भिगवण वार्ताहर . दि.१६
इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडनुकीचा बिगुल वाजला आहे. याच अनुषगाने (दि. १५) रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात ‘स्वर्गीय रमेश बापू जाधव’ प्रेरित ‘श्रीनाथ ग्राम विकास सर्वपक्षीय पॅनल’ ची घोषणा ज्येष्ठ नेते अशोकराव शिंदे यांनी केली.
अशोकराव शिंदे (भाऊ)
मार्गदर्शक आणि पॅनल प्रमुखअभिमन्यु खटके
मार्गदर्शकतुषार क्षीरसागर
स्वाभिमानी विद्यमान ग्रामंचायत सदस्य
यावेळी बोलताना अशोकराव शिंदे यांनी सांगितले की, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वर्षांपूर्वी ‘एक बदल घडवा सगळे बदल घडतील’. असे स्वप्न दाखवून भिगवण ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली. परंतु, या पाच वर्षांमध्ये भिगवणच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेही बदल झालेले भिगवणकरांना दिसून आलेले नाहीत. परंतु सत्तेची संगीत खुर्ची करण्याचा सगळ्यात मोठा बदल सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. सरपंच व उपसरपंच पदाची अवहेलना करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांमध्ये केले. जी काही विकास कामे झाली ती देखील निकृष्ट दर्जाची करण्यात आली. तर नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याचा अधिकार असताना याबाबत कोणतेही काम न केल्यामुळे भिगवन कर नागरिकांना खिशाला चाट बसवून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.तर गोरगरिबासाठी उजनीच्या काळया पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. त्यामुळें आमचा पॅनल निवडून आल्यास सर्वांसाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी योजना राबवली जाणार असल्याचे घोषणा करताना सांगितले.
श्रीनाथ ग्रामविकास पॅनल हे सर्व पक्षीय असून, यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन, भिगवणच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. विकास कामासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामपंचायतीचा कारभार करणार आहोत. तसेच गावांमध्ये सामाजिक सलोखा राखून गावचे गाव पण जपण्यासाठी प्रयत्न करू व लोकाभिमुख, स्थिर कारभार करण्यावर भर देऊ. सामाजिक कामांमध्ये रस असणाऱ्या शांत व संयमी उमेदवारांना संधी देऊन स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्यावर भर देणार असल्याचे देखील यावेळी बोलताना सांगितले.
निवडून आलेले सदस्य ग्रामंचायत विकास कामात ठेकेदार म्हणून समोर येणार नाहीत
सरपंच उपसरपंच यांच्या पदाची संगीत खुर्ची करून पदाचा अवमान केला जाणार नाही
सर्वधर्मीय सदस्यांना विचारात घेवून शांत संयमी उमेदवार निवडले जातील.
या पत्रकार परिषदेसाठी पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,संजय रायसोनी ,पराग जाधव , तुषार क्षीरसागर ,खंडू राव गाडे ,कपिल भाकरे तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अजित क्षीरसागर यांनी केले. तर आभार गुलामभाई शेख यांनी मानले.