सामाजिक प्रबोधन करण्यासाठी कीर्तन कारांची गरज असल्याचे ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मत

0
1184

सत्यवार्ता अकोले वार्ताहर ….विजय गायकवाड
वारकरी संप्रदाय हा कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करून समाजाची सेवा करीत असतात.अशी सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी समाजात कीर्तनकार तयार होण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

धायगुडेवाडी(अकोले ) येथील वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शैक्षणिक संस्थेच्या उदघाटन ते प्रसंगी बोलत होते. धायगुडे वाडी येथे प्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवी धायगुडे यांनी सुरू केलेल्या वारकरी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात कीर्तनकार तयार व्हावेत या हेतूने ही संस्था सुरू करण्यात येत आहे.यासाठी भरणे यांनी संस्थेच्या बांधकामासाठी १० लाख रुपयाचा मदतनिधी देण्याचे जाहीर केले .या संस्थेमध्ये तबला वादक, गायन, कीर्तन, प्रवचनकार यांना शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू आहेत.सध्या वीस विद्यार्थी संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत.भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून चांगले कीर्तनकार तयार करण्यासाठी चांगल्या सेवा देण्याचा मानस असल्याचे कीर्तनकार वैष्णवी धायगुडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रताप पाटील,पंचायत समिती सदस्या शीतल वणवे, पांडुरंग दराडे,सरपंच नकुशा दराडे, उपसरपंच संदीप दराडे, अंकुश पडळकर, बबन सोलनकर, कैलास वणवे ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here