Monday, April 6, 2026
Home Blog Page 27

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवण आणि परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत पीठ गिरणी

0

भिगवन वार्ता दि. ९


महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवण आणि परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत पीठ गिरणी चे वाटप केले जाणार असल्याची माहिती इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी दिली आहे.

इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे 

रोजच्या स्वयंपाकाचे दळण हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय त्यातच सध्या होत असलेली गिरणीची दरवाढ आणि वेळेचा अपंग आहे यामुळे महिलांचा बराचवेळ दळण करण्याचा असतो . राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या विशेष प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील आणि भिगवण परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत गिरणीचे वाटप करण्यात करण्याचे काम हाती घेतले आहे असे माहिती इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय भाऊ देहाडे यांनी दिली आहे उपसभापती देहाडे यांच्या सहकार्याने अनेक महिलांना अनेक महिलांना शिलाई मशीन तसेच अनेक पंचायत समिती योजनांचा लाभ मिळालेला आहे त्यातच आता महिलांना मिळत असलेल्या गिरणी मुळे महिलांनी याचा फायदा होणार असून रोजच्या कटकटी त्यांची सुटका होणार आहे.

गरजू महिलांना याबाबत उपसभापती संजय दराडे यांच्या कार्यालयात याबाबतची माहिती दिली जाणार आहे तर संपर्कासाठी सचिन खडके कपिल भाकरे आकाश देहाडे जावेदभाई शेख ,प्रताप भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे गरजू महिलांनी आपले आधार कार्ड जवळ बाळगणेस सांगण्यात आले आहे.

शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय.८२) यांचे अल्पशा आजाराने निधन

0

भिगवण वार्ताहर .7
भादलवाडी येथील शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय.८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. इंदापूर तालुक्यातील बहुतेक गावात आणि परिसरात त्यांना साहेब या उपाधीने ओळखले जात होते .

गुलाबराव कन्हेरकर यांनी खडकवासला कालव्याचे पाणी, ऊसाला एफ.आर.पी., शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट आदींसाठी मोठा संघर्ष केला होता. गुलाबराव कन्हेरकर यांच्या निधनानेशेतकरी संघटनेचा अभ्यासू व लढवय्या नेता हरपला अशी भावना शेतकऱ्यांमधुन व्यक्त होत आहे.

भादलवाडी(ता.इंदापुर) येथील शेतकरी कुटुंबातील गुलाबराव कन्हेरकर यांनी सहकार खात्यांमध्ये प्रथम श्रेणी सहकार अधिकारी म्हणुन ३६ वर्षे सेवा
केली होती. १९९७ साली सहकार खात्यातुन सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सहकार खात्यातील अनुभवाचा उपयोग करुन इंदापुर तालुक्यामध्ये अनेक सहकारी
दुधसंस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटया, सहकारी पाणी वापर संस्था, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था निर्माण करण्यात महत्वपुर्ण भुमिका
निभावली. २०१० मध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांचे विनंतीवरुन शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस म्हणुन त्यांनी धुरा सांभाळली.

पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात शेतकरी संघटना वाढीसाठी त्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. ऊसासाठी एफ.आर.पी., शेतीमालास आधारभुत किंमत, शेतकऱ्यांना कार्बन
क्रेडिट यासाठी त्यांनी संघर्ष केला. इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला धरणातील पाण्यासाठी त्यांनी रस्त्यावर व कोर्टाच्या माध्यमातून लढा दिला.
सहकारातील अनुभवाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन समृध्द करणारा व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अभ्यासपुर्ण पध्दतीने लढा उभारणारा लढवय्या नेता हरपला अशी भावना शेतकऱ्यांमधुन व्यक्त होत आहे. सत्यवार्ता न्युज परिवाराच्या वतीने लढवय्या नेत्याला भावपुर्ण आदांजली

भिगवण ग्रामपंचायत समोरील अपघातग्रस्त यू टर्न तातडीने बंद करण्याची मागणी…….

0

भिगवण वार्ताहर. दि.५


पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण ग्रामपंचायत समोरील बंद केलेली यु टर्न पुन्हा सुरू केल्याने याठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी याचा प्रत्यय आला असून मराठा क्रांती मोर्चा रास्ता रोको साठी मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी असतानासुद्धा एका दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती व्हॅन ने जोराची ठोस दिली.

या अपघाताचा आवाज इतका जोरात होता की नक्की हा मोठा अपघात असण्याची शक्यता वर्तवली जात होती बंदोबस्त असणारे पोलीस अधिकारी रियाज शेख यांनी क्षणाचीही उसंत न लावता या ठिकाणी धाव घेतली .आणि अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला उचलण्यासाठी मदत केली .या अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचे नशीब बलवत्तर आहे म्हणूनच की काय त्याला त्याला कोणत्याही प्रकारचे गंभीर प्रकारच्या जखमा न होता किरकोळ जखमा झाल्याचे दिसून आले .

