सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल विरोधात स्वर्गवासी रमेश बापू जाधव प्रेरित सर्वपक्षीय श्रीनाथ ग्राम विकास पॅनल
भिगवण वार्ताहर दि.२६
इंदापूर तालुक्यात राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल च्या विरोधात सर्वपक्षीय श्रीनाथ ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. तर अपक्ष उमेदवारांना वळती वर आनण्यासाठी दोन्ही पार्ट्यांना मोठी कसरत करावी लागणार हेही निश्चित झाले आहे.
भिगवण गावावर पंचवीस वर्षापासून स्व.रमेशबापू जाधव यांची एक हाती सत्ता होती. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्व विरोधकांना एकत्र करीत ‘ ‘एक बदल घडवा सर्व बदल घडतील’ अशी हात देत सत्ता काबीज केली होती. सत्ता मिळाल्यानंतर सर्व सदस्यांना सरपंच उपसरपंच पद मिळावे यासाठी राष्ट्रवादीने पद बदलीचा कार्यक्रम राबवला. मात्र विरोधकांनी या पद बदलाला संगीत खुर्ची उपमा देत टीकेची झोड उठवली. आणि विकास कामात सदस्य मंडळी करीत असलेल्या ठेकेदारी बाबत टार्गेट केले.
या दोन्ही पार्ट्या करीत असलेल्या आरोप-प्रत्यारोप यांच्यात दिवसेंदिवस रंगत वाढत असून निवडणुकीच्या दिवसापर्यंत आणखीन काय आरोप केले जातात याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागून आहे .तर सत्ताधारी पक्ष हा आपण केलेल्या विकास कामावर ठाम असून मतदार हा विकासकामांना नक्की मत देईन असा दावा करीत आहे.
तसेच भाजप हा पक्ष लपवण्यासाठीच विरोधक सर्वपक्षीय पॅनल असल्याचा आव आणत असल्याचे सत्ताधारी पॅनल प्रमुख अँड .महेश देवकाते यांनी म्हटले आहे.
श्रीनाथ ग्रामविकास पॅनलचे पराग जाधव भिगवन गावातील ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आपला पॅनल निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगत आहेत.
…….. *दोन्ही पार्ट्या विकासाच्या नावाने मत मागत असले तरी वाढत्या अतिक्रमणामुळे भिगवण गावचा कोंडलेला श्वास कोण मोकळा करणार ? याकडे मतदार राजा डोळे लावून बसलेेला आहे*