सदोष वस्तू उत्पादन आणि विक्री आता पडणार महागात

0
527

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ देशभरात लागू !

भिगवण वार्ताहर दि.१८
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा २० जुलै २०२० पासून संपूर्ण देशात लागू झाला असून या नवीन कायद्यामध्ये दुकानदाराने, व्यापाऱ्याने ग्राहकाला सदोष वस्तू अथवा उत्पादन विक्री केल्यास त्याबाबत जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून न्याय मिळवून दिला जाणार असल्याचे तुषार झेंडे पाटील सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद यांनी सांगितले.याबाबत सर्वसामान्य ग्राहकांची सदोष वस्तू आणि उत्पादन यातील फसवणूक याविषयी झेंडे पाटील यांनी माहिती दिली.

ग्राहक संरक्षण कायद्यात व्यवसाय करतेवेळी ग्राहकाला दोषमुक्त वस्तू अथवा उत्पादन विक्री केल्यास त्याबाबत जिल्हा ग्राहक आयोगात दाद मागता येऊ शकते .सदर वस्तू सदोष आढळल्यास ग्राहक आयोग वस्तू नवीन देण्याचे आदेश देईल. वस्तूचे उत्पन्नात दोषयुक्त असेल आणि अशाच प्रकारच्या अनेक प्रकरणे असतील तर आयोग सदर वस्तू विक्री केलेल्या सर्व ग्राहकांना वस्तू बदलून देण्याचे आदेश देईल. वस्तूचे उत्पादनात दोष आढळल्यास उत्पादक कंपनीला सदोष उत्पादन बंद करण्याचे आदेश देणार असल्याचा कायदा असेल.

” ग्राहकाला जिल्हा आयोगात पाच लाखापर्यंत दावा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही तसेच जिल्हा आयोगाला याबाबत नव्वद दिवसात निकाल देणे कायद्याने बंधनकारक आहे ” अशी माहिती झेंडेपाटील यांनी दिली. “यामुळे ग्राहकांची यातून फसवणूक टाळली जाणार असून दोषयुक्त उत्पादनाला आळा बसणार आहे ” असे झेंडे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here