अपघात घडला त्या ठिकाणी अशी वर्दळ होत असते यातूनच जीवित हानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघ तसेच पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी यात अपघातग्रस्ताला तातडीने मदत मिळवून देत उपचारासाठी दवाखान्यात पाठवले.

या अपघाताची कोणी तक्रार केली नसल्याचे गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. मात्र भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात कोण जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेली चार वर्ष अपघातामुळे बंद केलेला हा यू-टर्न महामार्ग प्रशासनाने दुरुस्तीच्या नावाखाली चालू केला आहे . हा यू-टर्न चालू असताना अनेक अपघात घडले आहेत यात अनेकांचे जीव गेलेले आहेत याची जाणीव असताना महामार्ग प्रशासन सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

अपघातग्रस्त ठिकाणचा हा यू-टर्न हटवल्यामुळे अपघात होऊन कोणाचा जीव गेला तरी याची जबाबदारी सर्वस्वी रस्ते दुरुस्त करणाऱ्या कंपनी वर टाकण्यात यावी. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी केली आहे.

तर महामार्ग महामार्ग प्रशासनाने याठिकाणी अंडरपास ब्रीज ची निर्मिती केली तर भविष्यात होणारे अपघात कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप

0

भिगवन वार्ता. दिनांक ,४
कर्जत तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप विनामोबदला करण्यात आले.

सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या आजाराला थांबवण्यासाठी अनेक प्रकारची उपाययोजना केली जात आहे त्यातीलच एक उपाय म्हणून वाफ यचे मशीन अर्थात विपोराईझर याचा वापर सर्रास केला जात आहे .मात्र ज्यांची ही वाफेच्या मशीन घ्यायची इच्छा आहे परंतु आर्थिक अडचण होत असल्यामुळे ती मशीन घेतली जात नाही याच कारणाने भिगवण ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश शेंडगे यांनी गरजू नागरिकांना विनामोबदला पन्नास मशीनचे वाटप केले.

यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शंकराव गायकवाड ,संतोष धवडे सचिन बोगावत, अजिंक्य माडगे प्रशांत शेलार , रामहरी चोपडे , दादासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी बोलताना महेश शेंडगे यांनी सांगितले की वाफ घेण्याचे मशीन चा वापर करून कोरोनाला दूर ठेवता येणार आहे काही अडचणीमुळे ज्यांना कोणाला हे मशीन घेणे शक्य झाले नाही अशा गरजवंतानी भिगवन ग्रामपंचायत येऊन मशीन घेऊन जावे.

इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने भिगवण येथे रस्ता रोको

0

भिगवण वार्ता .४

इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने भिगवण येथे शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळेस मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व मंडलाधिकारी मकरंद तांबडे यांना देण्यात आले.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अतिशय शांततेत अर्धातासाहून अधिक काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.

“एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे” या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत, राज्य सरकारवर रोष व्यक्त केला व राज्य सरकारने केंद्र सरकारवर दबाव टाकून आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी. नोकर भरतीला स्थगिती द्यावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासकीय नोकरीतील बाबू बाबतीत नाराजी व्यक्त केली .

तर शैक्षणिक मंत्र्याने तातडीने घेतलेले निर्णय बाबत तसेच गृहमंत्र्यांनी पोलीस भरती बाबत काढलेल्या भरती विषयी नाराजी व्यक्त केली. सदर मागण्यांचा सरकारने जर सकारात्मक विचार केला नाही तर, भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तयार ठेवला होता. रस्ता रोको आंदोलन समारोप झाल्यानंतर भिगवन पोलिसांनी २८ कार्यकर्त्यांना अटक करीत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन

0

भिगवण वार्ता.दि.२


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे.आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपन प्रयत्न शील असल्याची ग्वाही देताना राज्यमंत्री भरणे

यावेळी समाजाचे निवेदन स्वीकारीत स्वतः राज्यमंत्री भरणे हेच आंदोलन कर्त्या सोबत बसल्याचे दिसून आले.तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हे सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती भरणे यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिली.


मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून मराठा क्रांती मोर्चा आक्रोश मोर्चाचे आयोजन करीत राज्यातील आमदार खासदार आणि मंत्र्याच्या घरासमोर ढोल बजाव तसेच ठिया आंदोलन करीत आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आली आहेत.

