अज्ञातांनी टाकलेल्या दगडाच्या धिगाऱ्यामुळे अपघाताची शक्यता ,; महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे मत
पळसदेव वार्ताहर. दि.१६ इरफान तांबोळी डाळज. पुणे -सोलापूर महामार्गावर पळसदेव हद्दीत असणाऱ्या सेवा रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने दगड आणि गोटे टाकले आहेत.या दगड गोट्यामुळे रात्रीच्या वेळेस त्यामुळे येथील पायी चालणारे पादचारी ,दुचाकीस्वार,चारचाकी वाहने यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर महामार्ग प्रशासनाची पेट्रोलिंग वाहने दिवसभर या ठिकाणाहून ये जा करत असताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.
या सेवा रस्त्यावरून स्थानिक नागरिक तसेच आसपासच्या गावातील अनेक नागरिक सुरक्षेचा विचार करून मुख्य मार्गा ऐवजी या सेवा रस्त्याचा वापर करीत असतात .त्यामुळे रात्रीच्या अंधारात अचानक दगड दिसल्यामुळे वाहन धारक गडबडून जावून अपघात होवू शकतो. प्रवास सुखकर व्हावा यासाठी वाहनधारक महामार्ग प्रशासनाला टोल भरत असताना टोल प्रशासन मात्र अशा प्रकरणी गांभीर्य घेताना दिसून येत नाही.त्यामुळे यातून एखाद्या निष्पाप नागरिकाला आपला जीव गमावावा याची दखल टोल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.महामार्ग प्रशासनाने याची तातडीने दखल घेत या ठिकाणचे दगड आणि गोटे हटविण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.