार पार्वती जगदाळे ,जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख मनीषा दुर्गे ,राष्ट्रवादी तालुका महिला उपाध्यक्षा सीमा काळंगे , आरोग्य सेविका स्वाती शिंदे ,ज्योती जगताप ,साधना वाघ तसेच मदनवाडी गावच्या माजी सरपंच आम्रपाली बंडगर यांचा यावेळी बहुमान करण्यात आला.यावेळी सरपंच मनीषा वाघ ,विलास गडकर ,महेश वाघ ,मुख्याध्यापक राजेश नाचन , सीमा काळगे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

यावेळी माजी सरपंच सतीश वाघ ,शरद वाघ ,अंजना थोरात ,गौरी काळंगे ,दिपाली वाघ ,मनीषा चौधरी ,शोभा पिसाळ ,कविता वाघ ,संगीता खडके,तेजस्विनी भोसले ,नंदा साळुंखे, तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत तक्रारवाडी ,ग्रामस्थ तक्रारवाडी,शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने तर आभार मनीषा चौधरी यांनी मांडले .

भिगवण गावच्या हिंदू खाटीक समाजासाठी स्वखर्चाने बोअर ; बाजार समिती माजी उपसभापती पराग जाधव यांचे कौतुकास्पद कार्य

0

भिगवण वार्ताहर .दि. ७

भिगवण गावातील हिंदू खाटिक समाजाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करून बोअर मारून २४ तास पाणी उपलब्ध करण्याचे काम भिगवण गावच्या पराग जाधव यांनी केले.त्यांच्या या कामाचे कौतुक खाटिक समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खडके यांनी ‘ गावचा नेता असावा तर असा ’ उल्लेख करीत समाजाच्या वतीने सत्कार केला.

गावचा पुढारी म्हटल कि आश्वासन देन आणि नागरिक आणि प्रत्येक समाजाला झुलवत ठेवण हि परिस्थिती सर्व ठिकाणी पहावयाला मिळते .मात्र भिगवण गावात याच्या उलट परिस्थिती दिसून आली . बाजार समितीचे माजी उपसभापती आणि भिगवण गावचे सदस्य पराग रमेशराव जाधव यांनी हिंदू खाटिक समाजाला आवश्यक असणारा जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक मदत केली.फक्त जागा मिळवून देण्याचा प्रयत्न केला नाहीतर या ठिकाणी स्वतःच्या पैशाने बोअर मारून पाण्याची सोय करून दिली.त्यामुळे हिंदू खाटिक समाज बांधवांनी जाधव यांचे आभार व्यक्त केले. या बोअर पूजन आणि सत्कार समारंभासाठी सत्यवान भोसले ,दत्ता धवडे ,अमितकुमार वाघ ,देवानंद शेलार ,तानाजी वायसे ,गणेश कांबळे,राजेंद्र जमदाडे ,बबलू कांबळे ,मनोज खडके ,बंडू ताडे,प्रशांत कांबळे ,हनुमंत खडके ,सौरभ जमदाडे ,आकाश कांबळे,केतन कांबळे आदित्य थोर्पे ,रेश्मा खडके ,त्रिवेणी कांबळे ,शुभांगी कांबळे ,रुपाली ताडे,तनुजा जमदाडे उपस्थित होत्या .

यावेळी बोलताना हिंदू खाटिक समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खडके यांनी पराग जाधव यांनी समाजासाठी नेहमीच योगदान दिले असल्याचे सांगितले.समाजासाठी जागा मिळवून देण्यासाठी त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.तर आज स्वतःच्या खिशातून समाजासाठी पाणी मिळवून दिल्याने समाज त्यांचा ऋणी असल्याचे सांगितले.

भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी ;ऍग्रो कारखाना परिसरातून चोरीला गेलेला ट्रॅक्टर संशयित चोरट्यासह ताब्यात.

0

भिगवण वार्ताहर.दि.३

भिगवण पोलिसांनी दमदार कामगिरी करत उस वाहतूक करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याचा बारामती अग्रो कारखाना शेटफळ परिसरातून चोरी झालेला ट्रॅकटर हस्तगत करीत चोराच्याही मुसक्या आवळल्या .१०० ठिकाणाचे सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय गोपनीय बातमीदाराच्या मदतीने केलेल्या कामगिरी मुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील चोरटा सोमनाथ भारत शिंदे वय .२३ रा.शिंदेवस्ती बावडा ता.इंदापूर याला अटक करण्यात आले आहे.याबाबत दिलेल्या माहितीनुसार शेतकरी उस वाहतूकदार अक्षय अनिल राउत रा.केतुर ता.करमाळा यांनी बारामती शेटफळ अग्रो कारखाना येथून आपला ट्रॅकटर नंबर एम.एच.४५ ए क्यू ३२०७ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली.उस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याची झालेली चोरी भिगवण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद महांगडे यांनी गांभीर्याने घेत सदर चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील ,पोलीस अंमलदार महेश उगले ,संतोष मखरे ,सचिन पवार आणि प्रमोद गलांडे यांची टीम नियुक्त करून तपासकामी पाठविले. या टीम ने बारामती अग्रो कारखाना तसेच बावडा व इतर मार्गातील जवळपास १०० च्यावर सीसीटीव्ही चे आकलन करून तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदार याच्या माध्यमातून बावडा येथील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या .मात्र या चोरट्याने ट्रॅकटर ला असणारी जी.पी.एस सेवा भवानीनगर परिसरात काढून टाकल्याचे लक्षात आले.त्यामुळे पोलीस पथकाने संशयित चोरट्याला बोलते करून त्याने नळदुर्ग ता.धाराशिव येथे लपविलेला मुद्देमाल ताब्यात घेत कारवाई पूर्ण केली.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे ,पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील ,पोलीस अंमलदार महेश उगले,संतोष मखरे ,सचिन पवार ,प्रमोद गलांडे यांनी केली.