पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ;एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू

0
2118

भिगवण वार्ताहर. दि.८
पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.अपघात इतका भयानक होता की यात वाहनाचा चक्काचूर झाला आहे.एकाच घरातील आई वडील आणि मुलगा यांनी या अपघातात जीव गमावला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गीता अरुण माने वय ३६ मुकंद अरुण माने वय २५ अरूण बाबुराव माने वय ४५ असे अपघातातील मृतांची नावे आहेत.तर साक्षी अरुण माने वय १८ ड्रायव्हर महादेव रकमाजी नेटके वय ५६ अशी जखमीची नावे आहेत.

मुलीच्या लग्नाच्य खरेदी जात असताना हा अपघात घडला.दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे मृत अरुण माने व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती मिळाली आहे.अपघात इतका भीषण होता की मृतदेह काढण्यासाठी क्रेन चां वापर करण्यात आला.

ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात ग्रस्त गाडी ने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.वेगात असणाऱ्या या गाडीच्या ड्रायव्हर ला ऊस वाहतूक करणारे वाहन न दिसल्यामुळे अपघात झाला.तर या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला कोणताही रीपलेत्रर नसल्यामुळे अपघात घडल्याचे स्थानिक सांगत आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावरून होणारी ऊस वाहतूक हा गंभीर प्रश्न असून याकडे पोलीस प्रशासन हायवे प्रशासन आणि आर टी ओ विभाग गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.त्यामुळे निष्पाप नागरिकांना अपघातात आपले जीव गमवावे लागत आहेत.या ऊस वाहतूक ड्रायव्हरने केलेल्या चुकीमुळे अनेक संसार उघडे पडत आहेत. कर्णकर्कश आवाजात चालणारे टेप , दोन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहणामधील लागलेली शर्यत ,तसेच रेल्वे सारख्या जोडलेल्या मोकळ्या ट्रेलर , विना रीपलेकटर केली जात असणारी ऊस तसेच मळी आणि भुसा वाहतूक आर टी ओ विभाग आणि पोलीस प्रशासनाला दिसूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.

त्यामुळेच असे भीषण अपघात घडतात आणि एकाच घरातील तीन जणांचा जागीच मृत्यू होतो.सदर अपघाताची खबर भीगवन पोलीस ठाण्यात देण्यात आली असून याचा तपास प्रभारी पोलीस अधिकारी जीवन माने यांच्या मार्गदर्शन खाली पो.स. ई रुपणवर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here