मराठा समाजाच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेत ठिय्या आंदोलन करताना राज्यमंत्री भरणे

आज राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर हे आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भरणे यांनी स्वतः या आंदोलनात सहभाग घेत मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे ,मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पाठींबा असून मराठा समाजाची भूमिका आपण सरकार दरबारी ठामपणे मांडणार असल्याचे सांगितले.

तर महाविकास आघाडी सरकार आरक्षणासाठी प्रयत्नशील असून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे मंत्री उद्धव ठाकरे ,आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरक्षणासाठी पाठपुरावा असल्याचे सांगितले.अशोक चव्हाण आरक्षणाचा विषय हाताळत असून न्यायालयात भूमिका मांडण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.
यावेळी मंत्री भरणे यांनी स्वतः आंदोलनात सहभाग नोंदवीत निवेदनाचा स्वीकार केला आणि समाजाच्या भावना सरकार दरबारी पोहोचविणार असल्याचे सांगितले.

मराठा समाजाचे निवेदन स्वीकारीत असताना भरणे आणि मराठा समाज बांधव


आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी भरणे यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या सर्वच मार्गावर पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता.बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर ,इंदापूर पोलीस ठाण्याचे पी .आय नारायण सारंगकर ,वालचंदनगर ए.पी.आय दिलीप पवार ,भिगवण पोलीस स्टेशनचे ए.पी.आय जीवन माने जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा

0

भिगवण वार्ता .दि.३०
भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा करण्यात आला.अगदीसर्वसामान्य नागरीका पासून ज्यांचे सारथ्य म्हणून काम केले अशा वरिष्ठ अधिकार्याने सलामी देत हा सेंड ऑफ चा कार्यक्रम पार पडल्याने पोलिसांत सुद्धा माणुसकी खचून भरलेली असल्याची जाण दिसून आली.

सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने सेवानिवृत्त ए एस आई शेख यांचा सपत्नीक सन्मान करीत असताना
सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने सेवानिवृत्त ए एस आई शेख यांचा सपत्नीक सन्मान करीत असताना


भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महमदअली याशिन भाई शेख यांचा भिगवण पोलीस ठाण्यातील आजचा शेवटचा दिवस .गेली ३८ वर्ष विना अपघात गाडी चालवीत आपल्या बरोबरच आपल्या सोबत असणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवाची काळजी घेत त्यांनी पोलीस गाडी चालवली.शेख मामू या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या पोलिसाचा आज सेंड ऑफ म्हणजे निरोप समारंभ ,त्यांचे सहकारी आणि भिगवण पोलिसांनी हा निरोप समारंभ मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला.

शेख दाम्पत्यावर पुष्पवृष्टी करताना त्यांचे सहकारी अधिकारी
शेख दाम्पत्यावर पुष्पवृष्टी करताना त्यांचे सहकारी अधिकारी

डोक्यावर ऐटबाज फेटा बांधून शेख या दाम्पत्यावर दोन्ही बाजूने पोलीस पुष्पाची बरसात करीत होते.तर ज्या सारथ्याने आपले सारथ्य केले या साठी स्वतः प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी गाडीचा दरवाजा उघडून बसण्याची विनंती केली.अगदी भावपूर्ण आणि डोळ्यात पाणी आणतील अशा पद्धतीने निरोप समारंभ करण्यात आला.

यावेळी पोलिसांत सुद्धा माणुसकी आणि जिव्हाळा किती भरलेला असतो याची जाणीव उपस्थित नागरिकांना झाली.यावेळी पोलीस हवालदार वीर नाना ,संजय काळभोर ,विलास मोरे ,रमेश भोसले,केशव चौधर ,रतीलाल चौधर ,केशव जगताप, महिला पोलीस शिपाई भारती खंडागळे यांनी आपल्या सहकारी सोबत्याला पुढील जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

तक्रारवाडी येथील हॉटेल चालकांवर जीवघेणा हल्ला

0

भिगवण वार्ता .30


तक्रारवाडी येथील हॉटेल चालकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे .नातेसंबंधात हा हल्ला करण्यात आल्याने या संबंधी भिगवण पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यात आलेली नाही मात्र या भांडणाचे प्रतिसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारवाडी येथील हा प्रकार असून कारखाना ऑफिस शेजारी असणाऱ्या हॉटेल चालकांवर हा हल्ला करण्यात आला आहे .

गावातील आणि नाते संबंधातील ही भांडणे असल्याची चर्चा आहे .अगदी कांद्याचे पैसे देण्या घेण्याच्या किरकोळ कारणावरून हे वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे .तर एकूण तीन इसमानी एका इसमा वर हा हल्ला करण्यात आला .यात हॉटेल व्यावसायिकाला भरपूर मारहाण करण्यात आली असून शरीरावर अनेक जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे .

