भिगवन वार्ताहर. दि.४
कोरोना च्या वाढत्या प्रसारामुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या ग्रामदेवतेच्या यात्रा उरूस जत्रा यावर शासनाने निर्बंध आणल्यामुळे यावर्षीच्या यात्रा भरलेले नाहीत. मात्र असे असले तरी सर्वसामान्य नागरिकांची या यात्रेच्या वर्गणीतून सुटका झाली असल्याचे मात्र दिसत नाही.
या दिवसात ग्रामीण भागात सालाबाद प्रमाणे भरतात. ग्रामीण भागात यात्रा उरूस जत्रा यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. या सणाला ग्रामीण जीवनातील उत्साह मानला जातो. यावेळी नागरिक आपल्या नातेवाईकांना एकत्र करीत गोड-धोड आणि मांसाहारी यासारखे अन्नपदार्थ करून पाहुणचार करीत असतात. तसेच महिलांसाठी हा सण अत्यंत आनंदाचा मानला जातो लेकी बाळी माहेरी जातात तर सासरच्या नातेवाईकांना पाहुण्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर पाहुणचार केला जातो. मात्र या कोरोणाने या सर्वांवर विरंजन टाकण्याचे काम केले आहे असे असले तरी ग्रामीण भागात ग्रामदेवतेच्या वर्गणीतून कोणतीही सूट देण्यात आली नसून सर्वसामान्य नागरिकांना ही वर्गणी भरावे लागत असल्याचे चित्र इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.
तसेच अनेक देव देवतेच्या यात्रेसाठी केलेल्या वर्गणीतून शिल्लक राहिलेली रक्कम गावातील गरजूंना वार्षिक व्याजावर व्याजाने दिली जाते तिच्यातही कोणत्याही प्रकारची सूट केलेली दिसून आले आहे .तर भावनेच्या प्रश्नांमुळे या पैशाच्या विषयात कोणी बोलताना दिसत नाही.त्यामुळे कोरोणामुळे वर्ष भरापासून पिडलेला शेतमजूर कामगार आणि हातावर पोट असलेला सर्वसामान्य आणखीनच अडचणीत आलेला दिसून आला. रिन काढून सण करणे आता आणखीनच आवघड होत असल्याचा प्रत्यय आता गोरगरीब नागरिकांना येत असताना दिसून आल्याशिवाय राहणार नाही.
कोरोनाच्या काळात गावातील यात्रा कमिटी आणि राजकीय प्रतिनिधी यांनी या विषयात सद्सद्विवेक बुध्दी वापरून यातील काही व्याज माफ करून काही खिशातील घातल्यास नक्कीच गोरगरीब नागरिकांची यात्रा जत्रा आणि उरूस आनंददायी झाल्याशिवाय राहणार नाहीत.
पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक गावात हा प्रकार घडत असताना भावना आणि श्रध्देचा विषय असल्यामुळे यावर कोणी बोलताना दिसून येत नसले तरी कोटीच्या घरात होणाऱ्या या व्यवहाराला व्याजाचा व्यवहार मानला जात नाही हे देखील विशेष मानावे लागेल. तर याची काही ठिकाणी अधिकृत आर्थिक तपासणी देखील केली जात नाही.
यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे खेळणी आणि महिलांच्या वस्तू विक्री करणाऱ्या छोटया व्यवसाय करणाऱ्यावर उपासमारी ची वेळ आली असल्याचे देखील प्रामुख्याने जाणवत आहे.मात्र शासन दरबारी यांची कुठे नोंद नसल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधांना वानवा असल्याचे चित्र आहे.

















