भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात लसी करणासाठी नागरिकांची गर्दी ; आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती

0
355

आरोग्य कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याने नागरिकांची मोठी गर्दी..सोशल डीस्टनसिंगचा फज्जा ….गर्दी मुळे जेष्ठ नागरिकांत कोरो ना संसर्ग पसरण्याची भीती…

माहिती देण्यासाठी फोन करणाऱ्या पत्रकारांना जबाबदार अधिकारी गट विकास अधिकारी यांची उर्मट उत्तरे..

भिगवण वार्ताहर. ५

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षापुढील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे सोशल केल्यामुळे सोशल डीस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.तर लसीकरणासाठी नागरिकांना बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणताही कर्मचारी अथवा डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे नागरिकांत मोठा गोंधळ झाल्याने शेवटी पोलिसांनी याठिकाणी येवून गर्दी नियंत्रणात आणण्याचे काम केले.

इंदापूर तालुक्यातील भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षापुढील २०० नागरिकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.त्यामुळे सकाळी ८ वाजलेपासूनच नागरिकांनी याठिकाणी आपला नंबर लावण्यासाठी उपस्थिती लावली होती.मात्र १० वाजून गेले तरी कोणीही आरोग्यसेवक डॉक्टर अथवा कर्मचारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे १०  वाजता मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली.तसेच नंबर वरून नागरिक आपसात वाद घालू लागले.याची माहिती पत्रकारांना मिळताच याठिकाणी भेट देत याबाबतची माहिती पदभार असणाऱ्या वैदकीय अधिकारी डॉ.गणेश पवार ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ .सुनील गावडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांना दिली.त्यावेळी तीनही अधिकारी यांनी याची दखल घेत कर्मचारी आणि डॉक्टर पाठविण्याची व्यवस्था करीत असल्याचे सांगितले.मात्र वेळेत कर्मचारी न आल्याने मोठ्या गोंधळाची परिस्थिती यावेळी निर्माण झाल्याने अखेर भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी पोलीस पथक पाठवून गर्दी कमी करण्याचे काम केले.

याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकारांनी याची माहिती  देण्यासाठी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय परीट यांना फोन केला असता त्यांनी पत्रकारांना उर्मटपणे उत्तरे देण्यात आली. तुम्हाला लसीकरण आहे म्हणून सांगण्यात आले होते का तुम्ही आताच घरातून बाहेर आला आहात.२४ तास आमची मानस काम करीत आहेत.तुम्ही भिगवण कर नाहीतरी जास्तच करींत आहात आता तुम्ही शांत बसा असी उर्मट उत्तरे देत माहिती देण्यासाठी फोन केलेल्या पत्रकारांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आली.त्यावेळी त्यांनी लगेचच कार्यवाही करीत आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांना याठिकाणी नागरिकांना सेवा देण्यासाठी उपलब्ध केले.

शासन एका बाजूला गर्दी करू नका म्हणून निर्बंध पाळण्यास सांगत आहे.तर दुसऱ्या बाजूला लसीकरणासाठी बोलावून गर्दी करीत आहे.त्यामुळे आतापर्यंत कोरोना पासून बचाव करीत असलेल्या जेष्ठ नागरिकांना कोरोणाचा संसर्ग वाढण्याची भीती यावेळी नागरिकांनी बोलून दाखविली.तर कोणतेच नियोजन नसताना आम्हाला कशाला नाहक त्रास द्यायला बोलावले असे महिलांनी मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here