भिगवण वार्ताहर .दि.४
जगाचा आधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमी चे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,आरटीओ कार्यालय बारामती आणि भिगवण पोलीस ठाणे तसेच इंदापूर एसटी डेपो यांच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला.
समाजातील नागरिकांनी खासगी वाहतुकीच्या ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय अंगीकारावा तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी ग्राहक पंचायत पुणे यांच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी बारामती आरटीओ विशाल नाझीरकर ,भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विनोद पाटील ,ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य सचिव अॅड तुषार झेंडेपाटील ,पुणे जिल्हा संघटक दिलावर तांबोळी ,इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर ,संघटक आबासाहेब निंबाळकर ,गणेश गुप्ते ,इंदापूर तालुका अध्यक्षा अर्चना सपकाळ ,नंदकुमार तावरे ,मनोज उदावंत ,भिगवण व्यापारी प्रतिनिधी श्रीकांत गायकवाड ,वाहतूक नियंत्रक सोमनाथ कुताळ हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी व्यापारी प्रतिनिधी औदुम्बर हुलगे तात्यासाहेब बंडगर ,ग्राहक पंचायतीच्या सचिव नाजीया सय्यद पूनम गुप्ते दादासो भोंगळे यांनी प्रवाश्यांना गुलाब पुष्प देवून स्वागत केले.
मुख्य कार्यक्रम वेळी पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास करणाऱ्या एस.टी बसेस थांबवून या गाडीचे चालक आणि कंडक्टर यांचा फेटा बांधून सत्कार करीत बस मधील प्रवास्यांना पाणी बाटली तसेच तिळगूळ तसेच गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.यावेळी झेंडेपाटील तसेच आरटीओ नाजीरकर यांनी बस मधील प्रवासी यांचे स्वागत करीत बस ने प्रवास केल्याने देशाचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच देशातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतल्यास अपघात प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना अॅड .तुषार झेंडे पाटील यांनी ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सांगितले.तर बारामती येथे रेल्वे प्रवाशी आणि चालकाचा सत्कार केल्याचे सांगितले.सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब केल्याने अपघाताचे प्रमाण ,हवेतील प्रदूषण आणि नागरिकाचा आणि शासनाचा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगितले.