साध्या वेशात फिरत या पोलीस अधिकाऱ्याने केली कारवाई; पोलिसांच्या गनिमी काव्याची बाजारपेठेत चर्चा

0
734

भिगवण वार्ताहर.दि.२७

भिगवण शहरात विनामास्क दुकानदारांवर कारवाई करीत जवळपास १९००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी कोणताही फौजफाटा सोबत न घेता साध्या वेशात चालत विना मास्क दुकानदारांचे फोटो काढीत कारवाई केल्याने याची खबरबात अनेक दुकानदारांना हातात दंडाची पावती पडल्यावर माहिती झाली.

भिगवण शहरातील बाजार पेठेत जवळ पासच्या अनेक खेडे गावातून ग्राहक खरेदीला येत असल्यामुळे कोरोना आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.तर ग्राहक आणि व्यापारी कोरोना हद्दपार झाला असल्यासारखे बिनधास्त वागत असल्याचे दिसून येत आहे.अनेक व्यापारी मास्क वापरत नाहीत तर आहेत त्याचा मास्क हनुवटीच्या खाली घसरला असाल्याचे दिसून येत आहे.तर सॅनिटाइझर तर दुकानातून गायब झाले आहेत.अनेक दिवस दुचाकी वर विना मास्क कारवाई करूनही कोरोना वाढत असल्याचे दिसून आल्याने भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सकाळी १० वाजता पोलीस ठाण्यातून निघत चालत व्यापारी पेठेत फेर फटाका मारण्यास सुरवात केली.यावेळी पोलिसांचा फौजफाटा सोबत न घेता साध्या वेशात माने फिरत असल्यामुळे याची माहिती कोणालाही मिळाली नाही.यावेळी माने यांनी शांतपणे प्रत्येक दुकान समोर उभे राहत ज्या दुकानात दुकानदाराने मास्क घातला नसेल आणि ग्राहकाने हि मास्क घातला नसेल अशा दुकानाचे फोटो काढण्यास सुरवात केली.तसेच फोटो काढल्यावर दुकान दाराला सॅनिटाइझर आहे का असे प्रश्न विचारून माहिती घेतली.जवळ पास १ ते १.५ किलोमीटर पायी चालत माने यांनी हि कारवाई केली आणि याचे फोटो पावती फाडणार्या अधिकार्याला पाठवीत दंडाची वसुली केली.पोलिसांनी केलेल्या या गनिमी काव्याची धास्ती व्यापाऱ्यांनी घेत अनेकांनी दुकानात सॅनिटाइझर समोर ठेवून मास्क वापरण्यास सुरवात केली.कारवाईत असेच सातत्य राहिल्यास भिगवण आणि परिसरात कोरोनाचा आलेख खाली येण्यास नक्कीच मदत होणार आहे.

याबाबत प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्याशी संपर्क साधला असता कारवाईत दंड वसूल करणे हा प्रशासनाचा उद्देश नसून नागरिकांची जनजागृती होत कोरोना आजाराची संख्या कमी करणे हा असल्याचे सांगितले.तर दिवसभरात विनामास्क ३१ दुचाकी स्वारांवर केलेल्या कारवाईत ६२०० ,२२ दुकान आस्थापना हॉटेलवर केलेल्या कारवाईत ११००० दंड वसूल करण्यात आल्याचे तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर १८०० असा जवळपास १९००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here