मासे विक्री साठी जागा धरण्यावरून आज पर्यंत अनेक भांडणे लागत असताना ग्रामपंचायत प्रशासन मूग गिळून गप्प राहत असल्याचे दिसून येत आहे .तर या भांडणात गावातील राजकीय व्यक्ती आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगत आहे .खोटा गुन्हा नोंद करण्याचे प्रयत्न ही या जागा प्रकरणात पुढे येत असून अजूनही अनेक वाद या प्रकरणात पुढे येत आहेत .तर राज्य मार्गात जाणाऱ्या या जागे पायी अनेक भांडणाचे मूळ असल्याची माहिती मिळत आहे .
या भांडणात नाते संबंध येत असल्यामुळे पोलीस ठाण्यात या विषयी कोणत्याच प्रकारची तक्रार दिली गेली नसल्याची माहिती समोर येत आहे .

मात्र अगदी शांत म्हणून ओळख असणाऱ्या तक्रार वाडी गावाची ओळख भांडकुदळ गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे .तर कांद्याचा वाढत असलेला भाव याकडेही भांडणाचा मूळ मुद्दा म्हणून पाहिले जात आहे .


अगदी सकाळच्या सुमारास झालेल्या या भांडणच्या ठिकाणी 100 च्या वर बघ्या ची गर्दी झाल्याची पाहायला मिळाली .

धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत

0

भिगवण वार्ता …२८

भिगवण येथे झालेल्या  धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत झाले. यावेळी झालेल्या धनगर आरक्षण एल्गार सभेत संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.

या सभेची सांगता राज्यमंत्री मंडळाची यादी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रमाने दिलेल्या २२ सवलतींचा अध्यादेश जाळण्यात आला. डॉ.शशिकांत तरंगे निमंत्रक असलेल्या भिगवण येथील सभेचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर ,आबा बंडगर ,अनिल तांबे ,नाना बंडगर , महेश शेंडगे, दादा थोरात, वैभव देवकाते ,प्रदीप वाकसे अतुल देवकाते आदींनी केले होते .व्यंकटेश लॉन्स येथे पार पडलेल्या या सभेला संपूर्ण राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.

धनगर समाज एका झेंड्याखाली आणण्यासाठी इंदापूर तालुक्यातील युवकांनी पुढाकार घेतला आहे . ” एकच झेंडा आणि एकच दांडा ” या उक्तीप्रमाणे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी सरकारला जाग आणण्यासाठी सर्व पक्षीय समाज एका छताखाली येउन आंदोलन करणार असल्याचे डॉ शशिकांत तरंगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सभेला माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी आमदार रामराव वडकुते, भाजपा प्रवक्ते गणेश हक्के, मदनराव देवकाते, सुरेश कांबळे, अर्जुन सलगर, चंद्रकांत देशमुख, भुषणसिंह होळकर, अक्षय शिंदे, किशोर मासाळ आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वानुमते राज्यभरात एका वेळी एकच आंदोलन करण्याचे ठरल्याने शासनाला आंदोलनाची दखल घ्यावी लागेल अन्यथा भविष्यात रस्त्यावरील तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी धनगर नेत्यांनी दिला.

धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सरकारची भूमिका-आ. दत्तात्रय भरणे

0

भिगवण वार्ताहर.दि.२७
धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची भूमिका सरकारची असून या दोन्ही समाजाला न्याय मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी भिगवण येथे बोलताना सांगितले.

तसेच भटक्या मेंढपाळांना स्वताच्या रक्षणासाठी शस्त्र परवाना मिळाला पाहिजे अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली असल्याचे यावेळी सांगितले.


राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुणे दौऱ्यावर निघाले असताना भिगवण येथील गिरीजा भारत गॅस कार्यालया धनगर बांधवांनी धनगर आरक्षण आणि मेंढपाळ यांच्यावरील हल्या संदर्भात निवेदन दिले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर ,प्रताप पाटील ,तुकाराम बंडगर ,नानासाहेब बंडगर ,नामदेव पाटील ,अनिकेत भरणे ,धनाजी थोरात ,तुषार हगारे ,दादासाहेब थोरात उपस्थित होते.यावेळी बोलताना भरणे यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि यासाठी सरकारचा प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.तर धनगर आरक्षणाबरोबरच मराठा समाजाला हि आरक्षण मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले.

तर काही राजकीय पक्ष आणि व्यक्ती समाजा समाजात भांडणे लावून देवून आपली राजकीय पोळी भाजत असल्याचे सांगितले.यावेळी मेंढपाळ यांना आपली स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली असून लवकरच मेंढपाळ यांना न्याय देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून निश्चित केले जाईल असे आश्वासन दिले.